Health | व्यायाम करणाऱ्यांनी ही आरोग्यदायी पेय पिणे अत्यंत फायदेशीर, वाचा अधिक!

लिंबूपाणी हे वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. लिंबापासून बनवलेल्या पेयामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवून आपल्याला निरोगी राहण्यास मदत करते. यामुळे नेहमीच व्यायाम करून आल्यावर लिंबू पाण्याचे नक्कीच सेवन करा. वजन कमी करणाऱ्यांनी थंड पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. व्यायाम केल्यानंतर एक ग्लास लिंबू पाणी प्यावे.

Health | व्यायाम करणाऱ्यांनी ही आरोग्यदायी पेय पिणे अत्यंत फायदेशीर, वाचा अधिक!
Image Credit source: unsplash.com
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 6:20 AM

मुंबई : आरोग्याची (Health) काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या टिप्स या फाॅलो केल्या जातात. त्यापैकी एक योग आहे. योगाचे महत्त्व अशा प्रकारे वाढत आहे की केवळ भारतच नाही तर जगभरातील लोक या शारीरिक हालचालींचा अवलंब करत आहेत. फक्त योगाच नव्हेतर कोणत्याही प्रकारचे व्यायाम (Exercise) करणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. बरेच लोक रात्री उशीरापर्यंत जागतात आणि सकाळी उशीरा उठतात. यामुळे त्यांना व्यायाम करणे शक्यत होत नाही, हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. दररोज सकाळी व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच व्यायाम करून आल्यावर आपण काही खास पेयांचे सेवन करणे फायदेशीर (Beneficial) ठरते, ही पेय नेमकी कोणती आहेत याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

लिंबूपाणी

लिंबूपाणी हे वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. लिंबापासून बनवलेल्या पेयामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवून आपल्याला निरोगी राहण्यास मदत करते. यामुळे नेहमीच व्यायाम करून आल्यावर लिंबू पाण्याचे नक्कीच सेवन करा. वजन कमी करणाऱ्यांनी थंड पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. व्यायाम केल्यानंतर एक ग्लास लिंबू पाणी प्यावे.

हे सुद्धा वाचा

मध आणि गरम पाणी

हे हेल्दी ड्रिंक तुम्ही व्यायाम करण्यापूर्वी किंवा नंतर पिऊ शकता, मधामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे शरीर निरोगी होते, तसेच यापासून बनवलेले पेय वजन कमी करण्यास देखील मदत करते. जर शरीरात जास्त चरबी असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास मधाचे पाणी प्या, कोमट पाण्यात मधासोबत लिंबू मिसळले तर वजन लवकर कमी होते. हे पाणी तुम्ही दिवसातून कधीही पिऊ शकता.

नारळ पाणी

नारळाच्या पाण्यात 95% पाणी आणि चरबीचे प्रमाण फारच कमी असते. नारळाचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते, तसेच त्यामध्ये असलेले साइटोकिनिन, वृद्धत्वाची चिन्हे येण्यापासून प्रतिबंधित करते. नारळपाणी प्यायल्यानंतर रक्तदाब, हृदय, किडनी आणि डिहायड्रेशन सारख्या समस्यांपासून स्वतःला दूर ठेवता येते. नारळपाणी शरीरातील पाण्याची कमतरता दूर करू शकते. व्यायाम करताना जास्त घाम जातो. यामुळे लगेचच नारळपाणी प्या.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.