AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न झालेल्यांच्या तुलनेत ‘अविवाहीत’ लोकांचा ‘या’ गंभीर आजारामुळे मृत्यू होण्याची शक्यता अधिक; तुम्हीही द्या लक्ष !

लग्न झालेल्या लोकांच्या तुलनेत सिंगल लोकांचा पोटाच्या कॅन्सरमुळे मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते, अशी माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. तसेच विवाहीत लोकांची कॅन्सरमधून वाचण्याची शक्यता खूप जास्त असते, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

लग्न झालेल्यांच्या तुलनेत 'अविवाहीत' लोकांचा 'या' गंभीर आजारामुळे मृत्यू होण्याची शक्यता अधिक; तुम्हीही द्या लक्ष !
लग्न झालेल्यांच्या तुलनेत 'अविवाहीत' लोकांचा 'या' गंभीर आजारामुळे मृत्यू होण्याची शक्यता अधिक; तुम्हीही द्या लक्ष !Image Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jul 09, 2022 | 10:25 AM
Share

अविवाहीत राहिल्यामुळे, लग्न न केल्यामुळे कॅन्सर ( Cancer)होण्याचा धोका वाढू शकतो का ? लग्न झाल्यामुळे (Being Married) कॅन्सर बरा होण्याची शक्यता वाढते का ? तर त्याचे उत्तर आहे हो ! गेल्या अनेक अभ्यासांतून हा निष्कर्ष समोर आला आहे की, लग्न झाल्यामुळे, वेळेआधीच होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी होऊ शकते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, लग्न झालेल्या लोकांमध्ये सर्व्हायवल रेट ( survival rate) अधिक असतो. त्यानंतर येतात सिंगल लोक आणि काही कारणामुळे आपल्या जोडीदारापासून वेगळे झालेल्यांचा नंबर यात ( सर्व्हायवल रेट ) शेवटी लागतो. SWNS ने दिलेल्या माहितीनुसार, ॲनह्युई मेडिकल युनिव्हर्सिटीतील कॉरस्पॉंडिंग ऑथर प्रोफेसर ॲमन ह्यू यांच्या सांगण्यानुसार, ‘विवाहीत लोक हे आर्थिकदृष्ट्या स्टेबल असतात. त्यांना (जोडीदाराकडून) मानसिक आधारही मिळतो. ‘

संपूर्ण जगात, कॅन्सरमुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये पोटाचा कॅन्सर हे तिसऱ्या क्रमांकाचे प्रमुख कारण आहे. अमेरिकेत कॅन्सरमुळे दरवर्षी 11 हजार नागरिकांचा मृत्यू होतात.

कॅन्सर शरीरातील इतर भागांत पसरलेला नाही, अमेरिकेतील अशा 3,647 केसेसचा प्रोफेसर ह्यू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभ्यास केला. या सर्व पेशंट्सचे निदान 2010 ते 2015 या कालावधीत झाले होते.

लग्न झालेल्या लोकांची वाचण्याची शक्यता 72 % इतकी होती. पतीच्या तुलनेत पत्नीची, जिवंत राहण्याची शक्यता अधिक (76 %) होती, असेही या संशोधनातून समोर आले. तर ज्या पुरुषांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे, त्यांचा जीव वाचण्याची शक्यता खूप कमी (51%) होती.

पोटाचा कॅन्सर म्हणजे काय ?

आपण जे अन्न खातो, ते सरळ आपल्या पोटात जाते. तेथे अन्नपचनाची क्रिया सुरू होते. पोटातील आतल्या भागात कॅन्सरच्या पेशी तयार होण्यास सुरूवात होऊ, त्यांचा ट्युमर विकसित होते. यालाच गॅस्ट्रिक कॅन्सर असेही म्हटले जाते. पोटाचा कॅन्सर हा अनेक वर्षे हळूहळू वाढत असतो. तो शरीराच्या इतर भागांतही पसरू शकतो.

ही आहेत पोटाच्या कॅन्सरची लक्षणं :

– अन्न गिळण्यास त्रास होणे . – जेवणानंतर पोटात रक्तस्त्राव झाल्यासारखे वाटणे. – थोडेसेच खाऊनही पोट भरल्यासारखे वाटणे. – जळजळ, अपचन, पोटात दुखणे. – काही कारण नसतानाही वजन कमी होणे.

पोटाचा कॅन्सर होण्याची कारणे :

गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लेक्स डिसीज (GERD), यामध्ये पोटात तयार होणारे ॲसिड पुन्हा फूड पाइपमध्ये जमा होण्यास सुरूवात होते. जाडेपणा, जेवणात मीठ आणि तिखटाचा जास्त वापर, जेवणात हिरव्या भाज्या आणि ड्रायफ्रुट्सचा समावेश न करणे, पोटात बराच काळ जळजळ होत राहणे, स्मोकिंग अशी अनेक कारणे पोटाच्या कॅन्सरचा धोका वाढवू शकतात.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच