AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सण आणि उत्सवाचा साक्षीदार; लाडूची जन्मकथा जाणून घ्या

गणेश चतुर्थी असो, दिवाळीचा गोडवा असो किंवा लग्नाचा आनंद असो आपल्या खास प्रसंगी आपल्या ताटांना सजवणाऱ्या लाडूंची एक कथा आहे? जाणून घेऊया लाडूचा इतिहास

सण आणि उत्सवाचा साक्षीदार; लाडूची जन्मकथा जाणून घ्या
लाडूची कुळकथा
| Updated on: Nov 20, 2024 | 6:19 PM
Share

या लाडूचा केवळ आपल्या चवीवरच नव्हे तर आपल्या परंपरा आणि संस्कृतीवरही खोलवर परिणाम झाला आहे. लाडूचा प्रत्येक दाणा आपल्या इतिहासाशी जोडलेला आहे. चला तर जाणून घेऊया या मधुर गोडाचा उगम कसा झाला आणि तो प्रत्येक भारतीयाच्या उत्सवाचा अविभाज्य भाग कसा बनला.

लाडूचा खूप जुना इतिहास आहे. जगातील पहिला लाडू भारतात बनवला गेला. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लाडू कोणत्याही मिठाईवाल्याने तयार केला नाही. तर एक प्रसिद्ध डॉक्टर सुश्रुत यांनी तयार केला आहे. त्यावेळी ते रुग्णांना औषध म्हणून लाडू देत असत. त्याकाळी लाडूचा वापर गोड म्हणून न करता औषध म्हणून केला जात असे.

इतिहास आणि आयुर्वेदीक ग्रंथातून मिळालेल्या माहितीनुसार लाडूचा शोध प्रसिद्ध डॉ. सुश्रुत यांनी लावला होता. त्याकाळी तीळ, गुळ, मध, शेंगदाणे आणि इतर सुक्या मेव्याचे मिश्रण तयार करून लाडू तयार केले जात होते. ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया होत असे त्यांना ते औषध म्हणून दिल्या जात होते. हा लाडू बनवण्यासाठी औषधे, जडीबुटी, संसर्गापासून बचाव करणारे पदार्थ आणि मध यांचे मिश्रण करून ते तयार केले जात होते. आयुर्वेदामध्ये तीळ आणि गुळाचे लाडू खाल्ल्याने शक्ती वाढते आणि शरीर गरम होते असे सांगितले आहे. विशेषतः हिवाळ्यात तिळाचे लाडू खाल्ल्याने शरीराला ऊर्जा आणि ऊब मिळते.

काही ऐतिहासिक कागदपत्रानुसार चोल राजघराण्यातील सैनिक जेव्हा युद्धासाठी बाहेर पडत तेव्हा ते शुभेच्छा म्हणून त्यांच्यासोबत लाडू घेऊन जात असत. बदलत्या काळानुसार लाडूही बदलले आणि त्यात गुळ ऐवजी साखर वापरली जाऊ लागली. काही शतकांपूर्वी कन्नड साहित्यात आणि सुमारे दशकांपूर्वी बिहारमध्ये एक महत्त्वाचा खाद्यपदार्थ म्हणून लाडूचा उल्लेख आहे. तिथे एक मिठाई तयार केली जायची त्यामध्ये बेसना पासून बनवलेली बुंदी वापरली जायची.

भारताच्या कानाकोपऱ्यात विविध प्रकारचे लाडू बनवले जातात. उत्तर भारतात बेसनाचे लाडू, दक्षिणेत रवा लाडू, महाराष्ट्रात तिळाचे लाडू आणि बंगालमध्ये नारळाचे लाडू असे प्रकार प्रसिद्ध आहेत. प्रत्येक प्रदेशातील चव आणि पदार्थांमधील फरक याला आणखीन खास बनवतो. या लाडूंनी आंतरराष्ट्रीय मिठाच्या यादीतही आपले स्थान निर्माण केले आहे.

कालांतराने लोक त्यांच्या आवडीनुसार लाडू बनवू लागले आणि आज तुम्हाला अनेक प्रकारचे लाडू खायला मिळतात. तर हा होता लाडूंचा इतिहास. आता जेव्हा तुम्ही कोणाला लाडू खायला द्याल तेव्हा त्यांना लाडू देण्याआधी त्याचा इतिहास सांगायला अजिबात विसरू नका.

Follow Us
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर