AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला जर ‘या’ समस्या असतील तर, टोमॅटोपासून नेहमी अंतर ठेवून रहा

जवळपास सर्वच पदार्थांमध्ये टोमॅटोचा वापर करण्यात येत असतो. तसेच टोमॅटो खाण्याचे अनेक फायदेदेखील आपल्याला आतापर्यंत सांगण्यात आलेले आहेत. परंतु आज या लेखातून कुठल्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या लोकांनी यापासून लांब रहावं, याची माहिती घेणार आहोत...

तुम्हाला जर ‘या’ समस्या असतील तर, टोमॅटोपासून नेहमी अंतर ठेवून रहा
टोमॅटो आरोग्यासाठी चांगले असते पण अतिसेवणामुळे त्याचे दुष्परिणामही होतात.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Apr 11, 2022 | 5:17 PM
Share

मुंबई : जेवणाची चव वाढवण्यासाठी टोमॅटोचा (Tomato) मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो. यासोबतच टोमॅटो खाण्याचे अनेक फायदेसुद्धा आपल्याला अनेकांकडून सांगण्यात आले आहेत. टोमॅटोचे सेवन अनेक पद्धतीने केले जात असते. मुख्यत्वे भाज्या, सॅलड आणि चटणीमध्येही टोमॅटोचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असतो. टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर (Fiber) असते. यामुळे पोटाच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होत असते. बद्धकोष्ठतेवरही टोमॅटो परिणामकारक ठरत असतो. त्यात ‘व्हिटॅमिन सी’ मोठ्या प्रमाणात असल्याने यातून आपली रोगप्रतिकारशक्तीदेखील (Immunity) वाढत असते. टोमॅटोमध्ये लाइकोपीन आणि पोटॅशिअमसारखे घटकदेखील मोठ्या प्रमाणात आढळतात. डॉक्टरांच्या मते, दिवसातून एक वेळा सॅलडमध्ये टोमॅटोचा नक्की वापर केला पाहिजे. परंतु इतके फायदे असूनही टोमॅटोचे काही लोकांना नुकसान देखील होऊ शकते. ते पुढील प्रमाणे :

मुतखडा

ज्या लोकांना किडनीत किंवा गॉल ब्लेडरमध्ये मुतखड्याची समस्या असेल त्यांनी टोमॅटोपासून लांब राहण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते, टोमॅटोमुळे मुतखड्याच्या समस्येत अधिक वाढ होऊ शकते. त्यामुळे ज्यांना आधीच मुतखड्याची समस्या आहे, अशा लोकांना टोमॅटोपासून लांब राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

सांधेदुखी

ज्या लोकांना सांधे दुखीची समस्या असेल, अशांनी टोमॅटोपासून लांब राहण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत असतो. टोमॅटोच्या सेवनामुळे अशा लोकांमध्ये सांधेदुखी व गाठी होण्याच्या समस्या अधिक वाढू शकतात. टोमॅटोच्या सेवनामुळे सांधेदुखी असलेल्या लोकांमध्ये युरिक ॲसिडच्या पातळीत वाढ होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे सांधेदुखीची समस्या असलेल्या लोकांनी आपल्या आहारात कमीत कमी टोमॅटोचा वापर केला पाहिजे.

डायरिया

टोमॅटोमुळे डायरिया झालेल्या लोकांच्या समस्येत अधिक भर पडू शकते. अशा वेळी डायरियाने ग्रस्त लोकांनी टोमॅटोचे सेवन टाळले पाहिजे. टोमॅटो आपल्या शरीराला हायड्रेट ठेवत असला तरी, डायरियाच्या प्रकरणामध्ये यातून शरीराला विविध अपाय होत असतात. टोमॅटोमधील साल्मोनेला नावाचा बॅक्टेरिया डायरियाच्या समस्येत अधिक वाढ करू शकतो. त्यामुळे डायरियाने ग्रस्त असलेल्या लोकांनी टोमॅटोच्या सेवनापासून लांब राहणेच योग्य असते.

संबंधित बातम्या :

Food : उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी काकडीच्या सूपचा आहारात समावेश करा, जाणून घ्या रेसिपी!

Health : आयुष्यातून या 3 गोष्टी कायमच्या आऊट करा आणि जीवन बघा कसे सुंदर होते!

Health : आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी फक्त या 4 टिप्स फाॅलो करा आणि रोगांना दूर ठेवा!

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत