AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उष्माघाताची लक्षणे दिसल्यास ताबडतोब अवलंबा ‘या’ 5 गोष्टी, खबरदारी देखील जाणून घ्या

उन्हाळ्यात तापमान वाढल्याने वातावरणात उष्ण वारे वाहू लागतात आणि त्यामुळे उष्माघाताचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो, म्हणून आपण सर्वांनी आधीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. तर आजच्या या लेखात आपण उष्माघाताची लक्षणे दिसू लागताच कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊ.

उष्माघाताची लक्षणे दिसल्यास ताबडतोब अवलंबा 'या' 5 गोष्टी, खबरदारी देखील जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Apr 12, 2025 | 3:49 PM
Share

एप्रिल महिन्यात उष्णतेचा पारा अनेक ठिकाणी पारा 40 च्या पुढे गेला आहे. यामुळे दिवसभरात उन्हाचा कडाका वाढत आहे. वाढत्या उष्णतेमुळे उन्हाच्या झळा या सहन होत नसल्याने उष्मघाताच्या समस्या निर्माण होत आहे. अशावेळेस उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचे संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे. आपण सर्वांनी या उन्हाळ्यात संतुलित आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावे आणि नारळ पाणी, ताक, लिंबूपाणी, फळांचे ज्यूस इत्यादी निरोगी पेये प्यावीत. यामुळे शरीर हायड्रेट राहते. शक्य तितके कमी उन्हात बाहेर जाण्याचा प्रयत्न करावा. विशेषतः दुपारी 12 ते 3 या वेळी घरीच राहावे. कधीकधी असे असूनही उष्माघात होतो. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि खबरदारी घेतली पाहिजे.

जर उष्माघात झाला आणि त्याच्या लक्षणांकडे लक्ष दिले नाही तर ही स्थिती गंभीर होऊ शकते आणि थोडीशीही निष्काळजीपणा घातक ठरू शकतो. उष्माघाताची काही लक्षणे दिसून येतात, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नये. याबद्दल आजच्या लेखात आपण सविस्तर जाणून घेऊयात.

उष्माघाताची लक्षणे कोणती?

उष्णतेमुळे शरीराचे तापमान खूप वाढते.

जलद श्वास आणि नाडीचा वेग वाढतो.

तीव्र डोकेदुखीसह चक्कर येणे.

मळमळ आणि उलट्या होणे आणि अस्वस्थ वाटणे.

अस्वस्थ वाटल्याने स्पष्टपणे बोलता न येणे.

चेहरा लालसर पडणे.

या 5 गोष्टी ताबडतोब केल्या पाहिजेत

जर उष्माघाताची लक्षणे दिसून येत असतील तर लगेच घट्ट कपडे घातले असतील ते सैल करा किंवा हलके कपडे घाला.

गर्दीच्या ठिकाणापासुन दुर जाऊन मोकळ्या हवेशीर जागेत बसा.

थंड पाण्यात टॉवेल किंवा सुती कापड भिजवा, ते पिळून घ्या आणि शरीर पुसून घ्या.

शरीराचे तापमान कमी करण्यासाठी काखेखाली एक ओले कापड ठेवा.

उष्माघाताची लक्षणे दिसून येत असतील तर थोडा आराम करा. त्यानंतर नारळ पाणी किंवा ज्यूस यासारखे आरोग्यदायी पेय प्या.

ही खबरदारी घेणे महत्वाचे

उष्माघात झाल्यास घरगुती उपचारांसह ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

उष्माघात झाल्यास ताबडतोब खूप थंड ठिकाणी नेऊ नका. अशा ठिकाणी बसवा जिथे तापमान खूप गरम किंवा खूप थंड नसेल.

जर उष्माघाताची लक्षणे आढळली तर लगेच खूप थंड पाणी पिण्याची चूक करू नका.

उष्माघात झाल्यास लगेच आंघोळ करण्याची चूक करू नये, अन्यथा स्थिती आणखी बिकट होऊ शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात