‘डायलिसिस’ उपचारांबाबत लोकांनामध्ये अजुनही अनेक गैरसमज! जाणून घ्या, ‘डायलिसिस’ उपचाराची सत्य परिस्थिती!

डायलिसिसच्या परिस्थितीमुळे मूत्रपिंडाचे गंभीर नुकसान होते, परंतु या वैद्यकीय उपचारांबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज पसरले आहेत. परंतु, सत्य परिस्थिती वेगळी असते. जाणून घ्या काय आहे गैरसमज आणि वास्तविक स्थिती.

‘डायलिसिस’ उपचारांबाबत लोकांनामध्ये अजुनही अनेक गैरसमज! जाणून घ्या, ‘डायलिसिस’ उपचाराची सत्य परिस्थिती!
डायलिसिसImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 5:47 PM

किडनी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून आपल्याला निरोगी ठेवते. पण कालांतराने किंवा आरोग्याशी संबंधित इतर कारणांमुळे किडनी खराब होते. किडनी निकामी (Kidney failure) होण्यामागे चुकीचा आहार, वृद्धत्व, स्वत:ची काळजी न घेणे, औषधांचे अतिसेवन किंवा प्रथिनांचे जास्त सेवन ही प्रमुख कारणे असू शकतात. याला एक प्रकारे क्रोनिक किडनी डिसीस असे म्हणतात. मूत्रपिंड खराब झाल्यास किंवा आकुंचन पावल्यास, प्रत्यारोपण देखील केले जाऊ शकते, परंतु ते महाग तसेच खूप गुंतागुतीचे असते. तसेच, मूत्रपिंड निकामी झाल्यास, पीडित व्यक्तीला काही काळानंतर डायलिसिससाठी जावे लागते. ही एक वैद्यकीय उपचार (Medical treatment) पद्धती आहे, जी किडनीचे काम करते. डायलिसिस करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची अधिक काळजी घेतली पाहिजे हे खरे आहे, परंतु या उपचाराबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज (Many misunderstandings) आहेत. परंतु, सत्य परिस्थीती तशी नसते. जाणून घ्या, डायलिसीस बाबत लोकांच्या मनातील गैरसमज आणि त्या संबधिची वास्तविकता.

गैरसमज – डायलिसिस करणार्‍या व्यक्तीने प्रवास करू नये

वस्तुस्थिती: डायलिसिसवर असलेली व्यक्ती लांबच्या प्रवासाला जाऊ शकत नाही, असाही समज लोकांमध्ये पसरला आहे, परंतु तसे नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही लांबचा प्रवासही करू शकता, तुम्ही जिथे जात आहात, तिथे डायलिसिसची सुविधा सहज उपलब्ध आहे याची खात्री करून घ्यावी.

हे सुद्धा वाचा

गैरसमज: ही एक वेदनादायक प्रक्रिया आहे

वस्तुस्थिती : लोकांना वाटते की डायलिसिस हा एक वेदनादायी उपचार आहे, तर आरोग्य तज्ञ म्हणतात की हा विश्वास पूर्णपणे चुकीचा आहे. सुई घातल्यावर थोडया वेदना होतात, पण डायलिसिस करताना वेदना होत नाहीत.

गैरसमज: डायलिसिसचे रुग्ण साधे अन्न खाऊ शकत नाहीत

वस्तुस्थिती: असेही मानले जाते की डायलिसिस रुग्ण सामान्य लोकांसारखे सामान्य अन्न खाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, परंतु असे रुग्ण साधे अन्नही खाऊ शकतात. फक्त ते खात असलेल्या अन्नपदार्थांमध्ये मीठ, पोटॅशियम आणि प्रथिनांचे प्रमाण कमी ठेवावे.

गैरसमज: डायलिसिसचे रुग्ण शारीरिक हालचाली करू शकत नाहीत

वस्तुस्थिती : असे मानले जाते की डायलिसिस रुग्ण शारीरिक हालचाली करू शकत नाही, परंतु, तसे नसून, स्वतः डॉक्टर त्यांना निरोगी राहण्यासाठी पायी चालणे आणि व्यायाम करण्याचा सल्ला देतात.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.