AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बद्धकोष्ठता दूर करुन आतड्यांची सफाई करतील हे ४ जालीम उपाय, आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला काय ?

जर तुमचे पोट वारंवार खराब होत असले आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर घरातच असलेल्या पदार्थांचा वापर करुन त्यावर आराम कसा मिळवायचा आयुर्वेदात सांगितले आहे.

बद्धकोष्ठता दूर करुन आतड्यांची सफाई करतील हे ४ जालीम उपाय, आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला काय ?
Constipation
| Updated on: Sep 29, 2025 | 5:14 PM
Share

बदलेली लाईफस्टाईल आणि चुकीचा आहार यामुळे अनेकांची सकाळ वाईट जाते. पोट साफ झाल्यासारखे वाटत नाही. आणि दिवसभर आळस आल्या सारखे जडजड वाटत राहाते. तणाव, झोप पुरेशी न मिळणे आणि व्यायाम न केल्याने आतड्याच्या हालचाली कमी होतात. तसेच काही औषधांचा दुष्परिणामामुळे देखील बद्धकोष्ठतेचा ( Constipation ) त्रास होता. त्यामुळे पोटात गॅस, जडपणा, अपचन आणि शरीरात टॉक्सिक पदार्थ जमल्याने आपल्याला त्रास होत रहातो. यासाठी आयुर्वेदात उपाय आहे.

आयुर्वेदिक तज्ज्ञाच्या मते जर तुम्हाला बद्धकोष्ठता असेल तर केवळ चार उपायांनी त्यावर आराम मिळतो. या चार उपायांनी पतच चांगले होते आणि आरोग्य देखील चांगले रहाते. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते मणुक्याचे पाणी, त्रिफळा, तूप आणि स्निग्ध पदार्थांच्या आहारात समावेश केल्याने आतड्यांचे आरोग्य चांगले रहाण्यास मदत मिळते. बद्धकोष्ठता रोखण्यासाठी फायबर यु्क्त आहार, पुरेसे पाणी पिणे, हलका व्यायाम आणि नियमित दिनचर्या गरजेची आहे. चला तर हे चार उपाय काय ते पाहूयात…

गरम पाण्यात तूप आणि मिठी साखरेचा वापर

जर बद्धकोष्ठता दूर करायची आहे तर सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा तूप आणि एक चमचा खडी साखरचे सेवन करावे. गरम पाणी शरीराला हलके गरम ठेवतो आणि आतड्यांची हालचाल वाढवतो.तूप आतड्यांना वंगनाचे काम(Lubricate) करते. त्यामुळे मल सहजपणे बाहेर पडतो.पाणी आणि तूपाचे मिश्रण मलाला नरम बनवते आणि बद्धकोष्ठता कमी करते. खडी साखर हलका गोडपणा आणि थंडावा देते. ज्यामुळे पोटाला आराम मिळतो आणि पचन यंत्रणा संतुलित रहाते. रोज सकाळी रिकाम्या पोटी खडीसाखर आणि तूपाचे सेवन केल्याने पोट साफ रहाते आणि बद्धकोष्ठता दूर होते.

मणुक्याचे पाणी पिणे

रात्रीच्या वेळी एक ग्लास पाण्यात 15-20 काळे मणुके भिजत ठेवावे आणि सकाळी त्याचे पाणी प्यावे आणि मणुके चाऊन खावेत. मणुक्यात फायबर असते.जे आतड्यात पाणी साठवून ठेवते, त्यामुळे मल नरम होतो.हे पाणी प्यायल्याने मल सहजपणे बाहेर निघतो आणि बद्धकोष्ठता कमी होते. हे पाणी पोटाच्या स्नायूंना सक्रीय करते.आतड्यांची गती वाढवते. मणुक्यांना पाण्यात भिजवल्याने हे अतिरिक्त पाणी आतड्यात पोहचते, त्यामुळे मल सॉफ्ट रहाते. मणुका एक हलका नैसर्गिक उपाय आहे. ज्यामुळे कोणत्याही साईड इफेक्शशिवाय बद्धकोष्ठतेचा उपचार होतो. यास रोज सकाळी रिकाम्या पोटी घेतल्याने पोट नेहमी स्वच्छ रहाते.

ज्येष्ठमध आणि हरडा चूर्णाचे सेवन

बद्धकोष्ठतेने त्रस्त असाल तर जेवण्याच्या अर्धातास आधी अर्धा चमचा ज्येष्ठमधाचे चूर्ण आणि पाव चमचा हरडा चूर्ण यांचे सेवन करावे. ज्येष्ठमध आणि हरडा दोन्ही पचनाच्या एंजाईमना सक्रीय करतात. याने भोजन लवकर पचते आणि पोट हलके रहाते. हरड्याचे हलके फ्लेवोनॉयड आणि मुलेडीचे ल्युकोरिजिन मलास नरम करते आणि बद्धकोष्ठता दूर करते. हे मिश्रण आतड्यातील विषाक्त पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय रोज या दोन्ही हर्बचे सेवन केले जाऊ शकते.

जेवणात स्निग्ध पदार्थाचा वापर

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी जेवणा स्निग्ध पदार्थांचा वापर करावा , त्यामुळे जेवणाचे पचन सहज होते. तूप,तेल, दूध आणि अन्य स्निग्ध पदार्था पोट आणि आतड्यांना वंगन लावण्याचे काम करतात. त्यामुळे मल सहजपणे बाहेर पडतो आणि बद्धकोष्ठता दूर होते. तेल युक्त पदार्थांने आतड्याची गती सक्रीय होते. पोट हलके होते आणि पचन सुरळीत होते आणि आरोग्य चांगले होते. तुम्ही डाएटमध्ये तूप, नारळाचे तेल, तिळाचे तेल, दूध आणि शेंगदाण्याची पेस्टचे सेवन करु शकता.

Follow Us
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.