Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोज सकाळी रिकाम्या पोटी खा भिजवलेले हरभरे, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासोबतच अनेक आजार राहतील दूर

हरभरे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. भिजवलेल्या हरभऱ्याचे सेवन केल्यास त्यातील पोषक तत्वांचे प्रमाण वाढते. त्यामुळे रोज सकाळी भिजवलेले हरभारे खाल्ल्यास काय परिणाम होतात ते जाणून घेऊन आयुर्वेदिक तज्ञांकडून.

रोज सकाळी रिकाम्या पोटी खा भिजवलेले हरभरे, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासोबतच अनेक आजार राहतील दूर
Follow us
| Updated on: Feb 09, 2025 | 1:48 PM

सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले हरभारे खाण्याचा सल्ला आपल्या आई आजी देत असतात. याला तुमच्या आहाराचा भाग बनवल्याने तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतील. ही एक साधी पण अतिशय फायदेशीर सवय आहे. भिजवलेल्या हरभऱ्यामध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्वे आणि खनिज असतात. ज्यामुळे शरीर ऊर्जावान आणि निरोगी राहते. भिजवलेले हरभरे खाल्ल्याने शरीराला संपूर्ण पोषण मिळते आणि ते एक सुपर फूड देखील आहे.

सकाळी रिकाम्या पोटी मूठभर भिजवलेल्या हरभऱ्याचे सेवन केल्यास अनेक गोष्टींपासून सुटका मिळू शकते. आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर किरण गुप्ता यांच्याकडून जाणून घेऊ की दररोज सकाळी रिकाम्या पोटी मुठभर भिजवलेले हरभारे खाल्ल्याने काय फायदे होतात. किरण गुप्ता यांनी सांगितले की ज्यांची पचनशक्ती चांगली आहे ते सेवन करू शकता परंतु ज्यांना संधिवाताची समस्या आहे त्यांनी ते सवय करू नये.

रिकाम्या पोटी भिजवलेले हरभारे खाण्याचे फायदे

हे सुद्धा वाचा

पचनशक्ती मजबूत करते : भिजवलेल्या हरभऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते.जे पचनसंस्थेला चांगले कार्य करण्यास मदत करते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊन पोट साफ होण्यास मदत मिळते.

शरीराला ऊर्जा मिळते : भिजवले हरभारे कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनचा एक चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे शरीर दिवसभर ऊर्जावान राहते. जी लोक व्यायाम करतात किंवा शारीरिक कष्ट करता त्यांच्यासाठी हे विशेषतः फायदेशीर आहे.

साखरेची पातळी नियंत्रित करते : हरभऱ्यात ग्लासमिक इंडेक्स कमी असतो ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा चांगला आहार मानला जातो.

हाडे मजबूत करते : हरभऱ्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. भिजवलेले हरभरे नियमित खाल्ल्याने हाडांची कमजोरी दूर होते.

रोग प्रतिकारक शक्ती वाढवते : भिजवलेल्या हरभऱ्यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि आवश्यक पोषक घटक असतात. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे आजार दूर राहतात आणि शरीर अधिक निरोगी राहते.

कसे खावे?

हरभारे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्यापोटी मुठभर हरभरे खा. तुम्हाला हवे असल्यास त्यात लिंबू, आले किंवा काळे मीठ टाकून त्याची चव वाढवू शकता. मात्र ते तसेच खाल्ले तर ते अधिक फायदेशीर ठरेल. परंतु जर तुम्हाला कोणताही आजार किंवा इतर कोणतीही समस्या असेल तर हरभरे खाण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?
औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?.
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने...
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने....
खोक्याचं पोलिस कोठडीत अन्नत्याग आंदोलन, केली ही मोठी मागणी
खोक्याचं पोलिस कोठडीत अन्नत्याग आंदोलन, केली ही मोठी मागणी.
'...एकतर तो पुरूष नाहीच', नाव न घेता सुप्रिया सुळेंची मुंडेंवर टीका
'...एकतर तो पुरूष नाहीच', नाव न घेता सुप्रिया सुळेंची मुंडेंवर टीका.
बीडमधील शिक्षकाच्या आत्महत्येला सरकार जबाबदार; अंबादास दानवेंचा आरोप
बीडमधील शिक्षकाच्या आत्महत्येला सरकार जबाबदार; अंबादास दानवेंचा आरोप.
शिवरायांचं एकमेव मंदिर भिवंडीत, 4 एकरवर उभारलं भव्य देऊळ,नेमकं खास काय
शिवरायांचं एकमेव मंदिर भिवंडीत, 4 एकरवर उभारलं भव्य देऊळ,नेमकं खास काय.
.. त्याचं संरक्षण करणं आमचं दुर्दैव आहे, नाहीतर.. ; फडणवीस स्पष्टच बोल
.. त्याचं संरक्षण करणं आमचं दुर्दैव आहे, नाहीतर.. ; फडणवीस स्पष्टच बोल.
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला; कोल्हापुरात बजरंग दल आक्रमक
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला; कोल्हापुरात बजरंग दल आक्रमक.
शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा होत असताना 15 ते 20 जण जखमी, काय घडलं?
शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा होत असताना 15 ते 20 जण जखमी, काय घडलं?.
औरंगजेबाच्या कबरीवरून नितेश राणेंचा संताप अनावर; म्हणाले, 'ही घाण...'
औरंगजेबाच्या कबरीवरून नितेश राणेंचा संताप अनावर; म्हणाले, 'ही घाण...'.