सतत जाणवतो थकवा आणि अशक्तपणा? असू शकतात या पोषक तत्वाच्या कमतरतेची लक्षणे, असे ओळखा संकेत

शरीरात लोहाची कमतरता जाणवत असेल तर अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. शरीराला लोहाचा पुरेसा पुरवठा होतोय की नाही हे कसे समजावे, ते जाणून घ्या.

सतत जाणवतो थकवा आणि अशक्तपणा? असू शकतात या पोषक तत्वाच्या कमतरतेची लक्षणे, असे ओळखा संकेत
Image Credit source: TV9 Telugu
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 4:49 PM

नवी दिल्ली – तुम्हाला वारंवार थकवा आल्यासारखे वाटते का, श्वास घ्यायला त्रास होतो का? तुमची त्वचा निस्तेज, कोमेजलेली (pale skin) दिसते का ? या प्रश्नाचे उत्तर हो असं असेल तर तुमच्या शरीरात आयर्न म्हणजेच लोहाची कमतरता (iron deficiency) असू शकते, जी पोषणासंदर्भातील जगातील सर्वात सामान्य समस्यांपैकी एक आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगभरातील सुमारे 30 टक्के लोक ॲनिमियाने (Anemia)ग्रस्त आहेत. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीराच्या लाल रक्तपेशींमध्ये खनिजांची कमतरता असते ज्यामुळे पेशींपर्यंत ऑक्सिजन कमी प्रमाणात पोहोचतो.

परंतु आपण स्वत: या स्थितीचे निदान आणि उपचार करू नये कारण इतर समस्यांची लक्षणेही असू शकतात, तसेच लोहाचे जास्त सेवन केल्याने तुमच्या यकृताला देखील नुकसान होऊ शकते.

डॉक्टरांकडे कधी जावं ?

हे सुद्धा वाचा

– खूप थकवा जाणवत असेल आणि उर्जेची पातळी कमी झाल्यास

– श्वास घेण्यास त्रास होत असेल तर

– हृदयाची गती वाढल्यास

– त्वचा पिवळी दिसू लागल्यास

ही ॲनिमियाची सामान्य लक्षणे आहेत. पण त्याशिवाय इतर काही लक्षणेही दिसू शकतात.

– डोकेदुखी व चक्कर येणे

– जीभेला सूज येणे किंवा वेदना होणे

– केस जास्त गळे

– कागदासारखे पदार्थ खाण्याची इच्छा होणे

– तोंडात फोड किंवा अल्सर येणे

– नखं खराब होणे

– पाय सतत हलवण्याची सवय असणे

ॲनिमिया होण्याचे कारण ?

कोणत्याही व्यक्तीला ॲनिमिया होण्याची अनेक कारणे असू शकतात. पण त्याचे मुख्य कारण म्हणजे आहारात लोहाची कमतरता असणे. कारण आपले शरीर हे (लोह) खनिज स्वतः तयार करू शकत नाही. परंतु आपल्या शरीरात लोहाची कमतरता निर्माण होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल आणि लोहयुक्त पदार्थ खाऊन तुम्हाला ही कमतरता भरून काढायची असेल, तर आधी हे समजून घ्या की, तुमचे शरीर सर्व प्रकारचे लोह शोषू शकत नाही.

लोह हे हेम आणि नॉन-हेम असे दोन प्रकारचे असते. हेम लोह हे लाल मांस, यकृत, अंडी आणि माशांमध्ये आढळते, जे सहज पचवता जाऊ शकते. तसेच पालक आणि कडधान्ये यांसारख्या गडद हिरव्या पालेभाज्यांमध्येही लोह आढळते, परंतु ते नॉन-हेम प्रकारचे लोह आहे. म्हणजे भाज्यांमधून मिळणारे जास्त लोह आपण पचवू शकत नाही. यासोबतच, ब्रेड आणि ब्रेकफास्ट तृणधान्यांमध्ये ओट्स इत्यादी खनिजे देखील असतात, परंतु हे देखील पचण्याजोगे नसते.

हिरव्या पालेभाज्या

जर तुम्हाला नैसर्गिक स्त्रोतांकडून लोह मिळत असेल तर? कोबी हा लोहाचा चांगला स्रोत आहे, परंतु तो शिजवल्याने त्यातील लोहाचे प्रमाण कमी होऊ शकते. कारण संत्र्याप्रमाणेच कोबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. पाणी उकळल्यावर व्हिटॅमिन सी पाण्यात जाते. म्हणूनच जर तुम्हाला संपूर्ण पोषण हवे असेल तर कोबी हा कच्चा किंवा वाफवून घ्या. लोह आणि व्हिटॅमिन सीने भरलेल्या इतर भाज्यांबाबतही असेच केले पाहिजे. पण याबाबतीत पालक हा वेगळा आहे. पालक शिजवल्याने वापरण्यायोग्य लोह अधिक रिलीज होते. पालकमध्ये ऑक्सलेट असते जे लोह बांधून ठेवते.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.