AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

36 वर्ष जुनी मालिका… एका झटक्यात होत्याचं नव्हतं झालं आणि 52 लोकांचा जागीच मृत्यू… तेव्हा नेमकं काय घडलेलं?

36 वर्ष जुन्या मालिकेचे 60 एपिसोड शूट झालेले, पण तेव्हा असं काही घडलं की, जागीत 52 लकोंचा मृत्यू झाला... आजही घटना आठवली की, मन सुन्न होतं... जाणून घ्या तेव्हा नेमकं काय आणि कसं घडलेलं?

36 वर्ष जुनी मालिका... एका झटक्यात होत्याचं नव्हतं झालं आणि 52 लोकांचा जागीच मृत्यू... तेव्हा नेमकं काय घडलेलं?
| Updated on: Mar 29, 2026 | 3:13 PM
Share

टीव्ही विश्वातील जगात अनेक असे किस्से दडलेले आहेत, जे समोर आल्यानंतर अंगावर काटा येते… असाच एक भयानक प्रकार घडलेला जेव्हा एका मोठ्या मालिकेचं शुटिंग सुरु होतं… सेटवर सर्वकाही सुरुळीत सुरुॉ होतं. लोक त्यांच्या कामात व्यस्त होते… पण कोणालाच माहिती नव्हतं की, पुढच्या काही क्षणात सर्वकाही बदलणार आहे. सेटवर अचानक लागलेल्या आगीमुळे लोकांची पळापळ सुरु झाली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लोक सर्वत्र पळू लागले… भीतीमुळे लोकांच्या ओरडण्याच्या आवाजाने तर वातावरण भयानक झालं होतं… या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ माजली होती…

सांगायचं झालं तर, सेटवर आजच्या काळात ज्या सुविधा होत्या त्या पूर्वी फार मर्यादित होत्या. क्षणात आगीने रौद्र रूप धारण केलं… आगीवर नियंत्रण मिळवणं देखील कठीण झालं होतं. अडकलेल्या लोकांना बाहेर निघण्यासाठी कोणताच पर्याय नव्हता, ज्यामुळे अनेकांनी स्वतःचे प्राण गमावले…

या घटनेनंतर सर्वांना धक्का बसला. इंडस्ट्रीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याची ही पहिलीच वेळ होती, ज्यामुळे सेटवरील सुरक्षेच्या महत्त्वावर विचार करण्यास सर्वांना भाग पडले. सध्या ज्या मालिकेची चर्चा होत आहे, ती मालिका दुसरी तिसरी कोणती नाही तर, ‘द स्वॉर्ड ऑफ टीपू सुल्तान’ मालिका होती. मालिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.

25 फेब्रुवारी 1990 ते 14 एप्रिल 1991 पर्यंत मालिका दुरदर्शनवर प्रसारित होत होती. पण मालिकेची ओळख केवळ कथेपुरती मर्यादित नव्हती. चित्रीकरणादरम्यान झालेल्या एका भीषण अपघाताने ती मालिका कायमची अविस्मरणीय बनवली. या मालिकेचे दिग्दर्शक, निर्माते आणि मुख्य अभिनेते संजय खान होते, ज्यांनी टिपू सुलतानची भूमिका साकारली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, त्या दिवशी, म्हैसूरमधील प्रीमियर स्टुडिओमध्ये चित्रीकरण सुरू असताना सेटवर अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की काही मिनिटांतच संपूर्ण सेट जळून गेला. या घटनेत जवळपास 52 लोकांचा मृत्यू झाला. संजय खान हे देखील आगीत गंभीररित्या भाजले, त्यांचं सुमारे 65 टक्के शरीर भाजलं होतं. आजही ही घटना टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या दुर्घटनांपैकी एक मानली जाते.

या धक्कादायक घटनेबद्दल मालिकेत काम करणाऱ्या अनंत महादेवन यांनी मोठा खुलासा केलेला. एका मुलाखतीत ते म्हणालेले, ‘त्या दिवशी मला सतत असं वाटत होत की, काही तरी वाईट होणार आहे. या घटनेनंतर सर्वांमध्ये भीतीचं वातावरण होतं… जे आगीतून बचावले त्यांनी त्यांच्या घरी फोन करून जिवंत असल्याचं सांगितल…’ असं अभिनेते म्हणाले होते.

Follow Us
पर्यटनासाठी चालेले आहात? ही बातमी तुमच्यासाठीच, महाबळेश्वरमध्ये जमीन
पर्यटनासाठी चालेले आहात? ही बातमी तुमच्यासाठीच, महाबळेश्वरमध्ये जमीन खचली, चक्क 233...
Power Corrupts...; ठाकरेंची पोस्ट व्हायरल! साटम प्रकरणावर सरकारला घेरल
Raj Thackeray | Power Corrupts...; राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल! अमित साटम प्रकरणावर सरकारला घेरलं
मुसळधार पावसाने अंधेरी ठप्प! वीरा देसाई रोडने घेतले नदीचे रूप
Andheri Veera Desai Road | मुसळधार पावसाने अंधेरी ठप्प! वीरा देसाई रोडने घेतले नदीचे रूप, दुकानदारांचे मोठे नुकसान
मोठी घडमोड! ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात प्रवेश करताच पदाधिकाऱ्याचं
मोठी घडमोड! ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात प्रवेश करताच महिला पदाधिकाऱ्याचं मोठं विधान; थेट नाव...
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य कार्यालयात...
मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा....
धो धो येतो आणि झोडतच राहतो... मुंबई उपनगरात पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा
मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत सुरू असलेल्या
DCM Health Update | मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात असतानाच...
दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! तक्रारी करूनही BMC झोपेत
Mumbai | दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! वारंवार तक्रारी करूनही BMC झोपेत; थोडक्यात...
ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी..
Thane Rain | ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी जाहिर
राज्यात पवासाचं थैमान; हेल्पलाईन नंबर जारी; मुख्यमंत्र्याकडून नागरिक
Mumbai Thane Helpline Number |राज्यात पवासाचं थैमान; हेल्पलाईन नंबर जारी; मुख्यमंत्र्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन