AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diabetes Care : रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन

मधुमेहाचे निदान झाल्यास, तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधे घेण्याव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित करणारे पदार्थ देखील घेऊ शकता. ही नैसर्गिक औषधी वनस्पती, मसाले, भाज्या आणि फळे तुमची ऊर्जा पातळी राखण्यास मदत करतात.

Diabetes Care : रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी 'या' पदार्थांचे करा सेवन
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी 'या' पदार्थांचे करा सेवन
| Edited By: | Updated on: Aug 19, 2021 | 8:20 AM
Share

मुंबई : मधुमेहाच्या रुग्णाने नेहमी त्याच्या आहाराबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे महत्वाचे आहे. यामुळे हृदयाशी संबंधित समस्या, स्ट्रोक, मूत्रपिंड रोग, अंधत्व इत्यादींचा धोका वाढू शकतो. मधुमेह तेव्हा होतो जेव्हा एकतर आपले शरीर पुरेसे इन्सुलिन बनवत नाही किंवा त्याचा प्रभावी वापर करू शकत नाही. तुम्हाला मधुमेहाचे निदान झाल्यास, तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधे घेण्याव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित करणारे पदार्थ देखील घेऊ शकता. ही नैसर्गिक औषधी वनस्पती, मसाले, भाज्या आणि फळे तुमची ऊर्जा पातळी राखण्यास मदत करतात. (Take these foods to control blood sugar levels)

कडुनिंब

कडुनिंब ही वर्षानुवर्षे जुनी औषधी आहे. दात आणि त्वचेच्या समस्यांपासून ते डी-टॉक्सिफिकेशनपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी हे फायदेशीर आहे. कडुनिंबामध्ये फ्लेव्होनॉईड्स, ग्लायकोसाइड्स आणि ट्रायटरपेनोईड्स नावाची रसायने असतात जी ग्लुकोजचे सेवन दडपण्यास मदत करतात. तुम्ही ते दिवसातून दोनदा पावडर स्वरूपात घेऊ शकता, जास्तीत जास्त फायद्यासाठी ते तुमच्या चहा, पाणी किंवा अन्नात घाला.

कारले

कारल्याचा रस मधुमेही रुग्णासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात कॅराटीन आणि मोमोर्डिसिन असतात. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास हे मदत करतात. तुम्ही सकाळी कारल्याचा रस पिऊ शकता. यामध्ये आपण आवळा किंवा आपल्या आवडीची कोणतीही भाजी घालू शकता आणि काही मिरपूड आणि मीठ घालू शकता. मधुमेह नियंत्रण ठेवण्यासाठी, सकाळी एक ग्लास कारल्याचा रस पिणे खूप फायदेशीर आहे.

आले

आले प्राचीन काळापासून प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात आढळते. त्याचे अगणित फायदे आहेत. इन्सुलिन स्राव नियंत्रित करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे. तुम्ही चहामध्ये आले घालू शकता किंवा तुम्ही आले आणि हळदीचे दूध घेऊ शकता. लक्षात ठेवा की ते कच्चे असावे. आपण सुंठ पावडरचे देखील सेवन करु शकता.

जांभूळ

मधुमेह असलेल्या लोकांसाठी जांभूळ एक फायदेशीर फळ आहे. साखर नियंत्रित करण्यासाठी हे खूप चांगले आहे. जांभळामध्ये जॅमोबोलिन नावाचे संयुग असते. जॅमोबोलिन मुख्यतः जांभळाच्या बियांमध्ये असते जे रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते.

मेथी

मेथी शरीरातील ग्लुकोज टॉलरेंस सुधारण्यास मदत करते. यात विघटनशील फायबरचे प्रमाण जास्त असते. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. (Take these foods to control blood sugar levels)

इतर बातम्या

Bank Job 2021 : बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी भरती, पदवीधर उमेदवार करू शकतात अर्ज

भूमाफिया, सावकारी, हद्दपारी… मंकावती तीर्थकुंड हडप करणाऱ्या देवानंद रोचकरींचा गुन्ह्यांचा मोठा इतिहास

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.