AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्मार्टफोनच्या वापराचा पालकांवर होतोय परिणाम; मुलांवर होते चिडचिड

स्मार्टफोनच्या वापरामुळे आपण बाहेरच्या जगाशी जोडले जात असलो तरीही त्यामुळे आपण आपल्या कुटुंबापासून दूर होत आहोत.

स्मार्टफोनच्या वापराचा पालकांवर होतोय परिणाम; मुलांवर होते चिडचिड
| Updated on: Oct 08, 2022 | 4:41 PM
Share

आजकालच्या डिजीटल जगात टिकाव धरण्यासाठी स्मार्टफोनचा (smartphone)वापर अनिवार्य आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच स्मार्टफोन वापराची सवय लागली आहे. स्मार्टफोन हा सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. काहीजण त्याचा वापर अगदी कामापुरता, गरजेपुरताच करतात, मात्र काही व्यक्ती अगदी त्याच्या आहारी गेल्या आहेत. आधी केवळ प्रोफेशनल लाईफपुरता मर्यादित असलेला स्मार्टफोन आता खासगी आयुष्यावरही प्रभाव टाकत आहे. कॅनडामध्ये नुकताच या संदर्भात एक संशोधन (research)करण्यात आले असून त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार, स्मार्टफोन आणि इतर डिजीटल डिव्हाईसचा वापर करणाऱ्या पालकांचे (parents) आपल्या मुलांशी वागणे बदलले आहे. ते त्यांच्यावर चिडचिड करू लागले आहेत.

5 ते 18 वयोगटातील दोन मुलं असणाऱ्या 549 पालकांवर कॅनडामध्ये हा रिसर्च करण्यात आला. या सर्व रिसर्चचे निष्कर्ष अतिशय धक्कादायक होते. त्या निष्कर्षांनुसार, जे पालक दिवससभरात 4 तास किंवा त्याहून अधिक काळ मोबाईल अथवा इतर डिजीटल डिव्हाईसचा वापर करतात, ते आपल्या मुलांवर चिडचिड करतात. ते मुलांना सतत रागावत राहतात, असेही त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

या रिसर्चनुसार, मोबाईल अथवा इतर डिजीटल डिव्हाईसचा वापर करणाऱ्या पालकांपैकी 75 टक्के व्यक्तींना डिप्रेशनचा त्रास होता. डिजीटल डिव्हाईसचा वापर करणाऱ्या पालकांची मुलांसंदर्भातील वागणूक अतिशय नकारात्मक होती.

डिजीटल डिव्हाईसमुळे स्क्रीनचा वाढलेला वेळ आणि व्यवहारातील चिडचिडेपणा यांचा परस्पर संबंध आढळला आहे. या रिसर्चनुसार, कुटुंबातील सदस्यांमधील संभाषण कमी झाले, त्याचा परिणाम असा झाला की आई-वडिलांमध्ये वाईट सवयी निर्माण होऊ लागल्या.

मात्र, कॅनडामध्ये करण्यात आलेल्या या संशोधनातून असेही समोर आले आहे की, जे पालक दिवसातून एक किंवा दोन तास डिजीटल उपकरणांवर घालवतात, त्यांचे मुलांशी वागणे अधिक अधिक सकारात्मक असते.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.