AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलांना ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ ठेवण्यासाठी सूर्यनमस्काराला पर्याय नाही, जाणून घ्या फायदे 

योगात सूर्यनमस्काराला अनन्यसाधारण महत्व आहे. मुलांनी नियमितपणे सूर्यनमस्कार केल्यास यातून उत्तम पध्दतीने मेंदूचा विकास होण्यास मदत होते. शिवाय मुलांमधील एकाग्रता वाढीस लागून विविध शारीरिक फायदेही मिळू शकतात.

मुलांना ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ ठेवण्यासाठी सूर्यनमस्काराला पर्याय नाही, जाणून घ्या फायदे 
सुर्य नमस्कार
| Updated on: Apr 12, 2022 | 12:46 PM
Share

योगसाधनेत फार पूर्वीपासून सूर्यनमस्काराला (Surya Namaskar) अत्यंत महत्व देण्यात आले आहे. असे म्हणतात, की सूर्यनमस्कार हा परिपूर्ण व्यायामाचा प्रकार आहे. सूर्यनमस्कारामुळे शरीराच्या सर्व अवयवांचा चांगला व्यायाम होतो. शरीर पिळदार होते. यासह सूर्यनमस्कारामुळे आपल्या मेंदूचा विकास (Brain development) होउन मानसिक आरोग्य उत्तम राहत असते. अबालवृध्दांपर्यंत सर्वच वयोगटातील लोक सूर्यनमस्कार करु शकतात. शारीरिक काही समस्या असणाऱ्यांनी मात्र हा व्यायाम करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्‍यक असते. दरम्यान, मुलांनी लहानपणापासून सूर्यनमस्कार करण्यास सुरुवात केल्यास याचा त्यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होत असतो. मुलांच्या मेंदूचा विकास होउन त्यांची एकाग्रता (Concentration) वाढीस लागत असते. या लेखातून सूर्यनसस्काराचे फायदे जाणून घेणार आहोत.

रक्तप्रवाह चांगला राहतो

अनेकदा मुलांमध्ये रक्तप्रवाह पाहिजे तसा सुरळीत नसल्याने मुल त्यांच्या वयाच्या तुलनेत चपळ नसतात. त्यांचा मानसिक विकास योग्य पध्दतीने होत नाही. गेल्या अडीच वर्षाच्या काळात मुलं घरातच असल्याने त्यांचे शारीरिक क्रियाकलाप कमी झाले होते. त्यामुळे अनेक मुलांच्या आरोग्यावर याचा नकारात्मक परिणाम दिसून आला. सूर्यनमस्कार केल्याने मुलांमधील रक्तप्रवाह चांगला राहतो. त्यामुळे मुलांमध्ये उत्साह टिकून राहत असतो. तज्ज्ञांच्या मते सूर्यनमस्कार केल्याने फुफ्फुसांमध्ये योग्य प्रमाणात हवा पोहचते. त्यामुळे ऑक्सीजन देखील पुरेसा मिळतो.

त्वचा आणि केसांना फायदा

सूर्यनमस्कार केल्याने मुलांच्या ब्लड सर्कुलेशनमध्ये सुधारणा होते. ब्लड सर्कुलेशन चांगले राहिल्यामुळे याचा फायदा शरीराच्या विविध अवयवांना होत असतो. त्याच बरोबर यातून मुलांच्या त्वचेचे व केसांचे आरोग्यदेखील सुधारत असते. तज्ज्ञांच्या मते, ब्लड सर्कुलेशन चांगले असेल तर, मुलांच्या त्वचेला चमक प्राप्त होते. त्याच प्रमाणे केस दाट व मजबूत होत असतात. त्यामुळे मुलांना सूर्य नमस्कार करण्याची सवय लावली पाहिजे.

तणावापासून मुक्ती मिळते

मुलांवर शाळा, शिकवणी, अभ्यास, विविध टास्क आदींचा मोठ्या प्रमाणात तणाव असतो. यातून मुलं चिडचिडे स्वभावाचे होतात. ही समस्या जास्त असल्यास मुलांमध्ये एकाकीपणा निर्माण होतो. ते कुणाशी मनमोकळे बोलत नाही. आपल्याच विचारात असतात. सूर्यनमस्कार केल्याने या समस्येपासून सुटका होते. सूर्यनमस्कार केल्याने मुलांच्या मनावरील ताण कमी होतो. त्यांना अभ्यासात उत्साह वाटत असतो. त्यामुळे मुलांमध्ये सूर्यनमस्काराची गोडी निर्माण करावी.

संबंधित बातम्या

तोंडाच्या समस्यांकडे दुर्लक्ष कराल तर वाढेल ‘या’ आजारांचा धोका…

तुम्हाला जर ‘या’ समस्या असतील तर, टोमॅटोपासून नेहमी अंतर ठेवून रहा

‘खोबरेल तेल’ आणि ‘कापूर’ यांच्या वापरातून करा, उन्हापासून केसांचे संरक्षण.. जाणून घ्या महत्वाच्या टिप्स !

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली