AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss Tips : तू धाव पुढं गड्या तुला भीती कशाची …. ? वजन कमी करण्यासाठी कधी धावणे ठरते फायदेशीर ?

वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे चांगले आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण तो व्यायाम नेमका कधी करावा, त्याची योग्य वेळ कोणती याबाबत लोक संभ्रमात पडतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या वेळी धावणे चांगले आहे.

Weight Loss Tips : तू धाव पुढं गड्या तुला भीती कशाची .... ? वजन कमी करण्यासाठी कधी धावणे ठरते फायदेशीर ?
Image Credit source: Tv9
| Updated on: Mar 09, 2023 | 8:22 AM
Share

नवी दिल्ली : वजन कमी करण्यासाठी बहुतांश लोकं हे दिवसभरात बराचसा वेळ काढून व्यायाम (exercise) करतात. वर्कआऊट (workout) करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती असाही गोंधळ अनेक वेळा लोकांच्या मनात होत असतो. सकाळी धावल्याने वजन लवकर कमी होते किंवा संध्याकाळी धावणे फायदेशीर ठरते? व्यायामाची योग्य वेळ तुमच्या वजनावर (effect on weight) अनेक प्रकारे परिणाम करते. तर, कोणत्या वेळी तुम्ही वर्कआउट करून वजन लवकर कमी (weight loss) करू शकता, हे जाणून घेऊया.

कोणत्या वेळी तुम्ही धावून वजन लवकर कमी करू शकता ?

व्यायामाची पद्धत तुमचे वजन कमी करण्यावर अवलंबून असते, म्हणूनच वर्कआउट करण्याची योग्य वेळ जाणून घेणे हे खूप महत्वाचे आहे. सकाळी आठ वाजण्यापूर्वी धावण्याचे अनेक फायदे आहेत. धावणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहते आणि बराच काळ कोणत्याही रोगापासून दूर राहता येते. धावण्याचा आणखी एक फायदा असा आहे की, एकतर आपण बराच काळ तंदुरुस्त राहतो आणि या व्यायामासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे देखील खर्च करावे लागत नाही. कोणत्याही वयोगटातील कोणतीही व्यक्त सहज धावण्याचा व्यायाम करू शकते.

सकाळी धावल्यामुळे दिवसभर फ्रेश वाटतं. यासोबतच अशा वेळी धावल्याने हृदयाचे ठोके वाढतात, तसेच धावल्याने रात्री चांगली झोप लागते. तर संध्याकाळी शरीराचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढते. चरबी कमी करण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळ यापैकी दोन्ही वेळा चांगल्या असू शकतात. परंतु बहुतेक वर्कआउट्स करण्यासाठी, सकाळची वेळ ही सर्वोत्तम मानली जाते.

व्यायामाच्या वेळेचा वजनावर होतो परिणाम

तसं पहायला गेलं तर प्रत्येक व्यक्ती जसा वेळ मिळेल तसा आपापल्या वेळेनुसार व्यायाम करतो. परंतु तुम्ही ज्या पद्धतीने व्यायाम करता आणि ज्यावेळी व्यायाम करता, त्या दोन्हींचा तुमच्या वजनावर परिणाम होतो, हे फारच कमी लोकांना माहीत असेल. बर्‍याच लोकांना सकाळी लवकर उठता येत नाही, म्हणूनच ते संध्याकाळी धावतात. तसेच काही लोकांना असे वाटते की सकाळी लवकर उठल्यानंतर वर्कआउट करणे चांगले आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यायाम करत असलात तरी सकाळी लवकर उठून व्यायाम करणे उत्तम मानले जाते. यामुळे शरीरात एंडोर्फिन हार्मोन तयार होतो जे तुम्हाला तणावापासून दूर ठेवते.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत