AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ वयोगटातील 75 टक्के भारतीयांना हृदयविकाराचा धोका अधिक; वाचा नवं संशोधन काय सांगतं?

पन्नाशीपेक्षा कमी वयाच्या 75 टक्के लोकांना हृदयविकाराचा धोका अधिक असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. देशभरातील वैद्यकीय संशोधकांनी केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. (75% Indians below 50 at risk of heart attack)

'या' वयोगटातील 75 टक्के भारतीयांना हृदयविकाराचा धोका अधिक; वाचा नवं संशोधन काय सांगतं?
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Oct 01, 2021 | 7:40 AM
Share

हैदराबाद: पन्नाशीपेक्षा कमी वयाच्या 75 टक्के लोकांना हृदयविकाराचा धोका अधिक असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. देशभरातील वैद्यकीय संशोधकांनी केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कमीत कमी 25 टक्के भारतीयांना हृदयविकाराचा झटका किंवा हृदयाशी संबंधित अन्य आजाराचा धोका असल्याचं दिसून आलं आहे. हा धोका 40 ते 50 वयोगटातील लोकांमध्ये 50 टक्क्याने वाढू शकतो.

भारतीय तरुणांनी चांगलं अन्न घेण्यावर आणि उत्साही जीवन जगण्यावर भर दिला पाहिजे. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून ताणतणावापासून मुक्त राहून आनंदीत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वाढता तणाव आणि बेदरकार जीवनशैली यामुळे हृदयाशी संबंधित आजारात वाढ होत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

पुरुषांना अधिक धोका

अनेक सामाजिक मानकांवर भारताची रेटिंग खराब आहे. प्रत्येक वर्षागणिक लोक तणावात जगत आहेत. व्यक्तिगत कारणांशिवाय सामाजिक समस्या आणि त्यातून उद्भवणारे तणाव यामुळे हृदयाशी संबंधित आजारांना आमंत्रण मिळत आहे. या गोष्टींचा त्यांच्या हृदयावर थेट परिणाम होत आहे. या बाबतीत पुरुषांनाच सर्वाधिक धोका असतो, असं ग्लेनिगल्स ग्लोबल हॉस्पिटलचे के. एम. साई सुधाकर यांनी सांगितलं. नवभारत टाईम्सशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

हृदयरोग्यांची संख्या वाढली

भारतीय ट्रान्स फॅटचे अभ्यस्त उपभोक्ते आहेत. बेदरकार जीवशैली, कामाची अनियमितता, दारू, धुम्रपान, तंबाखूचं व्यसन यामुळे हृदयरोगाचा धोका वाढत असतो. त्यामुळे व्यक्ति अधिक कमकुवत होतो. हृदयविकाराच्या झटके येण्याच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हार्मोनल असंतुलित झाल्यानं हा प्रकार होऊ शकतो. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा त्रास असलेले लोक या अडचणीत सापडू शकतात. त्यामुळे हृदयाशी संबंधित काहीही अडचण निर्माण झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, असं आवाहन सीनियर इंटरवेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आणि एसएलजी हॉस्पिटल्सचे व्ही. हरिराम यांनी सांगितलं.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी 6 आयुर्वेदिक टिप्स

निरोगी आहार

आयुर्वेदात आहाराला विशेष महत्त्व आहे. कारण अन्न हे नेहमी औषध मानले गेले आहे. निरोगी हृदयासाठी निरोगी आहार निवडणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आहारात प्रथिने आणि भाज्यांचा समावेश करा जसे की भोपळा, पालेभाज्या, हरभरा (मूग), मसूर, टोफू, इ. आपल्या आहारात बदाम, अक्रोड सारख्या सुक्यामेव्याचा समावेश करा. काळ्या मिरी आणि हळद सारख्या काही मसाल्यांचा देखील अन्नात समावेश करा.

मेडिटेशन

अनेक संशोधनानुसार, नियमित मेडिटेशन केल्याने काही प्रमाणात हृदयरोगाचा धोका कमी होतो. ध्यान केल्याने आपले मन शांत राहते. हे आपल्याला तणाव दूर करण्यास मदत करते. यामुळे मनाला विश्रांती मिळते. तसेच आपल्या हृदयावरील ताण कमी होतो. मेडिटेशन तुमच्या हृदयाची कार्यप्रणाली सुधारते.

व्यायाम आणि योगा

नियमितपणे 30 मिनिटे चालणे केवळ आपल्या हृदयासाठीच नाही तर रक्ताभिसरण सुधारण्यास, विष बाहेर टाकण्यास आणि चयापचय सुधारण्यास मदत करते. तसेच योगासन हे श्वासोच्छवासाचे तंत्र आणि ध्यान यांचे उत्तम संयोजन आहे. जे आरोग्याच्या समस्यांवर मात करण्यास मदत करते. योगा हृदयाला निरोगी ठेवतो, रक्तदाब नियंत्रित करणे, हृदयाचे ठोके सुधारणे, खराब कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करणे आणि रक्त परिसंचरण वाढवणे.

ताण नियंत्रित करते

तणाव निरोगी हृदयाच्या कार्यामध्ये मोठी भूमिका बजावते. यामुळे तुमच्या कोलेस्टेरॉलची पातळी झपाट्याने वाढू शकते. हे रक्तदाब देखील वाढवू शकते, ज्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आजार होऊ शकतात. त्यामुळे ताण नियंत्रित करणे महत्वाचे आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील सामान्य दिनक्रमातून ब्रेक घ्या. तणाव कमी करण्याच्या सोप्या आणि प्रभावी मार्गांनी ध्यान, विश्रांती, व्यायाम करा.

पुरेशी झोप

झोप आवश्यक आहे. कारण ते शरीराला रिचार्ज करण्यासाठी वेळ देते. झोपेचा अभाव हृदयरोग, हृदयविकाराचा झटका, मधुमेह आणि स्ट्रोकचा धोका वाढवू शकतो. अशा परिस्थितीत, निरोगी जीवनशैलीचे पालन करण्याचा एक मार्ग म्हणजे चांगली झोप घेणे.

औषधी वनस्पती

आपल्या आहारात औषधी वनस्पतींचा समावेश केल्यास हृदयाच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो. दालचिनी, लसूण, लाल मिरची, आले, हळद यासारख्या औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा उपयोग अनेक औषधी गुणधर्मांसाठी हजारो वर्षांपासून केला जात आहे.

संबंधित बातम्या:

Headache Yoga Mudra : डोकेदुखीची समस्या दूर करण्यासाठी ‘ही’ 5 योगासने फायदेशीर !

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(75% Indians below 50 at risk of heart attack)

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.