AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी त्याचा स्वीकार केला होता, पण त्याने मला… वैशालीचे काळीज चिरणारे शेवटचे शब्द

मी त्याला शिक्षा देऊ शकते. पण कायदा आणि परमेश्वर त्याला अधिक चांगली शिक्षा देईल याची मला आशा आहे. या सर्व प्रकारात मला माझ्या आईवडिलांना अधिक त्रस्त होताना पाहायचे नाहीये.

मी त्याचा स्वीकार केला होता, पण त्याने मला... वैशालीचे काळीज चिरणारे शेवटचे शब्द
मी त्याचा स्वीकार केला होता, पण त्याने मला... वैशालीचे काळीज चिरणारे शेवटचे शब्दImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 18, 2022 | 11:03 AM
Share

इंदौर: अभिनेत्री वैशाली ठक्कर (Vaishali Thakkar) आत्महत्या प्रकरणाचे एकामागून एक रहस्य उलगडू लागले आहे. या धक्कादायक खुलाशामुळे सर्वच हैराण झाले आहेत. दुसरीकडे हे खुलासे तिच्या चाहत्यांना भावनिकही करत आहेत. वैशालीच्या आत्महत्येनंतर तिच्या घराबाहेर सुसाइड नोट सापडली होती. शेजारी राहत असलेला राहुल हा तिच्या आत्महत्येला (suicide) जबाबदार असल्याचं त्यात म्हटलं आहे. पोलिसांनी ही सुसाइड नोट मिळताच राहुल आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेतलं आहे. या सुसाइड नोटची (suicide note) काही पानं व्हायरलही झाली आहेत. त्यात वैशालीने तिचं दु:ख सांगितलं आहे. तिचे हे शब्द काळजाला चिर पाडणारे असेच आहेत.

आता तू कुणाशी भांडणार आहेस? मी तर त्याचा स्वीकार केला होता. त्याने तर मला परकं समजलं. शेवटी मितेश सोबतच्या नात्यामुळे मी आनंदी झाले होते. पण त्याने तेही तोडले. मी खूप थकलेय. आता मला काहीच नकोय. राहुल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी माझं आयुष्य बर्बाद केलंय. त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळणारच, असं वैशालीने या सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे.

मी त्याची पत्नी दिशाचं नावही घेईल. नवऱ्याचं वास्तव माहीत असूनही सर्वांसमोर ती मला चुकीचं ठरवत असते. कारण तिला तिचा संसार टिकवायचा होता. आपलं काहीच नुकसान झालं नाही, असं वाटल्याने राहुलने त्याचा फायदा उचलला. पण माझं आयुष्य तर बर्बाद झालं, असं ती या चिठ्ठीत पुढे म्हणते.

सुसाइड नोट

सुसाइड नोट

मी त्याला शिक्षा देऊ शकते. पण कायदा आणि परमेश्वर त्याला अधिक चांगली शिक्षा देईल याची मला आशा आहे. या सर्व प्रकारात मला माझ्या आईवडिलांना अधिक त्रस्त होताना पाहायचे नाहीये, असं ती म्हणते. तिच्या या शेवटच्या शब्दातून तिच्या मनातील वेदना स्पष्टपणे दिसून येतात.

आपलं आयुष्य बरबाद करणाऱ्यांना शिक्षा दिली पाहिजे, असा टाहो ती या चिठ्ठीतून फोडताना दिसत आहे. याच चिठ्ठीत तिने राहुल आणि दिशाला शिक्षा मिळेल तेव्हाच आपल्या आत्म्याला शांती मिळेल असं म्हटलं होतं.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.