AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री 4-4 तास मी पायऱ्यांवर बसून..; आई-वडिलांच्या भांडणांविषयी रणबीर कपूर व्यक्त

'रॉकस्टार' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी अभिनेता रणबीर कपूर एका मुलाखतीत त्याच्या आई-वडिलांच्या भांडणाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या भांडणांमुळे शाळेत लाज वाटायची, असंही तो म्हणाला होता.

रात्री 4-4 तास मी पायऱ्यांवर बसून..; आई-वडिलांच्या भांडणांविषयी रणबीर कपूर व्यक्त
Rishi, Neetu and Ranbir KapoorImage Credit source: Instagram
| Updated on: May 17, 2024 | 11:01 AM
Share

अभिनेत्री नीतू कपूर या एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होत्या. सत्तरच्या दशकात त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मात्र अभिनेते ऋषी कपूर यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांनी अभिनयक्षेत्रातून ब्रेक घेतला. ऋषी कपूर आणि नीतू कपूर ही जोडी त्यावेळी चांगलीच चर्चेत होती. त्यांचं वैवाहिक जीवन अनेकदा माध्यमांमध्ये चर्चेचा विषय असायचा. आता रणबीरची एक जुनी मुलाखत पुन्हा व्हायरल होऊ लागली आहे. ‘रॉकस्टार’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी त्याने ही मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तो आई-वडिलांच्या भांडणांविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता.

‘द बिग इंडियन पिक्चर’ला दिलेल्या या मुलाखतीत रणबीर म्हणाला, “त्यावेळी मीडियामुळे एवढा फरक पडत नव्हता. कारण मीसुद्धा त्यावेळी खूप तापट होतो. मी माझ्या आईवडिलांसोबत राहतो. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात तो कठीण काळ आला होता, त्याचा साक्षीदार मीसुद्धा होतो. मी ज्या बंगल्यात राहतो, तिथे माझे आई-वडिल खालच्या मजल्यावर मी आणि वरच्या मजल्यावर राहतो. मला अजूनही आठवतंय की मी पायऱ्यांवर चार-चार तास बसून असायचो. रात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत मी त्यांना भांडताना ऐकायचो. त्यांच्या रुममधून मला वस्तूंच्या तोडफोडीचा आवाज यायचा. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा क्षण येतो. फक्त माझे पालक सेलिब्रिटी असल्याने त्यांच्या भांडणाची चर्चा मीडियामध्ये होते.”

“आईवडिलांमधील वादाच्या बातम्यांमुळे शाळेत मला थोडीशी लाज वाटायची. अशा घटनांचा उल्लेख तुमचे मित्र तुमच्याकडे करत नाहीत, कारण ते तुमचे चांगले मित्र असतात. पण मला माहित होतं की काय घडतंय. तरीसुद्धा तुम्ही त्याला सामोरं जाता”, असं त्याने पुढे सांगितलं.

नीतू कपूर यांनी 22 जानेवारी 1980 रोजी अभिनेते ऋषी कपूर यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर त्यांचा ‘गंगा मेरी मा’ हा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सप्टेंबर 1980 मध्ये नीतू यांनी मुलगी रिधिमाला जन्म दिला. तर सप्टेंबर 1982 मध्ये रणबीर कपूरचा जन्म झाला. लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी 2009 मध्ये नीतू कपूर यांनी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केलं होतं. तर एप्रिल 2020 मध्ये ऋषी कपूर यांचं कॅन्सरने निधन झालं.

सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान.
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया.