AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayurveda Tips: थायरॉईड-आर्थरायटिससह ‘हे’ 10 आजार राहतील नियंत्रणात; रोज असेच प्यावे पाणी!

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले आहे. तुमच्या चुकीच्या सवयींमुळेही तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. तज्ज्ञांच्या मते, पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे तुम्हाला, संधिवात, थायरॉईस सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. जाणून घ्या, तज्ज्ञांनी सांगीतलेल्या हेल्दी टिप्स, ज्यामुळे थायरॉईड संधिवात सारख्या 10 आजारांवर नियंत्रण ठेवता येते.

Ayurveda Tips:  थायरॉईड-आर्थरायटिससह ‘हे’ 10 आजार राहतील नियंत्रणात; रोज असेच प्यावे पाणी!
Ayurveda Tips: थायरॉईड-आर्थरायटिससह ‘हे’ 10 आजार राहतील नियंत्रणातImage Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Aug 02, 2022 | 4:39 PM
Share

प्रौढ मानवी शरीरात 60% पर्यंत पाणी असते. ज्यातून आपला मेंदू आणि हृदय, फुफ्फुसे, त्वचा, स्नायू, मूत्रपिंड, अगदी हाडांमध्येही पाणी (Water even in the bones) असते. अशा परिस्थितीत दररोज पुरेसे पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. पाण्यामुळे शरीरातील निर्जलीकरण टाळता येते. त्यामुळे, मूड चेंज, बद्धकोष्ठता, किडनी स्टोन यांसारख्या समस्या टाळण्याचे काम करते. शरीरात पाण्याची कमतरता लघवीच्या रंगावरून ओळखता येते. जर तुमच्या लघवीचा रंग स्वच्छ (Urine color clear) पाण्यासारखा नसेल, तर तुमच्या शरीरात पुरेसे पाणी नाही. पाण्यात कॅलरीज नसतात, त्यामुळे ते शरीराचे वजन नियंत्रित करण्यात आणि गोड चहा किंवा नियमित सोडा यांसारख्या कॅलरीयुक्त पेये बदलून कॅलरी कमी करण्यात मदत करू शकते. परंतु, पाणी पिण्याची योग्य पद्धत असते, योग्य पद्धतीने पाणी पिल्यास, शरीराला अनेक रोगांपासून दूर (Away from diseases) ठेवता येते.

पाणी पिण्याचे काय आहेत फायदे?

पाणी तुमच्या शरीराचे तापमान सामान्य ठेवते. यासह, संपूर्ण शरीराचे आरोग्य राखते, पाठीचा कणा आणि इतर संवेदनशील मांसपेशींचे संरक्षण करते, लघवी, घाम येणे आणि मलविसर्जनाद्वारे शरीरातील कचरा काढून टाकण्याचे कार्य फक्त पाण्याद्वारेच केले जाते.

आयुर्वेद तज्ज्ञ काय म्हणतात?

आयुर्वेद तज्ञ डॉ. नितिका कोहलीने नुकतीच त्यांच्या इन्स्टा पोस्टवर आरोग्यदायी पद्धतीने पाणी पिण्याची माहिती शेअर केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे लाभदायक आहे का. असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. तर मी म्हणेन की, तांब्याचे पाणी त्याच्या अनेक आरोग्य फायद्यांसाठी ओळखले जाते. फक्त लक्षात ठेवा की, तांब्याचे भांडे शुद्ध धातूंचे बनले आहे व तितकेच स्वच्छ आहे. थायरॉईड, त्वचारोग, संधिवात यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी अशा प्रकारे पाण्याचे सेवन करणे चांगले आहे. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारते.

थायरॉईड आजारावर उपयोगी

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तांब्याच्या कमतरतेमुळे थायरॉईड ग्रंथींमध्ये बिघाड होतो. या प्रकरणात, तांबे पाणी थायरॉईड ग्रंथीची कार्यक्षमता संतुलित करते. तुम्हाला थायरॉइडची समस्या असल्यास, तांब्याच्या भांड्यात रोज पाणी पिणे तुमच्यासाठी एक आरोग्यदायी पर्याय आहे.

संधीवात आणि सांधे दुखी कमी करते

तांब्याचे पाणी हाडांना मजबूत बनवून आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. हे संधिवाता साठी एक उत्कृष्ट उपचार करते. तांब्याचा दाहक-विरोधी प्रभाव संधिवात असलेल्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे सांधेदुखीची समस्याही कमी होते.

पचनास मदत करते

तांब्याचे पाणी प्रदूषक आणि हानिकारक जंतू काढून टाकते. यासह, ते पोटाची जळजळ कमी करते, आणि चयापचय वाढवते आणि पचन सुधारते.

Follow Us
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष...
ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भारत आणि चीनमध्ये सात महत्त्वाचे करार झाले. हे करार दोन्ही देशांमधील संबंधांना रणनीतिक आणि दीर्घकालीन स्वरूप देतील, सीमावादावर तोडगा काढतील, आर्थिक संबंध वाढवतील आणि जागतिक आव्हानांवर सहकार्य करतील.
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार