AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नारळ पाण्याचा वापर करा, आरोग्याच्या अनेक समस्या दूर राहतील!

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, बाराही महिने नारळ पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी (Health) अत्यंत फायदेशीर आहे. नारळ पाणी पिऊन आपण निरोगी जीवन जगू शकतो. दिवसभरात एक नारळ पाणी पिले तर दिवसभर पाण्याची कमतरता अजिबात भासत नाहीत. यामुळेच या हंगामामध्ये नारळ पाणी पिणे खूप जास्त फायदेशीर (Beneficial) ठरते.

Health | उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नारळ पाण्याचा वापर करा, आरोग्याच्या अनेक समस्या दूर राहतील!
नारळ पाणी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 21, 2022 | 8:57 AM
Share

मुंबई : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, बाराही महिने नारळ पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी (Health) अत्यंत फायदेशीर आहे. नारळ पाणी पिऊन आपण निरोगी जीवन जगू शकतो. दिवसभरात एक नारळ पाणी पिले तर दिवसभर पाण्याची कमतरता अजिबात भासत नाहीत. यामुळेच या हंगामामध्ये नारळ पाणी पिणे खूप जास्त फायदेशीर (Beneficial) ठरते. असे म्हणतात की, एक सलाईन आणि एक नारळ पाणी एक सारखेच काम करतात. एक सलाईन घेतल्याने आपल्या शरीराला जितकी ऊर्जा (Energy) मिळते, तेवढीचे ऊर्जा आपल्याला नारळ पाणी पिल्याने मिळते. नारळ पाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी तुम्ही नारळ पाण्याच्या दररोजच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा.

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत

नारळाच्या पाण्याचे सेवन करून आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकतो. कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम सारख्या पोषक तत्वांमुळे रक्तातील पांढऱ्या पेशी वाढतात आणि यामुळे रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही नारळ पाण्यामध्ये लिंबू मिक्स करूनही घेऊ शकता.

हृदयाशी संबंधित आजार दूर राहतात

नारळाच्या पाण्यात पोटॅशियम असल्यामुळे हृदयाशी संबंधित आजारही दूर राहतात. ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे. त्यांनी मर्यादित प्रमाणात नारळ पाणी प्यावे. वजन कमी करायचे असेल तर नारळाचे पाणी प्या. कारण त्यात चरबी फारच कमी असते. तसेच ते प्यायल्यानंतर पोटही बराच काळ भरलेले राहते. यामुळेच ज्यांना आपले वाढलेले वजन झटपट कमी करायचे आहे, अशांनी आपल्या आहारामध्ये नारळाच्या पाण्याचे सेवन करावे.

पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत

उन्हाळ्यात पोट बिघडणे किंवा पोटाशी संबंधित समस्या जास्त प्रमाणात निर्माण होतात. तळलेले आणि भाजलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यावर अपचन, अॅसिडीटी आणि इतर समस्या त्रासदायक ठरतात. बाहेरचे अन्न टाळा आणि दिवसातून एकदा थंड नारळपाणी प्या. यामुळे पचनक्रिया सुधारते. यामुळे तुमची भूक वाढेल, याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता होणार नाही.

संबंधित बातम्या : 

Cardamom | वेलची अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे, जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे!

Corona update : वाढलेल्या कोरोना केसेसमुळे दिल्ली पुन्हा निर्बंधांच्या उंबरड्यावर, मास्क न लावल्यास 500 रुपये दंड!

मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.