AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतंजली संबंधित अन्नाचे फॅक्ट आणि नियम पाळाल, तर आरोग्य सुदृढ होईल…

निरोगी राहण्यासाठी, योग्य आहार खूप महत्वाचा आहे आणि त्याशिवाय, अन्नाशी संबंधित नियमांचे पालन करणे देखील खूप महत्वाचे आहे. योगगुरू बाबा रामदेव आणि आयुर्वेद तज्ज्ञ आचार्य बालकृष्ण यांच्या पुस्तकातून तुम्हाला अन्नाशी संबंधित महत्त्वाचे तथ्य आणि नियम शिकायला मिळतील जे तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतील.

पतंजली संबंधित अन्नाचे फॅक्ट आणि नियम पाळाल, तर आरोग्य सुदृढ होईल...
| Updated on: May 07, 2025 | 12:37 AM
Share

आपण खात असलेले अन्न आणि आरोग्य यांचा एकमेकांशी घनिष्ट संबंध आहे. तुम्हाला निरोगी राहायचे असेल केवळ पोषक तत्वांनी समृद्ध अन्न खाऊन भागत नाही तर काही नियमांचे पालन करणे देखील आवश्यक असते. योगगुरू बाबा रामदेव यांनी स्वदेशीची नारा देत पतंजली कंपनीची सुरुवात केली होती.या मागचा उद्देश लोकांना आयुर्वेदाबद्दल जागरूक करणे आहे. आचार्य बाळकृष्ण हे निरोगी जीवनासाठी आयुर्वेदाची माहिती लोकांपर्यंत पोहोचव असतात आणि त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत. असेच एक पुस्तक म्हणजे ‘आयुर्वेदाचे विज्ञान’. या पुस्तकात निरोगी जीवनासाठी अनेक महत्त्वाची माहिती सविस्तरपणे दिली आहे. यातून, आम्ही तुमच्यासाठी अन्नाशी संबंधित काही खास नियम शोधून काढले आहेत. ज्यामुळे तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत मिळेल. हा लेख वाचल्यानंतर, तुम्हाला कळेल की आपण पाळत असलेले अन्नाशी संबंधित नियम आयुर्वेदाच्या तत्वात बसत नाहीत. तसेच योग्य आहार घेतल्याने आरोग्य कसे राखता येते हे देखील तुम्हाला समजेल..

आरोग्यासाठी अन्नाचे महत्त्व सर्वांनाच माहिती आहे. आयुर्वेदानुसार अन्नाची गुणवत्ता योग्य असायला हवी, अन्नाचे प्रमाण आणि तुम्ही ज्या परिस्थितीत ते खात आहात त्याचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होत असतो. पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांच्या पुस्तकात अन्नाशी संबंधित महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे, जी आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.

अन्नाबद्दलची तथ्ये काय ?

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी लोक तूप आणि तेलात बनवलेले पदार्थ खाणे बंद करतात. कारण त्यांना हृदयरोग, लठ्ठपणा इत्यादींची भीती असते. तर आयुर्वेद म्हणतो की आपल्या जेवणात तूप आणि तेलाचे प्रमाण पुरेसे असावे लागते. तेल आणि तूप केवळ अन्नाची चव वाढवत नाहीत तर ते जठाराग्नी देखील सक्रिय करतात. यामुळे वात शांत होतो आणि शरीरातील सर्व कचरा देखील बाहेर पडतो. आयुर्वेद म्हणतो की जेवणात तूप आणि तेल कमी करण्याऐवजी तुम्ही शारीरिक सक्रीयता वाढविली पाहिजे. तुमच्या जेवणाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी आणि त्याचे फायदे मिळवण्यासाठी शारीरिक व्यायाम करण्याचा नियम बनवावयला हवा..

अन्न ताजे आणि गरम असावे

तुम्ही सोशल मीडियावर अनेक वेळा लोक शिळी भाकरी फायदेशीर असल्याचे सांगत असल्याचे पाहाता. आचार्य बाळकृष्ण यांच्या मतानुसार नेहमी ताजे आणि गरम अन्न खावे. असे अन्न केवळ चविष्टच नाही तर पौष्टिकतेने देखील समृद्ध असते आणि तुम्ही ते सहज पचवू शकता. थंड आणि शिळे अन्न पौष्टिक नसते. आयुर्वेदात असे म्हटले आहे की साठवलेले अन्न गरम करूनही खाऊ नये आणि कॅन केलेले अन्नपदार्थ देखील टाळावेत.

अन्न प्रेझेंटेबल असले पाहिजे

आयुर्वेद म्हणतो की केवळ अन्नाची चवच नाही तर त्याचा रंग, सुगंध आणि जेवणाची पद्धत देखील पचन रसांना उत्तेजित करत असते. भूक वाढवण्यासाठी, अन्न अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित वाढले पाहिजे. विशेषतः जर रुग्ण असेल तर जेवण आणखी आकर्षकपणे सजवून त्याला वाढावे.

वातावरण अनुकूल असले पाहिजे

जेवण चांगले वाढणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच तुम्ही जिथे बसून जेवत आहात ते वातावरण आल्हाददायक आणि शांत असले पाहिजे.यामध्ये स्वच्छता सर्वात महत्त्वाची आहे. आयुर्वेद असेही म्हणतो की एखाद्याने इतरांसोबत एकत्र जेवण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अन्न नेहमी एकाग्रतेने खाल्ले पाहिजे. जेवताना इतर कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे टाळावे.

हे नियम देखील खूप महत्वाचे आहेत

जेवताना कधीही बूट किंवा पादत्राणे घालून जेवू नये. अन्नाचा आदर करणेच एवढेच यामागे कारण नाही. तर पादत्राणे घालण्यामुळे पायांमधून उष्णता निर्माण होते आणि पचनक्रिया मंदावते म्हणून पायात कोणतेही पादत्राण नसताना जेवल्याने अन्नवेगाने पचत असते. हातपाय धुऊन आणि पुसूनच अन्न घ्यावे आणि प्रथम प्रार्थना करावी आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. जेवणापूर्वी २-३ घोट पाणी प्यावे, यामुळे घसा साफ होईल आणि तुम्ही अन्न अधिक सहजपणे खाऊ शकाल. अन्न हातानेच खावे. यामुळे अन्नात रस वाढतो आणि तुम्हाला गरम आणि थंड अन्नाचा अनुभव सहज घेता येतो. जमिनीवर आरामदायी स्थितीत अन्न खाण्याचा प्रयत्न करावा, परंतु चालताना खाणे टाळावे.

योग्य मानसिक स्थिती असणे गरजेचे

जेवताना तुम्ही आनंदी असणे महत्वाचे आहे. नकारात्मक भावनांचा पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो. यामुळे पाचक रसांचा स्राव होण्यास अडथळा येतो. यामुळे, तुम्हाला अन्नाचा पूर्ण फायदा मिळत नाही आणि अपचन आणि पोट जड होण्याची समस्या उद्भवू शकते.

जेवण्याची वेळ योग्य

आयुर्वेद म्हणतो की जर तुम्हाला रोगमुक्त आणि निरोगी जीवन जगायचे असेल तर वेळेवर अन्न खाणे चांगले. अन्न व्यवस्थित पचावे यासाठी, नियमितपणे योग्य वेळी जेवा आणि यासोबतच, काही इतर गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. जेव्हा तुम्हाला भूक लागते: जेव्हा प्रथम खाल्लेले अन्न पूर्णपणे पचते म्हणजेच तुम्हाला व्यवस्थित भूक लागते तेव्हाच अन्न खा. अन्यथा, पोटात आधीच असलेला न पचलेला रस ताज्या अन्नात मिसळतो आणि त्यामुळे शरीरातील दोष होतात, ज्यामुळे तुमचे शरीर विविध आजारांना बळी पडते.

दुपारच्या जेवणाची वेळ: दुपारचे जेवण १२ ते २ च्या दरम्यान घ्यावे. यामुळे शरीराला शक्ती मिळते आणि अन्नाचे पचनही व्यवस्थित होते, ज्यामुळे सर्व पोषक तत्वे मिळतात.

अन्नाचे प्रमाण: शरीराला अन्नातून योग्य पोषण मिळावे यासाठी, योग्य प्रमाणात खाणे महत्वाचे आहे. यासाठी, जेवताना पोटाचा एक तृतीयांश किंवा एक चतुर्थांश भाग रिकामा ठेवण्याची सवय ठेवा. हे अन्नाचे पचन करण्यास मदत करते आणि वाताच्या हालचालीचे नियमन देखील करते. अशाप्रकारे, आम्ही तुम्हाला पतंजलीचे संस्थापक आचार्य बालकृष्ण यांच्या पुस्तकातून अन्नाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या जर दैनंदिन जीवनात अंगीकारल्या तर

Follow Us
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख.
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद.
आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांचा अबोला, भर मंचावर...
आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांचा अबोला, भर मंचावर....
एका युगाचा अंत! अजरामर गीतांना स्वर देणाऱ्या आशाताईंचा अल्पपरिचय
एका युगाचा अंत! अजरामर गीतांना स्वर देणाऱ्या आशाताईंचा अल्पपरिचय.
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज.
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ.
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध.
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा.
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?.
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्.