AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शौचास जाण्याआधी पाणी पिणे का महत्वाचे? जाणून घ्या फायदे

मानवाची पचनसंस्था पूर्णपणे पाण्यावर अवलंबून असते. अन्नाचे विघटन करण्याच्या कामात पाणी मोलाची भूमिका बजावतो. पोषक तत्वे शोषण्यास आणि मल मऊ करण्यास पाण्यामुळे मदत मिळते. यामुळे तुम्ही शौचापूर्वी पाणी प्यायले तर ते अनेक प्रकारे फायदे मिळतात.

शौचास जाण्याआधी पाणी पिणे का महत्वाचे? जाणून घ्या फायदे
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 03, 2025 | 2:45 PM
Share

Benefits Of Drinking Water Before Pooping: पाणी आपल्या जीवनाचा आवश्यक भाग आहे. मानवी शरीराला पाण्याची मोठी गरज असते. पचनक्रिया चांगली होण्यात पाण्याची भूमिका महत्वाची असते. पाणी पचनतंत्र चांगले ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतो. बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर शौचास जाण्याआधी पाणी प्यावे. यामुळे मलप्रवाह बाहेर पडण्यात अडचण येत नाही आणि बद्धकोष्ठतेची समस्या जाणवत नाही. शौचास जाण्यापूर्वी पाणी घेतल्याने काय फायदे होतात? त्याचा विचार कधी केला का?

मानवाची पचनसंस्था पूर्णपणे पाण्यावर अवलंबून असते. अन्नाचे विघटन करण्याच्या कामात पाणी मोलाची भूमिका बजावतो. पोषक तत्वे शोषण्यास आणि मल मऊ करण्यास पाण्यामुळे मदत मिळते. यामुळे तुम्ही शौचापूर्वी पाणी प्यायले तर ते अनेक प्रकारे फायदे मिळतात.

  1. पाणी मल मऊ करते आणि बद्धकोष्ठता दूर करते. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर आतडे मलातून पाणी शोषून घेतात. त्यामुळे मल कडक होते. त्यामुळे शौचालयात अडचण निर्माण होते. सकाळी पाण्याच्या सेवनामुळे आतडे हायड्रेट असते. त्यामुळे मल नरम होऊन सहज बाहेर पडते.
  2. सकाळी गरम पाणी घेतल्याने आतडे सक्रीय होतात. पचनतंत्राला काम सुरु करण्याचे निर्देश त्यामुळे आतड्यांना मिळतात. ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, त्यांच्यासाठी हा फायदेशीर पर्याय आहे.
  3. शरीरातून विषारी पदार्थ बाहेर निघतात. कारण रात्रभरात अनेक विषारी घटक शरीरात तयार झालेले असतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर पाणी घेतल्याने शरीर डिटॉक्स (शरीरातील विषारी पदार्थ किंवा हानिकारक गोष्टी काढून टाकणे) होते. त्यामुळे तुम्हाला ताजेपणा वाटतो.
  4. पाण्याच्या सेवनामुळे चयापचय क्रिया लवकर होते. त्यामुळे पचनसंस्था सुधारते. पर्यायाने वजन कमी होण्यास मदत मिळते. शरीरातील चरबी कमी होते.
  5. अ‍ॅसिडीटीची समस्या असल्यावर पोट फुगलेले वाटते. पोटफुगी किंवा अ‍ॅसिडीटीचा त्रास होत असेल तर शौचास जाण्यापूर्वी पाणी पिणे फायदेशीर ठरते. त्यामुळे पोटातील आम्ल नियंत्रित राहते आणि पचनक्रिया सुधारते.

पाणी पिण्याची योग्य पद्धत

कोमट किंवा गरम पाणी पिणे आतड्यांसाठी चांगले असते. त्यामुळे आतडे सक्रीय असतात. पचनक्रिया चांगली होते. कोमट पाण्यात निंबू किंवा मधाचा वापर केल्यावर डिटॉक्सिफिकेशन वेगाने होते. नियमित पाणी सेवनाची सवय लावल्यावर तुम्हाला शरीरात सकारात्मक बदल दिसतील.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...