AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘डर लगे तो बोल या अली मदद… ‘, हिंदू – मुस्लिम मुद्द्यावर असं काय म्हणाले महेश भट्ट?

बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. महेश भट्ट त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकताच झालेल्या मुलाखतीत महशे भट्ट यांनी हिंदू - मुस्लिम मुद्द्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.

'डर लगे तो बोल या अली मदद... ', हिंदू - मुस्लिम मुद्द्यावर असं काय म्हणाले महेश भट्ट?
फाईल फोटो
| Updated on: Apr 29, 2025 | 9:49 AM
Share

Mahesh Bhatt on Hindu Muslim Violence : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या घटनेवरून देशभरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी ज्या पद्धतीने 28 निष्पाप लोकांना त्यांचा धर्म विचारून मारलं ते अत्यंत संतापजनक आहे. हल्ल्यानंतर मोदी सरकराने अनेक मोठे निर्णय घेत पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आहे. एवढंच नाही तर, अनेक सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून तिव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता बॉलिवूडचे दिग्दर्शक महेश भट्ट यांनी देखील हिंदू – मुस्लिम मुद्द्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय महेश भट्ट यांनी लहानपणीचं उदाहरण देखील दिलं आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत महेश भट्ट म्हणाले, ‘माझी आई सिया मुसलमान होती आणि वडील नागर ब्राह्मण… लहानपणी आई माझी तयारी करायची आणि शाळेत पाठवायची तेव्हा सांगायची बेटा तू एक नागर ब्राह्मणाचा मुलगा आहे. भार्गव गोत्र आहे आणि आश्विन शाखा आहे. जेव्हा तुला भीती वाटेल तेव्हा फक्त म्हण की ‘या अली मदद कर”

पुढे महेश भट्ट म्हणाले, ‘तेव्हा आम्ही हिंदूस्तानसाठी एक उदाहरण होतो. शिष्टाचाराचं रत्न होतो. शिष्टाचार… सत्य असलेल्या या संस्कृतीला, जखमेसारखे वाहून नेण्याची वेळ येईल असं आपल्याला कधीच वाटलं नव्हतं.’ सध्या सर्वत्र महेश भट्ट यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

महेश भट्ट यांच्या करीयरबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले आहे. महेश भट्ट यांनी अर्थ, सारांश, नाम, लहू के दो रंग, डॅडी, आशिकी, दिल है कि मानता नहीं, गुनाह, सर, नाजायज, पापा कहते हैं, ये है मुंबई मेरी जान आणि सडक 2 अशा अनेक सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.

महेश भट्ट यांनी मुलगी आणि अभिनेत्री आलिया भट्ट आता बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. आलियाने देखील आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. चाहते देखील आलियाच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत असतात. आलिया भट्ट फक्त  तिच्या प्रोफेशनल नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील असते चर्चेत…

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.