AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health: उच्च रक्तदाब आहे आरोग्यासाठी धोक्याची घंटा, हे तीन फळं खाणे ठरते फायदेशीर

उच्च रक्तदाबामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतो. यापासून बचाव होण्यासाठी काही फळं फायदेशीर ठरतात.

Health: उच्च रक्तदाब आहे आरोग्यासाठी धोक्याची घंटा, हे तीन फळं खाणे ठरते फायदेशीर
| Updated on: Dec 10, 2022 | 9:23 AM
Share

मुंबई, भारतात उच्च रक्तदाबाच्या (High BP) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.  याचे कारण म्हणजे बाकीच्या देशांच्या तुलनेत भारतात जास्त मीठ खाल्ले जाते. खारट पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते ज्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. याशिवाय जे लोकं जास्त तेलकट किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खातात त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल (Cholesterol) जमा होऊ लागते. त्यामुळे ब्लॉकेज होऊन रक्तप्रवाहात समस्या निर्माण होतात. अशा स्थितीत रक्ताला हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी खूप बळ द्यावे लागते, याला उच्च रक्तदाब म्हणतात.

रक्तदाब नियंत्रित करणारी फळे

जेव्हा रक्तदाब वाढतो तेव्हा हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर, कोरोनरी धमनी रोग आणि तिहेरी रक्तवाहिन्यांचे आजार यासह हृदयविकार सुरू होतात. सहसा, जेव्हा तुम्ही तणावाखाली असता तेव्हा उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते, यामुळे स्वभाव चिडचिडा होतो. चला जाणून घेऊया तीन फळांबद्दल ज्यांचा वापर करून रक्तदाब नियंत्रित करता येतो.

केळी

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी केळी जरूर खावी, हे एक सामान्य फळ आहे आणि अनेकांना ते आवडते. या फळामध्ये भरपूर पोटॅशियम आढळते, ज्यामुळे हायपरटेन्शनची समस्या कमी होते.

संत्र

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण संत्री खातो, कारण त्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते. संत्र्यामध्ये  लिंबूवर्गीय ऍसिड असते आणि ते रक्तदाब वाढण्यापासून प्रतिबंधित करते.

सफरचंद

सफरचंद हे अतिशय आरोग्यदायी फळ आहे, ‘रोज एक सफरचंद खाल्ल्यास डॉक्टरकडे जाण्याची गरज भासणार नाही’ हे आपण अनेकदा ऐकले आहे.  हे अँटीऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत आहे ज्यामुळे शरीराच्या अनेक समस्या दूर होतात, तसेच रक्तदाब रुग्णांसाठी हे कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही.

तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद.
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला.
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर.
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं....
अदानी, राहुल गांधी पहिल्यांदाच एकसाथ? पवारांच्या निवासस्थानी काय घडलं?
अदानी, राहुल गांधी पहिल्यांदाच एकसाथ? पवारांच्या निवासस्थानी काय घडलं?.
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?.
मुख्यमंत्र्यांची महायुतीच्या आमदारांसह ब्रेकफास्ट मिटिंग, कशावर चर्चा?
मुख्यमंत्र्यांची महायुतीच्या आमदारांसह ब्रेकफास्ट मिटिंग, कशावर चर्चा?.
राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयात आज सुनावणी, 2008 चं प्रकरण नेमकं काय?
राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयात आज सुनावणी, 2008 चं प्रकरण नेमकं काय?.
सरकार आलं पण 1 वरून 2 नंबर झाले, शिंदेंवरून सभागृहात जोरदार टोलेबाजी
सरकार आलं पण 1 वरून 2 नंबर झाले, शिंदेंवरून सभागृहात जोरदार टोलेबाजी.