AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

weightloss tips: वजन कमी करताना ‘या’ फळांचे चुकूनही सेवन करू नये, लठ्ठपणा दूर होण्याऐवजी…..

avoid these fruits while weightloss: वजन कमी करण्यासाठी लोक प्रथम त्यांच्या आहारावर लक्ष केंद्रित करतात. वजन कमी करण्याच्या आहारात फळे खाणे लोक आरोग्यदायी मानतात. पण सर्वच फळे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर नसतात. डाएट करताना तुम्ही तुमच्या आहारात कोणती फळे समाविष्ट करू नयेत चला जाणून घ्या.

weightloss tips: वजन कमी करताना 'या' फळांचे चुकूनही सेवन करू नये, लठ्ठपणा दूर होण्याऐवजी.....
weight loss
| Edited By: | Updated on: May 12, 2025 | 2:32 PM
Share

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. शरीराला योग्य पोषण नाही मिळाल्यामुळे तुम्हाला आरोग्या संबंधित अनेक समस्या होऊ शकतात. जंक फूडच्या अतिसेवनामुळे तुम्हाला लठ्ठपणा, वजन वाढ, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांच्या सारख्या समस्या उद्भवतात. शरीरा संबंधित समस्या दूर करण्यासाठी वजन कमी करणे फायदेशीर ठरते. जेव्हा आपण वजन कमी करण्यासाठी डाएटिंग सुरू करतो, तेव्हा आपण प्रथम आपल्या आहारात निरोगी गोष्टींचा समावेश करण्यावर लक्ष केंद्रित करतो, ज्यामध्ये आपण फळांना सर्वात आरोग्यदायी पर्याय मानतो आणि ते दररोज खाण्यास सुरुवात करतो.

फळे केवळ पोषक तत्वांनी समृद्ध नसतात, तर त्यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स देखील असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की सर्व फळे वजन कमी करण्यास उपयुक्त नसतात? हो, काही फळांमध्ये इतके नैसर्गिक साखर आणि कॅलरीज असतात की ते तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अडथळा ठरू शकतात. बऱ्याचदा लोक काही फळे निरोगी आहेत असे समजून कधीही खातात, जे योग्य नाही चला जाणून घेऊयात.

केळी – केळीमध्ये साखर आणि कॅलरीज जास्त प्रमाणात असतात. एका मध्यम आकाराच्या केळीमध्ये सुमारे १००-१२० कॅलरीज आणि उच्च कार्बोहायड्रेट्स असतात. यामुळे डाएटिंग करताना तुमचे कॅलरीज बॅलन्स बिघडू शकते. विशेषतः जर तुम्ही कमी कार्बयुक्त आहार घेत असाल तर.

द्राक्ष – द्राक्षे चवीला गोड असतात, पण त्यात भरपूर नैसर्गिक साखर असते. जर जास्त प्रमाणात खाल्ले तर वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते. तसेच, ते लवकर पचतात, ज्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागते आणि तुम्ही जास्त खाऊ शकता.

टरबूज – टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, परंतु टरबूजमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स देखील जास्त असतो. याचा अर्थ ते लवकर साखरेत रूपांतरित होते आणि त्यामुळे इन्सुलिनमध्ये वाढ होऊ शकते, ज्यामुळे वजन कमी होण्यास अडथळा येतो.

आंबा – उन्हाळी फळे सामान्य आहार घेणाऱ्यांसाठी नाहीत. त्यात भरपूर नैसर्गिक साखर आणि कॅलरीज असतात. विशेषतः पिकलेले आंबे वजन कमी करण्याचा प्रवास मंदावू शकतात. म्हणून, शक्य असल्यास, हे देखील टाळा.

अननस – अननसात फ्रुक्टोजचे प्रमाणही जास्त असते. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते मर्यादित प्रमाणात खा. जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

वजन कमी करताना ‘या’ फळांचे सेवन करा….

डाएट करताना सर्व फळे टाळणे आवश्यक नाही, तर तुम्हाला फळे हुशारीने निवडून खावी लागतील. आहार घेत असताना तुम्ही सफरचंद, पपई, पेरू, बेरी आणि जांभूळ अशी फळे खाऊ शकता. यामध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते, जे वजन कमी करण्यास मदत करते.

Follow Us
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.