The Kerala Story: केरळमधून 32 हजार महिला बेपत्ता कशा झाल्या? अंगावर काटा आणणारी कहाणी

'द काश्मीर फाइल्स'नंतर आता 'द केरळ स्टोरी'; टीझर पाहून अंगावर काटा येईल!

The Kerala Story: केरळमधून 32 हजार महिला बेपत्ता कशा झाल्या? अंगावर काटा आणणारी कहाणी
The Kerala Story
Image Credit source: Youtube
| Updated on: Nov 03, 2022 | 5:15 PM

मुंबई- केरळ राज्यांतील महिलांबाबत घडलेल्या एका प्रकरणाने संपूर्ण जग हादरलं होतं. केरळमधील 32 हजार महिला संशयास्पदरित्या बेपत्ता झाल्या होत्या. ISIS या दहशतवादी संघटनेने त्यांचं अपहरण केलं होतं. याच घटनेवर आता चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘द केरळ स्टोरी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. बेपत्ता झालेल्या महिलांसोबत नेमकं काय झालं, हे यातून पहायला मिळणार आहे. या टीझरमध्ये महिला अंगावर काटा आणणारी कथा सांगतेय.

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. सुदिप्तो सेन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. या चित्रपटासाठी त्यांनी चार वर्षे संशोधन आणि अभ्यास केला. हा चित्रपट केरळ आणि मँगलोरमधील जवळपास 32 हजार महिलांच्या अपहरणावर आधारित आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये अभिनेत्री अदा खान पहायला मिळत आहे.

या टीझरमध्ये अदा खान तिच्या भूमिकेची ओळख करून देताना म्हणते, “माझं नाव शालिनी उन्नीकृष्णन आहे. मला नर्स बनून लोकांची सेवा करायची होती. पण मी आता फातिमा बा झाली आहे. अफगाणिस्तानच्या तुरुंगात मी एकटी नाही तर माझ्यासारख्या 32 हजार मुली आहेत. ज्यांचं धर्मांतर झालंय. त्यांना सीरिया आणि येमेनच्या वाळवंटात दफन करण्यात आलंय. केरळमध्ये उघडपणे सर्वसामान्य मुलीला दहशतवादी बनवण्याचा भयानक खेळ सुरू आहे. याला कोणी थांबवणार नाही का? ही माझी कहाणी आहे.. ही त्या 32 हजार मुलींची कहाणी आहे.. ही केरळची कहाणी आहे.”

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2009 मध्ये केरळ आणि मँगलोरमधून सुमारे 32 हजार हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यांना बळजबरीने इस्लाम धर्म स्वीकारायला लावलं होतं. त्यांच्यापैकी बहुतांश मुलींना नंतर सीरिया, अफगाणिस्तान आणि इतर भागात पाठवलं गेलंय. या मुली पुन्हा घरी परतल्याच नाहीत, असं सांगण्यात येतं.