AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी विरोधीपक्ष नेता असतानाही ते… अजित पवारांविषयी देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. विमान अपघातामध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला. आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात करताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडला.

मी विरोधीपक्ष नेता असतानाही ते... अजित पवारांविषयी देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 23, 2026 | 1:07 PM
Share

आज, 23 फेब्रुवारी पासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. दिवंगत नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प मांडणार होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अजित दादांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी अजितदादा जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा काय म्हणाले हे देखील सांगितले आहे.

मी विरोधी पक्ष नेता होतो तेव्हा…

अजित दादांविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दादांना एखादा निर्णय पटला नाही तर स्पष्ट सांगयचे. मंत्रीमंडळातील प्रत्येक विषयाचा नीट अभ्यास दादा करायचे. राज्याने दादांच्या रुपात न लाभलेला मुख्यमंत्री गमावला. अजितदादांनी पहिल्यांदा टायमिंग चुकवला. मी विरोधी पक्ष नेता होतो तेव्हा दादा मला मुख्यमंत्री बोलायचे. 12 वाजता कार्यक्रम असेल तर दादा पोहोचायचे 11.59ला.

मुख्यमंत्री पदाकरीता पूर्णपणे क्षमता असलेलं नेतृत्त्व

पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्राला एक जो चांगला मुख्यमंत्री मिळाला असता तो अजित दादांच्या रुपाने. ते आता आपल्यामध्ये नाहीत आणि मला विश्वास आहे की शेवटी नियतीने त्यांचे स्वप्न पूर्ण केलं असतं. त्यांच्यामध्ये ती क्षमता नक्की होती. शेवटी राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गणीतं असतात. पण क्षमतेचा जर विचार केला मुख्यमंत्री पदाकरीता पूर्णपणे क्षमता असलेलं नेतृत्त्व अजित दादांचे होते. खरं तर मी असं म्हणेल की राजकारणामध्ये आपल्याकडे अनेक नेते आहेत अनेक दादा आहेत, सगळ्याच दादांनी चांगले काम केले. पण महाराष्ट्रामध्ये वसंत दादा आणि अजित दादा ही दोन नाव अशी आहेत की ज्यांना दादा म्हणून नेहमीच महाराष्ट्र हा त्यांच्या कामाकरता याठिकाणी लक्षात ठेवेल.

“दादांनी सुधार नाईकांच्या मंत्री मंडळात जेव्हा काम केले त्यावेळी सुरुवातीच्या वेळी दादा जेव्हा मंत्री झाले त्यावेळी त्यांचा स्वभाव थोडा अबोल होता किंवा नेमकं केवढं काम करायचं अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे पहिल्यांदा त्यांचा दृष्टीकोन एका मोठ्या घराण्यातील माणूस आहे, हा मंत्री झालेला आहे. पण त्यानंतर दादांनी जेव्हा काम करायला सुरुवात केले, त्यानंतर सुधाकरराव त्यांच्या प्रत्येक वाक्यात अजित दादांचं नाव घ्यायचे. त्यातून अजित दादांचा परिचय हा काम करणारा मंत्री म्हणून झाला. बारामतीचा अपराजित नेता म्हणून दादांकडे आपण पाहातो. जनतेचं जे प्रेम दादांना मिळालं ते निश्चितपणे कोणत्याही नेत्याकरीता त्यापेक्षा मोठा दुसराही ठेवा असू शकत नाही” असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार