AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss Tips : तू धाव पुढं गड्या तुला भीती कशाची …. ? वजन कमी करण्यासाठी कधी धावणे ठरते फायदेशीर ?

वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे चांगले आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण तो व्यायाम नेमका कधी करावा, त्याची योग्य वेळ कोणती याबाबत लोक संभ्रमात पडतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या वेळी धावणे चांगले आहे.

Weight Loss Tips : तू धाव पुढं गड्या तुला भीती कशाची .... ? वजन कमी करण्यासाठी कधी धावणे ठरते फायदेशीर ?
Image Credit source: Tv9
| Updated on: Mar 09, 2023 | 8:22 AM
Share

नवी दिल्ली : वजन कमी करण्यासाठी बहुतांश लोकं हे दिवसभरात बराचसा वेळ काढून व्यायाम (exercise) करतात. वर्कआऊट (workout) करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती असाही गोंधळ अनेक वेळा लोकांच्या मनात होत असतो. सकाळी धावल्याने वजन लवकर कमी होते किंवा संध्याकाळी धावणे फायदेशीर ठरते? व्यायामाची योग्य वेळ तुमच्या वजनावर (effect on weight) अनेक प्रकारे परिणाम करते. तर, कोणत्या वेळी तुम्ही वर्कआउट करून वजन लवकर कमी (weight loss) करू शकता, हे जाणून घेऊया.

कोणत्या वेळी तुम्ही धावून वजन लवकर कमी करू शकता ?

व्यायामाची पद्धत तुमचे वजन कमी करण्यावर अवलंबून असते, म्हणूनच वर्कआउट करण्याची योग्य वेळ जाणून घेणे हे खूप महत्वाचे आहे. सकाळी आठ वाजण्यापूर्वी धावण्याचे अनेक फायदे आहेत. धावणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहते आणि बराच काळ कोणत्याही रोगापासून दूर राहता येते. धावण्याचा आणखी एक फायदा असा आहे की, एकतर आपण बराच काळ तंदुरुस्त राहतो आणि या व्यायामासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे देखील खर्च करावे लागत नाही. कोणत्याही वयोगटातील कोणतीही व्यक्त सहज धावण्याचा व्यायाम करू शकते.

सकाळी धावल्यामुळे दिवसभर फ्रेश वाटतं. यासोबतच अशा वेळी धावल्याने हृदयाचे ठोके वाढतात, तसेच धावल्याने रात्री चांगली झोप लागते. तर संध्याकाळी शरीराचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढते. चरबी कमी करण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळ यापैकी दोन्ही वेळा चांगल्या असू शकतात. परंतु बहुतेक वर्कआउट्स करण्यासाठी, सकाळची वेळ ही सर्वोत्तम मानली जाते.

व्यायामाच्या वेळेचा वजनावर होतो परिणाम

तसं पहायला गेलं तर प्रत्येक व्यक्ती जसा वेळ मिळेल तसा आपापल्या वेळेनुसार व्यायाम करतो. परंतु तुम्ही ज्या पद्धतीने व्यायाम करता आणि ज्यावेळी व्यायाम करता, त्या दोन्हींचा तुमच्या वजनावर परिणाम होतो, हे फारच कमी लोकांना माहीत असेल. बर्‍याच लोकांना सकाळी लवकर उठता येत नाही, म्हणूनच ते संध्याकाळी धावतात. तसेच काही लोकांना असे वाटते की सकाळी लवकर उठल्यानंतर वर्कआउट करणे चांगले आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यायाम करत असलात तरी सकाळी लवकर उठून व्यायाम करणे उत्तम मानले जाते. यामुळे शरीरात एंडोर्फिन हार्मोन तयार होतो जे तुम्हाला तणावापासून दूर ठेवते.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.