AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Death | मृत्यू दारात असताना शरीरात नेमके कोणते बदल होतात, वाचा मृत्यू होण्याच्या अगोदरची प्रमुख लक्षणे!

द कन्व्हर्सेशनच्या लेखात मरण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलण्यात आले, ते म्हणाले की मला वाटते, कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी मृत्यूची प्रक्रिया सुरू होते. या काळात लोकांची तब्येत अधिकच खराब होऊ लागते. त्यांना चालायला आणि झोपायलाही त्रास होऊ लागतो.

Death | मृत्यू दारात असताना शरीरात नेमके कोणते बदल होतात, वाचा मृत्यू होण्याच्या अगोदरची प्रमुख लक्षणे!
Image Credit source: unsplash.com
| Updated on: Jun 19, 2022 | 2:37 PM
Share

मुंबई : जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू (Death) होणारच आहे. जगामध्ये कोणीही अमर नाहीये. प्रत्येकालाच आज ना उद्या मरायचेच आहे. मात्र मृत्यू होताना कसे वाटते?, त्यावेळेच्या भावना नेमक्या काय असतील, याबद्दल कदाचित कोणीही उत्तर देऊ शकत नाही. फक्त ज्याने मृत्यू अनुभवला आहे तोच या विषयावर सांगू शकेल. नुकताच एका तज्ज्ञ (Expert) डाॅक्टरांनी सांगितले की, मृत्यूपूर्वी काय होते आणि कसे वाटते? द एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, आपल्या आयुष्यात अनेकांना मरताना पाहिलेल्या डॉक्टरने मृत्यूपूर्वी मानवी शरीरात काय बदल घडतात हे सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊयात मृत्यूच्या अगोदर मानवी शरीरामध्ये (Body) नेमके काय बदल होतात.

मरणाच्या आठ दिवस अगोदर पाणीही पिऊ वाटत नाही

Themirror च्या अहवालामध्ये म्हटंले गेले आहे की, नैसर्गिक घटनांवर फार कमी अभ्यास करता येतो. मृत्यूपूर्वी कसे वाटते याबद्दल बोलताना, एक डॉक्टर म्हणतात की मृत्यूची प्रक्रिया सामान्यतः हृदयाची धडधड थांबण्याच्या सुमारे दोन आठवड्यांपूर्वी सुरू होते. द कन्व्हर्सेशनच्या लेखात मरण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलण्यात आले, ते म्हणाले की मला वाटते, कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी मृत्यूची प्रक्रिया सुरू होते. या काळात लोकांची तब्येत अधिकच खराब होऊ लागते. त्यांना चालायला आणि झोपायलाही त्रास होऊ लागतो. आयुष्याच्या शेवटचा टप्पा म्हणजे यादरम्यान अजिबातच अन्न खाणे किंवा पाणीही पिऊ वाटत नाही. ज्यांचा मृत्यू आठ दिवसांवर आला आहे, असे लोक तर गोळ्या देखील खात नाहीत.

मेंदूमधून एंडोर्फिनसह अनेक रसायने बाहेर पडतात

मृत्यूच्या वेळी शरीरात नेमके काय होते हे अध्याप कळू शकले नाहीये. परंतु काही संशोधनानुसार मृत्यूच्या वेळी मेंदूमधून एंडोर्फिनसह अनेक रसायने बाहेर पडतात. परंतु आतापर्यंतच्या संशोधनानुसार, लोक जसजसे मृत्यूच्या जवळ येतात, तसतसे शरीरातील तणाव रसायने वाढतात. मात्र, जर एखाद्या व्यक्तीला काही आजार वगैरे असतील तर कदाचित त्यांची लक्षणे देखील वेगळी असू शकतात. मरण्याच्या प्रक्रियेत लोकांच्या वेदना कमी होतात, परंतु असे का होते हे सांगणे थोडे कठिणच आहे. मानवाच्या मृत्यूसंदर्भात अनेक संशोधने करण्यात आलीयेत, मात्र मृत्यूच्या वेळी नेमके काय होते आणि त्या व्यक्तीच्या नेमक्या काय भावना असतात, हे सांगणे थोडे कठिणच आहे. यासंदर्भात आजतकने सविस्तर रिपोर्ट दिला आहे.

Follow Us
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...