AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मन सुन्न झालंय, डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत..’; प्राजक्ता गायकवाडची भावूक पोस्ट

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ (Swarajyarakshak Sambhaji) या गाजलेल्या मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. ती नेहमीच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. प्राजक्ता आणि तिच्या कुटुंबावर सध्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्राजक्ताच्या आजोबांचं अकस्मात निधन झालं असून तिने सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट […]

'मन सुन्न झालंय, डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत..'; प्राजक्ता गायकवाडची भावूक पोस्ट
Prajakta GaikwadImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 15, 2022 | 12:35 PM
Share

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ (Swarajyarakshak Sambhaji) या गाजलेल्या मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. ती नेहमीच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. प्राजक्ता आणि तिच्या कुटुंबावर सध्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्राजक्ताच्या आजोबांचं अकस्मात निधन झालं असून तिने सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. ‘मन सुन्न झालंय, डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत..’ अशा शब्दांत प्राजक्ताने भावना व्यक्त केल्या आहेत. प्राजक्ताची तिच्या आजोबांशी खूप जवळीक होती. आता कोण माझे लाड करणार? आता कोण माझ्यासोबत हरिपाठ घेणार? अभंग म्हणणार?, असं लिहित तिने आजोबांच्या काही आठवणी या पोस्टमध्ये सांगितल्या आहेत.

प्राजक्ताची पोस्ट-

‘आजोबा.. आता कोण बैलगाडी जुंपणार? आता कोण माझे लाड करणार? आता कोण माझ्यासोबत हरिपाठ घेणार? अभंग म्हणणार? शिस्तप्रिय पण मनमिळावू स्वभाव, सगळ्या गावात रुबाब आणि धाक असायचा, येणाऱ्या प्रत्येकाची चेष्टा मस्करी करून बोलणं, तुकारामाची नात म्हणजे आपली येसूबाईंची भूमिका करणारी म्हणून पूर्ण गावात, तालुक्यात चर्चा….माझी नात म्हणून अभिमान बाळगणारे… शेवटपर्यंत स्वाभिमानानं, ताठ मानेनं जगलात… सगळं आयुष्य कष्टानं जगलात. वारकरी संप्रदायात रमणारे, प्रत्येक सप्ताहात वीणा धरणारे, मला लहानपणापासून हरिपाठ , ज्ञानेश्वरी,गाथा आणि संपूर्ण भागवत संप्रदाय शिकवणारे लाडके आजोबा. कितीही प्रयत्न केला तरी डोळ्यातील अश्रू काही थांबत नाहीत, पण हे नातं खूप अतूट होतं आणि कायम राहील. देवाच्या मनात काय आहे याचा कधीच कोणी अंदाज लावू शकत नाही, रात्री सीरिअल बघून एकत्र जेवण करून सकाळी आपण मॉर्निंग वॉकला जाऊ असं म्हणून सोडून गेलात आजोबा. मन अगदी सुन्न झालंय.. परत या आजोबा,’ अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

प्राजक्ताच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी तिच्या आजोबांना श्रद्धांजली वाहिली. ताई आज मला माझ्या आजोबांची आठवण आली, माझं आणि माझ्या आजोबांचं नातं पण असंच होत, असं एकाने लिहिलं. तर देव तुला हे दुःख सहन करण्याची शक्ती देऊ दे, असं दुसऱ्याने म्हटलंय.

हेही वाचा:

कपिल शर्माने ‘द काश्मीर फाईल्स’ला प्रमोट करण्यास दिला नकार? अनुपम खेर यांनी सांगितलं सत्य

नाकात नथ, हिरवी साडी अन् हातात डम्बेल्स! ‘येसू बाई’ फेम प्राजक्ता गायकवाडचा वर्कआऊट व्हिडीओ चर्चेत!

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.