AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायकोला खुश कसं करायचं? अमिताभ बच्चन यांनी ती खाजगी गोष्ट, म्हणून 53 वर्षानंतरही आहेत सोबत

बायकोला खुश ठेवण्यासाठी अभिनेते अमिताभ बच्चन काय करतात? अमिताभ बच्चन यांनी सांगितली अत्यंत खाजगी गोष्ट. म्हणून 53 वर्षानंतर देखील आहेत सोबत.

बायकोला खुश कसं करायचं? अमिताभ बच्चन यांनी ती खाजगी गोष्ट, म्हणून 53 वर्षानंतरही आहेत सोबत
Image Credit source: Social media
| Updated on: Jan 22, 2026 | 12:10 PM
Share

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांचं नातं अनेकांसाठी यशस्वी आणि आदर्श मानलं जातं. त्यांच्या लग्नाला तब्बल 53 वर्षे पूर्ण होऊनही आजही या दोघांमधील समजूतदारपणा, परस्पर आदर आणि दोघांमधील प्रेम तसंच टिकून आहे. त्यामुळेच अनेक जण अमिताभ बच्चन यांना नेहमीच विचारतात की, पत्नीला आनंदी ठेवण्याचं रहस्य नेमकं काय?

याच प्रश्नाचं उत्तर बिग बी यांनी लोकप्रिय टीव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती’ च्या एका भागात दिलं आहे. एका स्पर्धकाने गंमतीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमिताभ बच्चन यांनी केवळ वैवाहिक आयुष्यच नाही तर संपूर्ण जीवनावर लागू पडेल अशी खोल आणि मोलाची शिकवण दिली.

पती-पत्नीच्या नात्यात हलकी-फुलकी खट्टी-मीठी नोकझोक होणं हे अगदी साहजिक आहे. मात्र, कधी कधी या छोट्या गोष्टी मोठ्या वादात बदलतात आणि घरातील शांतता भंग होते. दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम राहिले तर परिस्थिती अधिकच बिघडू शकते. अशा वेळी अमिताभ बच्चन यांचा अनुभवातून दिलेला सल्ला खूपच उपयोगी ठरू शकतो.

अहंकार सोडणं हीच यशस्वी लग्नाची गुरुकिल्ली

आपल्या 53 वर्षांच्या वैवाहिक अनुभवावरून अमिताभ बच्चन यांनी पत्नीला आनंदी ठेवण्याचा सोपा मार्ग सांगितला आहे. जर एखाद्याला आनंदी आणि टिकाऊ संसार हवा असेल तर थोडी समजूतदारपणा दाखवणं आणि अहंकार बाजूला ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. अनेकदा आपण बरोबर आहोत हे सिद्ध करण्याच्या नादात नात्यात दुरावा निर्माण होतो.

बिग बी यांच्या मते, पती-पत्नीच्या नात्यात खरी हार-जीत नसतेच. लग्न झाल्यानंतर दोघंही एक टीम बनून आयुष्यातील आव्हानांना सामोरं जात असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी स्वतःचीच बाजू जिंकावी असा विचार करणं चुकीचं ठरू शकतं. ते म्हणाले की, ‘जर घरात शांतता आणि प्रेम टिकवायचं असेल तर सतत भांडणं आणि वाद घालण्याऐवजी जोडीदाराचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्या आणि कधी वेळ आलीच तर मागे हटायलाही शिका.’ कधी कधी पत्नीला जिंकू देणं ही कमजोरी नसून खरी समजूतदारपणा असल्याचं त्यांनी सांगितलं.

अमिताभ आणि जया बच्चन यांच्या नात्यातून एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते. लग्न फक्त मोठ्या क्षणांमुळे टिकत नाही तर रोजच्या आयुष्यातील छोट्या समजूतदारपणामुळे, संयमामुळे आणि एकमेकांना साथ देण्यामुळे ते मजबूत राहतं. हीच आहे यशस्वी आणि आनंदी संसाराची खरी गुरुकिल्ली.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.