AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका दिवसात किती चपात्या खायला हव्यात?

जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात त्यांना असे वाटते की भाताऐवजी चपाती भरपूर प्रमाणात खाल्ल्याने हे होऊ शकतं. परंतु प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते, जी ओलांडणे धोकादायक ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया जास्त चपाती खाणे का वाईट आहे आणि एका दिवसात किती चपात्या खाणं योग्य आहे.

एका दिवसात किती चपात्या खायला हव्यात?
Chapatis in a dayImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 28, 2023 | 11:57 AM
Share

मुंबई: भाताप्रमाणेच चपाती देखील आपल्या दैनंदिन आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. चपाती, पराठा, फुलका, तवा रोटी, तंदूरी रोटी, रुमाली रोटी अशा अनेक रूपात आपण ते खातो. आपल्यापैकी अनेकजण ते मोठ्या आवडीने खातात. जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात त्यांना असे वाटते की भाताऐवजी चपाती भरपूर प्रमाणात खाल्ल्याने हे होऊ शकतं. परंतु प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते, जी ओलांडणे धोकादायक ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया जास्त चपाती खाणे का वाईट आहे आणि एका दिवसात किती चपात्या खाणं योग्य आहे.

जे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेतून जात आहेत त्यांनी चपाती खाण्याची मर्यादा देखील निश्चित केली पाहिजे. निरोगी प्रौढ पुरुषाने दररोज सुमारे 1700 कॅलरीज खाल्ल्या पाहिजेत, ज्यानुसार तो 2 वेळच्या जेवणात 3-3 चपात्या ती व्यक्ती शकते. दुसरीकडे, जर स्त्रिया महिलांबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी दिवसाला 1400 कॅलरीजचे सेवन केले पाहिजे. यानुसार 2 वेळच्या जेवणात महिला 2-2 चपात्या खाऊ शकतात. यामुळे वजन राखणे सोपे जाते.

भातापेक्षा चपात्या थोड्या आरोग्यदायी मानल्या जात असल्या तरी हे अन्न पचायला जास्त वेळ लागतो त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅस सारख्या समस्या उद्भवू शकतात. अशावेळी रात्री चपाती खाल्ल्यावर थोड्या वेळाने 15 ते 20 मिनिटं चालायलाच हवं, असं केल्याने पचनक्रिया व्यवस्थित होते. काही लोक रात्रीच्या जेवणात चपाती खाल्ल्यानंतर लगेच झोपतात, हा योग्य मार्ग नाही.

लवकरात लवकर वजन कमी करायचं असेल तर गव्हाऐवजी मल्टीग्रेन धान्यापासून तयार केलेल्या पिठाच्या चपात्या खा. यामध्ये मका, ज्वारी, नाचणी आणि बाजरीच्या पिठाच्या चपात्यांचा समावेश आहे. त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे बराच वेळ भूक लागत नाही आणि मग आपण जास्त खाणे टाळता.

Follow Us