AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | व्यायाम करणाऱ्यांनी ही आरोग्यदायी पेय पिणे अत्यंत फायदेशीर, वाचा अधिक!

लिंबूपाणी हे वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. लिंबापासून बनवलेल्या पेयामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवून आपल्याला निरोगी राहण्यास मदत करते. यामुळे नेहमीच व्यायाम करून आल्यावर लिंबू पाण्याचे नक्कीच सेवन करा. वजन कमी करणाऱ्यांनी थंड पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. व्यायाम केल्यानंतर एक ग्लास लिंबू पाणी प्यावे.

Health | व्यायाम करणाऱ्यांनी ही आरोग्यदायी पेय पिणे अत्यंत फायदेशीर, वाचा अधिक!
Image Credit source: unsplash.com
| Updated on: Jun 20, 2022 | 6:20 AM
Share

मुंबई : आरोग्याची (Health) काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या टिप्स या फाॅलो केल्या जातात. त्यापैकी एक योग आहे. योगाचे महत्त्व अशा प्रकारे वाढत आहे की केवळ भारतच नाही तर जगभरातील लोक या शारीरिक हालचालींचा अवलंब करत आहेत. फक्त योगाच नव्हेतर कोणत्याही प्रकारचे व्यायाम (Exercise) करणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. बरेच लोक रात्री उशीरापर्यंत जागतात आणि सकाळी उशीरा उठतात. यामुळे त्यांना व्यायाम करणे शक्यत होत नाही, हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. दररोज सकाळी व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच व्यायाम करून आल्यावर आपण काही खास पेयांचे सेवन करणे फायदेशीर (Beneficial) ठरते, ही पेय नेमकी कोणती आहेत याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

लिंबूपाणी

लिंबूपाणी हे वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. लिंबापासून बनवलेल्या पेयामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवून आपल्याला निरोगी राहण्यास मदत करते. यामुळे नेहमीच व्यायाम करून आल्यावर लिंबू पाण्याचे नक्कीच सेवन करा. वजन कमी करणाऱ्यांनी थंड पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. व्यायाम केल्यानंतर एक ग्लास लिंबू पाणी प्यावे.

मध आणि गरम पाणी

हे हेल्दी ड्रिंक तुम्ही व्यायाम करण्यापूर्वी किंवा नंतर पिऊ शकता, मधामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे शरीर निरोगी होते, तसेच यापासून बनवलेले पेय वजन कमी करण्यास देखील मदत करते. जर शरीरात जास्त चरबी असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास मधाचे पाणी प्या, कोमट पाण्यात मधासोबत लिंबू मिसळले तर वजन लवकर कमी होते. हे पाणी तुम्ही दिवसातून कधीही पिऊ शकता.

नारळ पाणी

नारळाच्या पाण्यात 95% पाणी आणि चरबीचे प्रमाण फारच कमी असते. नारळाचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते, तसेच त्यामध्ये असलेले साइटोकिनिन, वृद्धत्वाची चिन्हे येण्यापासून प्रतिबंधित करते. नारळपाणी प्यायल्यानंतर रक्तदाब, हृदय, किडनी आणि डिहायड्रेशन सारख्या समस्यांपासून स्वतःला दूर ठेवता येते. नारळपाणी शरीरातील पाण्याची कमतरता दूर करू शकते. व्यायाम करताना जास्त घाम जातो. यामुळे लगेचच नारळपाणी प्या.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.