AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KBC 12 | कमजोरीला बनवले शस्त्र, तुम्हाला माहितीय अरुणिमा सिन्हा यांचा थक्क करणारा प्रवास?

संकटांचा डोंगर समोर असताना देखील न डगमगता त्याला सोमोरे जाणाऱ्या अरुणिमा सिन्हा आहे. आज, 'कौन बनेगा करोडपती' सीझन 12 (KBC 12) च्या कर्मवीर स्पेशल एपिसोडमध्ये अरुणिमा सिन्हा येणार आहेत.

KBC 12 | कमजोरीला बनवले शस्त्र, तुम्हाला माहितीय अरुणिमा सिन्हा यांचा थक्क करणारा प्रवास?
| Updated on: Dec 11, 2020 | 2:59 PM
Share

मुंबई : संकटांचा डोंगर समोर असताना देखील न डगमगता त्याला सोमोरे जाणाऱ्या अरुणिमा सिन्हा आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ सीझन 12 (KBC 12) च्या कर्मवीर स्पेशल एपिसोडमध्ये अरुणिमा सिन्हा येणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसणार आहेत. अरुणिमा सिन्हा ही एक अशी व्यक्ती आहे की, अपघातात पाय गमावले पण त्यांनी कधीही हार मानली नाही. एक पाय गमावल्यामुळे, ज्यांनी अरुणिमाला कमकुवत मानले, त्यांनी पद्मश्री विजयाने आपले हत्यार बनवले. (KBC 12 You know the astonishing journey of Arunima Sinha)

शो दरम्यान, अमिताभने अरुणिमाला विचारतात की, एव्हरेस्ट चढणे ही एक सोप्पी गोष्ट नाही, किती लोकांनी प्रयत्न केला असेल, सोडून दिले असते, परंतु तुम्ही या अवस्थेत एव्हरेस्टची यशस्वी चढाई कशी केली ? यावर अरुणिमा म्हणाल्या- “मी जेव्हा रुग्णालयाच्या पलंगावर होते आणि बातम्या येत होत्या की, अरुणिमाकडे तिकीट नव्हते टीटीने तिकीट मागितल्यावर अरुणिमाने उडी मारली. दुसर्‍या दिवशी मी पाहिले की असे लिहिले होते की अरुणिमा आत्महत्येसाठी गेली होती.

त्या पुढे म्हणाल्या की, मी पुढे पाहिले की, पुढच्या पानावर गिर्यारोहणाचा एक लेख होता, त्यात माउंट एव्हरेस्टचे मा्र्ग देण्यात आले होते. मी ते वाचले आणि मनात ठरविले की, ज्याला लोक सर्वात मोठी कमजोरी मानतात त्यालाच मी माझे शस्त्र बनवले आणि नंतर मी एव्हरेस्टची चढाई यशस्वीपणे पूर्ण केली. अरुणिमा सिन्हा एक अशी व्यक्ती आहे की, त्यांच्या जिद्दीसमोर एव्हरेस्टही छोटे पडले. अरुणिमा हा देशातील पहिला दिव्यांग गिर्यारोहक ठरल्या आहेत. २०११ मध्ये व्हॉलीबॉल राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू अरुणिमा यांना काही गुंडांनी चालत्या ट्रेनमधून खाली फेकले होते. अरुणिमा सिन्हा असह्य वेदनेने रात्रभर रेल्वे रुळावर पडून होत्या. या घटनेत त्यांना एक पाय गमवावा लागला आणि दुसर्‍या पायात रॉड बसविण्यात आला. जणू सुवर्ण कारकीर्दीमध्ये ब्रेक लागला होता. पण अरुणिमा कधीच हरायला शिकल्या नाहीत. त्यानी मनात ठरवले की काहीतरी करावे लागेल, दोन वर्षातच अरुणिमाने स्वत: ला तयार केले आणि जगातील सर्वात उंच डोंगर माउंट एव्हरेस्ट वर चढाई करून देशाचा तिरंगा फडकवला. केवळ माउंट एव्हरेस्टच नाही तर त्यांनी आणखी दुर्गम डोंगरांवर चढाई केली. 2015 मध्ये अरुणिमाला पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

संबंधित बातम्या :

जेव्हा पंकजांसमोर साक्षात अजित पवार-शरद पवार अवतरतात…

Indoo Ki Jawani | कियारा अडवाणीचा ‘इंदू की जवानी’ चित्रपट प्रदर्शित, कोरोना काळातही बॉक्स ऑफिसवर धमाल होणार?

(KBC 12 You know the astonishing journey of Arunima Sinha)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.