Corona Update | कोरोनाची तिसरी लाट दिवाळीत धडकण्याची भीती, कसे सावध रहाल?

आपण नवीन व्हेरिंटचा शोध किती वेळात घेतो आणि त्याला कसे रोखतो? यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. (Corona Third Wave likely to come in India)

Corona Update | कोरोनाची तिसरी लाट दिवाळीत धडकण्याची भीती, कसे सावध रहाल?
Corona Virus
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 12:01 PM

मुंबई : भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच तिसरी लाट येण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. पण ही लाट नेमकी कधी येणार, याचा प्रादुर्भाव किती काळ असेल, यातून कसे सरंक्षण करायचे याची अद्याप काहीही सांगता येत नाही. (When Corona Third Wave likely to come in India)

केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक विजय राघवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट कधीही येऊ शकते. पण जेव्हा ती येईल तेव्हा ती किती धोकादायक असेल, याबद्दल काहीही सांगता येणार नाही. कोरोनाचे रुपांतर सतत होत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेसाठी आपण तयार असायला हवे. कोरोनाची लस प्रभावी आहे. पण त्यात अजून कशी सुधारणा करता येईल, यावर संशोधन सुरु आहे.

कोरोनाची तिसरी लाट कधी येणार?

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक हेल्थ बंगळुरूचे एपिडेमिओलॉजिस्ट डॉ. गिरीधर बाबू यांच्यामते, थंडीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती सर्वाधिक असते. नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरूवातीला कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे त्यापूर्वी लवकरात लवकर लसीकरण करण्याची गरज आहे. तसेच पुढील काळात तरुण लोकांवर सर्वाधिक परिणाम होऊ शकतो.

कोरोनाची तिसरी लाट ही तीन महत्त्वाच्या घटकांवर अवलंबून आहे. यातील पहिला घटक म्हणजे लसीकरण, दुसऱ्या सुपर स्प्रेडर, तिसरा नवी व्हेरिंटचा शोध घेणे. म्हणजे सर्वात आधी येत्या डिसेंबरपर्यंत आपल्याला कोरोना लसीकरण करावे लागेल. त्यानंतर दुसरे म्हणजे आपण सुपर स्प्रेडर इव्हेंटला किती रोखू शकतो. तिसरे म्हणजे आपण नवीन व्हेरिंटचा शोध किती वेळात घेतो आणि त्याला कसे रोखतो? यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत.

तिसरी लाट आल्यानंतर काय होणार? 

गणिताचे मॉडेल तज्ज्ञ प्राध्यापक एम. विद्यासागर यांनी दिलेल्या माहितीनुसार ” कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अनेकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. यातील काहींना कोरोना सदृश लक्षणही जाणवत नाहीत. पण तरीही त्यांना लागण झाल्याचे उघड होत आहे. ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमजोर असते त्यांना सर्वप्रथम लस देणे गरजेचे आहे. पुढील सहा महिन्यात लसीकरणाचा कार्यक्रम तातडीने करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसरी लाटेचा प्रभाव कमी होईल.

चाचणी सुविधा वाढवावी लागेल

डॉ. बाबू यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक राज्यांनी कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, या शास्त्रज्ञांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी आपल्याला एक प्रभावी उपाययोजना करावी लागेल. त्यात सर्वात प्रथम लसीकरणाची योजना आखवी लागेल. दुसर्‍या लाटेतून बाहेर पडण्यासोबत आपल्याला कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्या लागतील. तसेच कोरोना रुग्ण आणि मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी आक्रमक रणनीती तयार करण्याची गरज आहे. आपल्याला चाचणी सुविधा वाढवावी लागेल. पायाभूत सुविधांकडे लक्ष द्यावे लागेल. त्या उभाराव्या लागतील.

कोरोनाची दुसर्‍या लाट ही 7 मे रोजी येऊ शकते असा अंदाज वर्तविला जात आहे. प्रोफेसर एम. विद्यासागर यांनी अलीकडेच 7 मे रोजी देशात दुसर्‍या लाटेचा कहर दिसू शकतो. त्यानंतर काही काळाने दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होईल. तसेच विविध राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव हा विविध वेळी होऊ शकतो.  (When Corona Third Wave likely to come in India)

संबंधित बातम्या : 

Corona Cases India | देशात कोरोनाचा पुन्हा विस्फोट, चार लाखांहून अधिक नवे रुग्ण, एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबळी

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.