AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tips to reduce night cough : तुम्हालाही दिवसापेक्षा रात्री जास्त खोकला येतो का; ‘या’ टिप्समुळे मिळेल आराम!

जर तुम्हालाही रात्री खोकल्याचा त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय करून तुम्ही खोकल्याच्या समस्येवर मात करू शकता. जाणून घ्या, कफ घरगुती उपायांचा अवलंब करून रात्री खोकल्याची समस्या टाळण्यासाठी तुम्ही कोणत्या टिप्स फॉलो करू शकता.

Tips to reduce night cough : तुम्हालाही दिवसापेक्षा रात्री जास्त खोकला येतो का; ‘या’ टिप्समुळे मिळेल आराम!
सांकेतिक छायाचित्र
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Aug 26, 2022 | 9:41 PM
Share

मुंबई : हवामानाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. कडाक्याच्या थंडीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. थंडीच्या काळात बहुतेक लोकांना खोकला, सर्दी आणि घसादुखीचा त्रास होतो. हिवाळ्याच्या थंड वाऱ्यांमुळे या समस्या लवकर सुटत नाहीत. अशा स्थितीत घराबाहेर पडण्यात थोडासा निष्काळजीपणाही (Carelessness) तुम्हाला आणखी आजारी बनवू शकतो. काही लोकांना खोकला-सर्दी, घसा खवखवणे (Sore throat) अशा समस्या येतात आणि ते लवकर बरे होत नाही. कफ सोबतचा खोकला हिवाळ्यात जास्त होतो आणि योग्य उपचाराने तो लवकर बरा होतो. खोकल्यानंतर घश्यात वेदना, जळजळ होते. काही लोकांना दिवसापेक्षा रात्री जास्त खोकला (Excessive coughing) येतो. रात्री झोपताना खोकल्यामुळे फक्त तुमचीच नाही तर घरात, झोपलेल्यांचीही झोप खराब होते. अशा काही टिप्स किंवा घरगुती उपाय आहेत, ज्याचा अवलंब केल्याने रात्री येणाऱया खोकल्याला मोठ्या प्रमाणात आराम मिळू शकतो.

मध आणि आले

हे दोन्ही घटक केवळ खोकलाच नाही तर, शरीराच्या इतर समस्याही सहज दूर करू शकतात. जर तुम्हाला रात्री खोकल्याचा त्रास होत असेल तर आल्याचा रस काढून त्यात थोडे मध मिसळा. तयार केलेली पेस्ट खा आणि सरळ झोपा. यानंतर, चुकूनही पाणी पिऊ नका आणि सुमारे एक आठवडा हा उपाय करा. खोकल्यापासून आराम मिळाल्यावरही दोन ते तीन दिवस असे करा.

आले आणि गूळ

गूळ हा असा नैसर्गिक घटक आहे, जो आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. ही एक नैसर्गिक साखर आहे, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. गूळ आल्याबरोबर खाल्ल्यास होणारा खोकला काही दिवसात दूर होतो. एका भांड्यात थोडा गूळ गरम करून त्यात आल्याचा रस घाला. ही पेस्ट खाऊन झोपा. काही दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल.

काळी मिरी आणि मीठ

काहीवेळा खोकला काही चुकीच्या खाण्याने किंवा ऍलर्जीमुळे सुरू होतो, परंतु झोपेचा त्रास दुसऱ्या दिवशीचा दिनक्रम बिघडू शकतो. यापासून आराम मिळण्यासाठी एका भांड्यात ठेचलेली काळी मिरी घेऊन त्यात थोडे मीठ टाका. त्यात थोडे मध घालून सेवन करा. या तीन गोष्टी मिळून खोकल्यापासून लवकर सुटका मिळेल.

Follow Us
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!