AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sugar and diabetes :साखर खाल्ल्याने मधुमेह होतो का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

भारतात मधुमेह हा आजार होण एक मोठी समस्या बनत चालेली आहे. शहरी भागात प्रत्येक व्यक्तीला हा आजार होण्याचा धोका असतो. आजकाल लोकांमध्ये साखरयुक्त पदार्थ न खाण्याचा ट्रेंडही वाढत आहे. साखर खाल्ल्याने मधुमेह होतो का? असा अनेकांचा समज होत आहे. यामागचं नेमकं कारण काय आहे तज्ञांकडून जाणून घेऊया.

Sugar and diabetes :साखर खाल्ल्याने मधुमेह होतो का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
diabetes
| Edited By: | Updated on: Apr 05, 2025 | 7:20 PM
Share

मधुमेह हा आता एक असा आजार बनला आहे ज्याची सर्वांनाच भीती वाटते. हा आजार शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना सर्वाधिक प्रमाणात होताना आपल्याला दिसत आहेव. मधुमेह टाळण्यासाठी लोकं आता साखर खाणेही सोडून देत आहेत. साखर खाल्ल्याने हा आजार होऊ शकतो असा एक सामान्य समज लोकांनमध्ये आहे, पण साखरेमुळे खरोखरच मधुमेह होतो का? त्याचा आजाराशी काय संबंध आहे? साखर न खाणाऱ्या लोकांना कधीच मधुमेह होणार नाही का? याबद्दल आपण तज्ञांकडून जाणून घेऊया.

अपोलो हॉस्पिटल्समधील एंडोक्राइनोलॉजिस्ट आणि मधुमेह तज्ज्ञ डॉ. एस के वांग्नु म्हणतात की शरीरात इन्सुलिन योग्यरित्या तयार होत नाही तेव्हा मधुमेह होतो. इन्सुलिनच्या कार्यात कोणतीही कमतरता असल्यास शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे मधुमेह होतो. या आजाराचे दोन प्रकार आहेत. एक टाईप-1, जो अनुवांशिक आहे. म्हणजे काहींना जन्मापासूनच होऊ शकते. दुसरा प्रकार म्हणजे टाइप-2, जो चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे होतो. गेल्या काही वर्षांपासून टाइप-2 ची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. आता हा आजार अगदी लहान वयातही होऊ लागला आहे.

साखर खाल्ल्याने खरच मधुमेह होतो का?

डॉ. वांग्नु यांच्या नुसार साखरेचा मधुमेहाशी थेट संबंध नाही. साखर खाल्ल्याने मधुमेह होईल असे नाही. मधुमेह होण्याचे प्रमाण व्यक्तीच्या जनुकांवर, त्याच्या शरीरात वाढत्या लठ्ठपणावर आणि त्याच्या जीवनशैलीवर अवलंबून असते. जरी तुम्ही दररोज साखर खात असाल आणि व्यायाम करत असाल तरी टाइप-2 मधुमेहाचा धोका कमी होतो.

साखर सोडली तर कधीच मधुमेह होणार नाही का?

पब्लिक हेल्थ एक्सपर्ट डॉ. जुगल किशोर सांगतात की साखर न खाल्ल्याने मधुमेह हा आजार होत नाही. तुम्ही जर साखरेचे पदार्थ किंवा साखर खाणंच बंद केले तर मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो, परंतु साखर सोडणे आणि मधुमेह न होणे यात वैद्यकीय शास्त्रात कोणताही संबंध नाही. जर एखाद्या व्यक्तीची जीवनशैली योग्या नसेल, तसेच एखादा व्यक्ती खुप मानसिक तणावाखाली असेल. जर एखाद्या व्यक्तीचे वजन जास्त असेल आणि त्याच्या जनुकांमध्ये समस्या असतील तर तो साखर खात नसला तरीही त्याला मधुमेह होऊ शकतो. म्हणून लोक मर्यादित प्रमाणात साखरेचे सेवन करू शकतात.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, एक प्रौढ व्यक्ती दिवसाला २५ ग्रॅम साखर खाऊ शकते. हो, यापेक्षा जास्त साखर खाण्याचे अनेक नुकसान शरीराला होऊ शकतात.

जास्त साखर खाण्याचे नुकसान

साखरेच्या सेवनामुळे वजन वाढू शकते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो. जास्त साखर खाल्ल्याने तुमचे दात देखील खराब होऊ शकतात. पण जर तुम्ही मधुमेहाच्या भीतीने साखर खाणे सोडून देत असाल तर हे योग्य नाही. जर तुमची जीवनशैली चांगली असेल आणि तुम्ही दररोज व्यायाम करत असाल. जर कुटुंबात कोणालाही अनुवांशिक मधुमेह नसेल आणि निरोगी आहार घेत असाल तर साखर मर्यादित प्रमाणात सेवन केली जाऊ शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.