Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोलेजन वाढवण्यासाठी तुमच्या सकाळच्या दिनचर्येत ‘या’ चहाचा करा समावेश

तुम्हाला तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने निरोगी आणि चमकदार बनवायची असेल, तर हा चहा तुमच्या आहाराचा भाग बनवल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतील. दररोज सकाळी हे प्यायल्याने तुमचे कोलेजन वेगाने वाढेल, ज्यामुळे तुमच्या बहुतेक समस्या दूर होतील.

कोलेजन वाढवण्यासाठी तुमच्या सकाळच्या दिनचर्येत 'या' चहाचा करा समावेश
Follow us
| Updated on: Mar 14, 2025 | 4:07 PM

प्रत्येकाला आपली त्वचा चमकदार आणि निरोगी कशी राहिल यासाठी अनेक घरगुती उपाय करत असतात. तसेच त्वचेची काळजी घेण्यासाठी स्किन केअर रूटिंग करतात. अशातच तुम्हाला तुमची त्वचा नेहमीच तरूण आणि चमकदार राहावी असे वाटत असेल तर दररोज सकाळी आवळा चहा पिण्यास सुरूवात करा. कारण आवळा हा अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत आहे, जो नैसर्गिक पद्धतीने कोलेजन वाढविण्यास मदत करतो. तुमची त्वचा घट्ट, सुरकुत्यामुक्त आणि निरोगी ठेवण्यासाठी कोलेजन आवश्यक आहे. त्यात वय वाढत असताना, शरीरात कोलेजनचे उत्पादन कमी होऊ लागते, ज्यामुळे त्वचा सैल आणि निर्जीव दिसू लागते. पण जर तुम्ही तुमच्या आहारात आवळा चहाचा समावेश केला तर ही समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते.

कोलेजन हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. कारण कोलेजन केवळ त्वचेसाठीच नाही तर हाडे, सांधे आणि केसांसाठी देखील महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरात कोलेजनचे प्रमाण योग्य असल्यास त्वचा घट्ट आणि लवचिक ठेवते. आवळा चहा केवळ त्याचे उत्पादन वाढवत नाही तर शरीराला आतून डिटॉक्सिफाय करतो, ज्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या हेल्दी दिसते. सकाळी रिकाम्या पोटी आवळा चहा पिणे सर्वात फायदेशीर आहे. तथापि, आवळा चहासोबत संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे.

आवळा चहा कसा बनवायचा?

आवळा चहा बनवणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला फक्त 1 चमचा सुका आवळा पावडर किंवा 2-3 ताजे आवळा तुकडे लागतील. एक कप पाणी उकळवा आणि त्यात आवळा घाला. मंद आचेवर 5-7 मिनिटे उकळुन द्या. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्यात मध किंवा लिंबू देखील मिक्स करू शकता. दररोज सकाळी रिकाम्या पोटी ते प्यायल्याने तुम्हाला अधिक फायदे मिळतील. जर तुम्ही तुमच्या सकाळच्या दिनचर्येत हे समाविष्ट केले तर तुम्हाला अनेक आरोग्य फायदे देखील मिळतील. यामुळे तुमची त्वचा निरोगी तर राहीलच पण पचनक्रियाही सुधारेल. आवळा चहा प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते आणि रक्त शुद्ध होते, ज्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या स्वच्छ आणि चमकदार दिसते.

हे सुद्धा वाचा

ते कोण पिऊ शकते?

आवळा चहासोबतच, निरोगी आहार घेणे देखील खूप महत्वाचे आहे. हिरव्या भाज्या, काजू, आणि प्रथिनेयुक्त पदार्थ खाल्ल्याने कोलेजनची पातळी समतोल राखली जाते. तसेच, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि जास्त साखरयुक्त पदार्थ खाणे टाळा कारण ते कोलेजनचे विघटन करतात. जास्त पाणी प्या आणि तुमची त्वचा हायड्रेट ठेवा. आवळा चहा सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे. जर तुम्हाला अ‍ॅसिडिटी किंवा कोणतीही अ‍ॅलर्जी नसेल तर तुम्ही ते तुमच्या आहारात सहजपणे समाविष्ट करू शकता. तथापि, गर्भवती महिला आणि कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्यांनी ते पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती.
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप.
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम.
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर.
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?.
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका.
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?.
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं..
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं...