AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Essential Vitamins : ‘ही’ सहा जीवनसत्त्वे शरीरासाठी आहेत आवश्यक; फायदे जाणून घ्या

जीवनसत्त्वे (Vitamins) हे आपल्या शरीरासाठी लागणारा सर्वात आवश्यक असा घटक आहे. जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक आजारांचा (Illness) सामना करावा लागू शकतो. जीवनसत्त्वे आरोग्यासाठी (health) खूप फायदेशीर असतात.

Essential Vitamins : 'ही' सहा जीवनसत्त्वे शरीरासाठी आहेत आवश्यक; फायदे जाणून घ्या
व्हिटॅमिन
| Edited By: | Updated on: Feb 16, 2022 | 10:55 PM
Share

जीवनसत्त्वे (Vitamins) हे आपल्या शरीरासाठी लागणारा सर्वात आवश्यक असा घटक आहे. जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक आजारांचा (Illness) सामना करावा लागू शकतो. जीवनसत्त्वे आरोग्यासाठी (health) खूप फायदेशीर असतात. ते शरीराच्या प्रत्येक कार्याला चालना देताता. प्रत्येक जीवनसत्त्वाचे कार्य वेगवेगळे असते. जर तुमच्या शरीरात एखाद्या जीवनसत्त्वाचा अभाव असेल तर तुम्हाला त्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. उदा: जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमी असेल तर तुम्हाला, हाडे दुखणे, थकवा येणे, कामात उत्साह न वाटणे अशा विविध समस्यांचा सामना करावा लागू शकतो. शरीरात जीवनसत्त्वांची पातळी योग्यप्रमाणात राहण्यासाठी तज्ज्ञांकडून आहारात विविध पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला देण्यात येतो. तुमच्या शरीरासाठी कोणते जीवनसत्त्वे आवश्यक आहे, त्याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

व्हिटॅमिन ए

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, दृष्टी दोष दूर होण्यासाठी तसेच त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन एची आवश्यकता असते. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन एची कमतरता असेल तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. तसेच डोळ्यांशी संबंधित विविध समस्या देखील निर्माण होऊ शकतात.

व्हिटॅमिन बी

व्हिटॅमिन बी मध्ये B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12 अशा आठ प्रकारांचा समावेश होतो. हे सर्व व्हिटॅमिन शरीराचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी फार महत्त्वाचे असतात. व्हिटॅमिन बी हे तुमच्या मज्जासंस्थेसाठी अत्यंत गरजेचे असते. दही, दूध, केळी आणि मशरूमच्या सेवनातून तुम्हाला व्हिटॅमिन बी मिळू शकते.

व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन सीला एस्कॉर्बिक ऍसिड असेही म्हणतात. व्हिटॅमिन सी हे सर्वात महत्वाच्या जीवनसत्त्वांपैकी एक आहे. हे केवळ रोगप्रतिकारक शक्तीच वाढवत नाही तर त्यात अँटिऑक्सिडंट्स देखील असतात. ते शरीराला हानी पोहोचवणारे मुक्त रॅडिकल्स रोखण्यात मदत करतात. हे तुमच्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. यासाठी तुम्ही लिंबूवर्गीय फळे, टोमॅटो आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करू शकता.

व्हिटॅमिन डी

कॅल्सीफेरॉल सामान्यतः व्हिटॅमिन डी म्हणून ओळखले जाते. व्हिटॅमिन डी हा एक महत्त्वाचा पोषक घटक आहे. कारण ते हाडे आणि दात निरोगी ठेवण्यास मदत करते. इतकेच नाही तर व्हिटॅमिन डी मेंदूच्या कार्याला देखली चालना देते. कवळे ऊन हा व्हिटॅमिन डीचा उत्तम स्त्रोत आहे.

व्हिटॅमिन ई

व्हिटॅमिन ई त्वचा आणि केसाच्या उत्तम आरोग्यसाठी गरजेचे असते. व्हिटॅमिन ईमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. जे मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात. व्हिटॅमिन ई मुळे चयापचयाची प्रक्रिया अधिक गतीमान होते. शेंगादाने हा व्हिटॅमिन ईचा उत्तम स्त्रोत आहे.

व्हिटॅमिन के

व्हिटॅमिन के हे तुम्हाला विविध प्रकारच्या कर्करोगापासून दूर ठेवण्याचे कार्य करते. विविध प्रकारच्या पालेभाज्या तसेच मासे हे व्हिटॅमिन केचे उत्तम स्त्रोत आहेत.

संबंधित बातम्या

ज्या आजारामुळे बप्पी लाहिरींनी जीव गमावला त्याची लक्षणे माहितीय का?

साखर पोटात गेल्यावर दाखवते मोठा ‘प्रताप’, मधुमेहापासून ते कर्करोगापर्यंत धोका!

पाठदुखीची समस्या पाठ सोडत नाही? चिंता करु नका! चुटकीसरशी दुखणं गायब करणारा उपाय

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.