AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : हा अपमान PCB अध्यक्ष मोहसीन नक्वीना सहनच झालं नाही, त्यांनी थेट…स्टेडियममध्ये काय घडलं?

IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात एका खास क्षणाची जास्त चर्चा आहे. हा क्षण फोर किंवा सिक्स मारण्याशी संबंधित नाहीय, तर तो पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याशी संबंधित आहे. भारताने पाकिस्तानवर टी20 वर्ल्ड कपमधील आतापर्यंतचा मोठा विजय मिळवला आहे.

IND vs PAK : हा अपमान  PCB अध्यक्ष  मोहसीन नक्वीना सहनच झालं नाही, त्यांनी थेट...स्टेडियममध्ये काय घडलं?
PCB Chairman Mohsin NaqviImage Credit source: PTI
| Updated on: Feb 16, 2026 | 9:53 PM
Share

कुठल्याही सामन्यात असा एक क्षण असतो, ज्याची नेहमीच चर्चा होते. भारत-पाकिस्तान सामनाही याला अपवाद नाही. भारत-पाकिस्तान सामन्यात विकेट गेल्यानंतर सेलिब्रेशन असो किंवा बाऊंड्री-सिक्स मारणं, त्या क्षणापेक्षापण मोहसीन नक्वी यांची चर्चा आहे. रविवारी 15 फेब्रुवारीला श्रीलंकेत कोलंबोमध्ये प्रेमदासा स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामना झाला. भारतीय क्रिकेट चाहत्यांनी या सामन्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. कारण भारताने हा सामना सहज जिंकला. भारताने पाकिस्तानवर टी20 वर्ल्ड कपमधील आतापर्यंतचा मोठा विजय मिळवला. भारत-पाकिस्तान सामन्यात मोहसीन नक्वी चर्चेत येण्यामागचं कारण आहे, त्यांचं न थांबणं.

प्रेमदासा स्टेडियमच्या व्हीआयपी कक्षात मोहसीन नक्वी बसले होते. ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. पण सामना जसा-जसा भारताच्या बाजूने झुकायला लागला, ते नक्वी यांना सहन झालं नाही. सामन्यातील शेवटचा चेंडू टाकण्याआधीच मोहसीन नक्वी आपल्या जागेवरुन निघून गेल्याचं दिसलं. पाकिस्तानचा शेवटचा विकेट पडेपर्यंत नक्वी तिथे थांबले नाहीत. आवश्यक धावगती वाढत चाललेली आणि स्कोरबोर्डवर पाकिस्तानची स्थिती वाईट होत चालली, आपण हरणार याची नक्वी यांना जणू आधीच चाहूल लागली होती. त्यामुळे ते शेवटापर्यंत थांबले नाहीत. ते आधीच तिथून निघून गेले.

पाक गोलंदाजांची अक्षरक्ष: लक्तरं काढली

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 175 धावांचा डोंगर उभारला. पाकिस्तानचा डाव अवघ्या 114 धावात आटोपला. संपूर्ण सामन्यातही कुठल्याही टप्प्यावर पाकिस्तान मॅचमध्ये आहे असं अजिबात वाटलं नाही. या विजयाने टीम इंडियाचा सुपर-8 मधील प्रवेश निश्चित झाला आहे. पाकिस्तानला मात्र आता नामीबिया विरुद्ध जिंकावचं लागेल. ग्रुप ए मध्ये टीम इंडिया टॉपवर आहे. इशान किशनने काल पाकिस्तानी गोलंदाजांची अक्षरक्ष: लक्तरं काढली. इशान किशन क्रीजवर असेपर्यंत एकही पाकिस्तानी गोलंदाज छाप पाडू शकला नाही. इशान किशनने चौफेर फटकेबाजी करत पाकिस्तानी गोलंदाजांना झोडून काढलं.

हे त्यांना सहनच झालं नाही

आशिया कप प्रमाणे या मॅचमध्येही कर्णधार सूर्यकुमार यादवसह संपूर्ण टीमने पाकिस्तानी खेळाडूंशी कुठेही हस्तांदोलन केलं नाही. हा पराभव नक्वी यांच्या जास्त जिव्हारी लागणं स्वाभाविक आहे. कारण आशिया कप फायनलच्यावेळी आशियाई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असूनही टीम इंडियाने त्यांच्याकडून विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारली नव्हती. त्यावेळी ते ट्रॉफी आपल्यासोबत घेऊन गेले होते. यावरुन बराच वाद झालेला. ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. इतका सगळा अपमान झाल्यानंतर पुन्हा वर्ल्ड कपमध्ये भारताकडून पराभव होणं हे त्यांना सहनच झालं नाही. म्हणून नक्वी मॅच संपण्याआधीच तिथून निघून गेले.

Follow Us
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरे असं म्हणाले? धाराशिवमधील
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरेंच्या विधानाने सगळेच अवाक्; धाराशिवमधील नगरसेवकांच्या बैठकीत असं काय घडलं?