AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाहेरुन सुंदर पण प्लास्टिकचं मन…, ऐश्वर्या राय बद्दल असं का म्हणाला एक्स-बॉयफ्रेंड?

Aishwarya Rai Bachchan | दिसायला सर्वांत सुंदर असली तरी तिचं मन प्लास्टिकचं, कारण..., ऐश्वर्या राय हिच्याबद्दल एक्स-बॉयफ्रेंडचं मोठं वक्तव्य, अनेक वर्षांनंतर सत्य समोर... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा...

बाहेरुन सुंदर पण प्लास्टिकचं मन..., ऐश्वर्या राय बद्दल असं का म्हणाला एक्स-बॉयफ्रेंड?
| Updated on: May 17, 2024 | 12:07 PM
Share

अभिनेत्री ऐश्वर्या राय आता पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन यांच्यासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा ऐश्वर्या फक्त तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यात आता पुढे निघून गेले असले तरी, भूतकाळामुळे चर्चेत असतात. ऐश्वर्याचा एक्स – बॉयफ्रेंड आणि अभिनेता विवेक ओबेरॉय याने काही दिवसांपूर्वी कोरियोग्राफर फराह खान हिला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या हिचं मन प्लास्टिकसारखं असं म्हणाला होता. अभिनेता असं का म्हणाला होता जाणून घेऊ…

विवेक म्हणाला, ‘एवढं सगळं झाल्यानंतर देखील ऐश्वर्या हिला माझे आभार मानावे असं वाटलं नाही. उलट मी बालीशपणा करत आहे. असं तिचं म्हणणं होतं. मला ऐश्वर्याकडून अशा प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती. मला यामुळे मोठा धक्का बसला होता. माझ्या आयुष्यातील तो सर्वात मोठा धक्का होता.’

पुढे विवेक याने बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल देखील धक्कादायक वक्तव्य केलं, ‘प्लास्टिक कंपन्यांमध्ये जेवढं प्लास्टिक तयार होत नसेल, त्यापेक्षा जास्त प्लास्टिक बॉलिवूड इंडस्ट्री आणि इंडस्ट्रीमधील लोकांच्या मनात आहे.’, रिपोर्टनुसार, ऐश्वर्या आणि विवेक यांनी एकमेकांना 2 वर्ष डेट केलं.

सांगायचं झालं तर, 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्यों हो गया ना’ सिनेमात ऐश्वर्या आणि विवेक यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. तेव्हा ऐश्वर्या हिचं अभिनेता सलमान खान याच्यासोबच ब्रेकअप झालं होतं. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान ऐश्वर्या आणि विवेक यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

जवळपास दोन ऐश्वर्या आणि विवेक यांनी एकमेकांना डेट केलं. पण एक दिवस विवेक याने पत्रकार परिषद घेतली आणि सलमान खान याच्यावर अनेक आरोप केले. याचा परिणाम ऐश्वर्या हिच्यासोबत असलेल्या नात्यावर देखील झाला. ज्यामुळे ऐश्वर्या आणि विवेक यांचे मार्ग वेगळे झाले.

सलमान खान याच्यासोबत झालेल्या भांडणांमुळे विवेक याचं बॉलिवू़डमध्ये करियर देखील संपलं. ऐश्वर्या हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर विवेक याने प्रियंका अलवा हिच्यासोबत लग्न केलं. अभिनेता आता कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. तर सलमान खान मात्र वयाच्या 58 व्या वर्षी देखील एकटाच आहे.

सलमान खान याने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्यापासून अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यापर्यंत अनेक अभिनेत्रींना भाईजान याने डेट केलं आहे. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत सलमान खान याचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.