AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीदेवी यांचा मृतदेह दुबईहून भारतात कोणी पाठवला? परदेशातून भारतात पार्थिव आणण्याची काय आहे प्रक्रिया?

दुबईत बाथटबमध्ये श्रीदेवी यांनी घेतला अखेरचा श्वास, दुबईतून भारतात कोणी पाठवला अभिनेत्रीचा मृतदेह? आतापर्यंत 'त्या' व्यक्तीने अनेक मृतदेह भारतात आणण्यासाठी घेतलाय पुढाकार...

श्रीदेवी यांचा मृतदेह दुबईहून भारतात कोणी पाठवला? परदेशातून भारतात पार्थिव आणण्याची काय आहे प्रक्रिया?
| Updated on: Mar 01, 2025 | 8:16 AM
Share

Sridevi: 2018 मध्ये श्रीदेवी यांच्या निधनाची माहिती समोर आली आणि सर्वांना मोठा धक्का बसला. दुबईत एका लग्नासाठी गेलेल्या श्रीदेवी यांचं अचानक निधन झाल्यामुळे कुटुंबावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला. आज श्रीदेवी यांच्या निधनाला अनेक वर्ष झाली आहेत. तरी देखील त्यांच्या अनेक आठवणी सिनेमांच्या माध्यमातून जिवंत आहेत. श्रीदेवी यांचं निधन झाल्यानंतर त्याचं पार्थिव भारतात येईल का? असा प्रश्न अनेक चाहत्यांनी उपस्थित केला होता. यावेळी एका व्यक्तीने अभिनेत्रीचा मृतदेह भारतात आणण्यासाठी कुटुंबियांची मदत केली होती.

श्रीदेवी यांचा मृतदेह दुबईहून भारतात आणण्यासाठी अशरफ थामारास्सेरी यांनी मदत केली होती. कुटुंबियांच्या वतीने अशरफ यांनीच अभिनेत्रीचा मृतदेह दुबईतील अधिकाऱ्यांकडून घेतला होता. अशरफ यांनी श्रीदेवी यांचा मृतदेह भारतात पाठवला होता. अशरफ यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अशरफ हे मूळचे केरळचे असून सध्या अरब अमिरातीतील अजमान येथे राहतात.

अशरफ यांनी फक्त श्रीदेवी यांचाच नाही तर, अन्य अनेक पार्थिव देखील त्यांच्या नातेवाईकांपर्यंत मोफत पोहोचवले आहेत. पण दुसऱ्या देशात आपल्या देशात पार्थिव आणण्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. शिवाय काही कागदपत्रांची देखील गरज भासते.

काय आहे पूर्ण प्रक्रिया?

– कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर हॉस्पिटलमधून मृत्यू घोषणा पत्र घ्यावं लागतं आणि त्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यात सांगवं लागते. त्यानंतर दुबई पोलिस ना हरकत प्रमाणपत्र जारी करतात आणि मृत्यू प्रमाणपत्र जारी केलं जातं. त्या मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे पुढील प्रक्रिया ठरवावी लागते. या मृत्यू प्रमाणपत्रात मृत्यूचे कारणही लिहिलेलं असते.

– मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्यानंतर व्हिसा किंवा लेबर कार्डबाबत काम करावं लागतं. या प्रक्रियेत, कामगार मंत्रालय आणि इमिग्रेशन विभागाकडून मृत व्यक्तीचा व्हिसा किंवा लेबर कार्ड रद्द करावं लागतं.

व्हिसा रद्द झाल्यानंतर, मृत व्यक्तीच्या कुटुंबाला कार्गो बुकिंग करावं लागतं. कार्गो बुकिंगची प्रक्रिया झाल्यानंतर, एअरलाइनला कन्फरमेशन लेटर सोबत हॉस्पिटलशी संपर्क साधावा लागतो, जेथे एम्बॅलिंग प्रमाणपत्र आणि विमानतळाला ना हरकत पत्र दिले जाते. व्यक्ती व्हीआयपी असल्यास प्रक्रिया वेगळी असू शकते.

– या तीन कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा लागतो. मृत्यूची नोंद झाल्यानंतर, भारतीय दूतावास मृत्यू प्रमाणपत्र जारी करते आणि मृत व्यक्तीचा पासपोर्ट रद्द करते.त्यासोबत वैद्यकीय कागदपत्रांची माहिती घेतल्यानंतर मृतदेह विमानतळावर नेण्याचे पत्र दिले जाते.

यावेळी कोणत्या कागदपत्रांची भासते गरज…

– मेडिकल रिपोर्ट

– मृत्यू प्रमाणपत्र

– पोलीस रिपोर्ट (इंग्रजी भाषांतर आवश्यक)

– पासपोर्ट आणि व्हिजा कॉपी

– अन्य कागदपत्र

सांगायचं झालं तर, ही प्रक्रिया प्रत्येक देशाच्या स्थानिक नियमांच्या आधारे बदलली जाऊ शकते आणि त्या आधारावर प्रक्रिया पूर्ण केली जाते.

Follow Us
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.