AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मूळव्याधावर ऑपरेशन केले पण त्रास आहे? हे उपाय नक्की करा

मूळव्याध ऑपरेशन केल्यावरही गाठी परत येऊ शकतात, पण आयुर्वेदातील कचनारचा वापर त्यांना कमी करण्यास मदत करतो. फक्त ऑपरेशन करून मूळ्याधाचा त्रास कमी होत नाही तर त्याकरिता पुढे काळजी घेणेही महत्वाचे आहे.

मूळव्याधावर ऑपरेशन केले पण त्रास आहे? हे उपाय नक्की करा
Hemorrhoids
| Updated on: Jan 31, 2026 | 1:04 PM
Share

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आहारातील बिघाड आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे मूळव्याधीची समस्या वाढताना दिसते. अशा वेळी काही पारंपरिक आणि आयुर्वेदीय उपाय उपयोगी ठरू शकतात. विशेषतः एका विशिष्ट झाडाची पाने योग्य पद्धतीने वापरल्यास मूळव्याधीच्या त्रासात दिलासा मिळू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. आजच्या धावपळीच्या जीवनात सतत बसून काम करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शरीराची हालचाल कमी होते आणि त्याचा थेट परिणाम पचनसंस्थेवर होतो. परिणामी बद्धकोष्ठता, मूळव्याध यांसारख्या तक्रारी तरुणांपासून वृद्धांपर्यंत वाढताना दिसतात. आयुर्वेदात कांचनारच्या फुलांना विशेष महत्त्व आहे. ही फुले पचन सुधारण्यास मदत करतात, आतड्यांची स्वच्छता ठेवतात आणि बवासीरच्या त्रासात आराम देऊ शकतात, असे अनेक अभ्यासांमध्ये सांगितले जाते.

बर्‍याच लोकांना असं वाटतं की मूळव्याधावर ऑपरेशन झालं की तो आजार कायमचा संपतो. पण प्रत्यक्षात असं नेहमीच घडत नाही. शस्त्रक्रियेत बहुतेक वेळा फक्त वरचे गाठी काढल्या जातात, आजाराचं मूळ कारण मात्र तसंच राहू शकतं. त्यामुळे काही काळानंतर मूळव्याध परत उद्भवण्याची शक्यता असते.

आयुर्वेदानुसार कचनार या झाडाची साल आणि मुळं मूळव्याधासाठी उपयुक्त मानली जातात. कचनारचा योग्य वापर केल्यास गाठी कमी होण्यास मदत होते आणि आजार पुन्हा बळावण्याचा धोका देखील कमी होऊ शकतो. कांचणरी ही एक औषधी वनस्पती आहे जी आयुर्वेदात अनेक रोगांवर उपयोगी ठरते. ही मुख्यतः पचनसंस्थेसाठी फायदेशीर असून अपचन, बद्धकोष्ठ, अजीर्ण आणि गॅस यावर आराम देते.

याशिवाय काचणरी सर्दी, खोकला, दम्याच्या त्रासावर आणि श्वाससंबंधित समस्या कमी करण्यास मदत करते. त्वचेच्या जखमा, फोड, दाह यावरही ही वनस्पती उपयोगी आहे. काही अभ्यासानुसार, काचणरी मधुमेहावर नियंत्रक प्रभाव दाखवते, यकृताचे रक्षण करते आणि हलक्या रक्तदाबाला संतुलित ठेवण्यास मदत करते. मात्र, प्रमाण जास्त घेतल्यास उलटी, पोटदुखी किंवा अतिसार होऊ शकतो, त्यामुळे वापरात काळजी घ्यावी लागते.

कांचणरीचा उपयोग योग्य पद्धतीने केल्यास ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. कांचणरीची पाने किंवा मुळे उकळून त्याचा अर्क तयार करून प्यायला वापरतात, ज्याने पचन सुधारते, गॅस कमी होतो आणि सर्दी‑खोकल्यावर आराम मिळतो. काही लोक काचणरी भाजीत किंवा औषधी मिश्रणात वापरतात, ज्यामुळे मधुमेह, यकृताचे आणि रक्तदाब संतुलित राहतो. मात्र, प्रमाण जास्त घेणे टाळावे आणि गर्भवती किंवा स्तनपायी महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वापरावा.

Follow Us
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला.
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?.
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट.
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस.
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू.
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद.
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप.
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ....
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ.....
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?.