AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sweet Craving Control: तुम्हाला सुद्धा जेवल्यानंतर गोड खाण्याची सवय आहे का? नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो….

Sweet Cravings: गोड खाण्याची सवय कमी करणे कठीण वाटू शकते, पण ते अशक्य नाही. जर तुम्ही निरोगी आहाराचे पालन केले, पाणी प्यायले, चांगली झोप घेतली आणि स्वतःला व्यस्त ठेवले तर गोड खाण्याची इच्छा हळूहळू कमी होईल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गोड खाणे पूर्णपणे थांबवण्याऐवजी, गोड खाण्याऐवजी निरोगी पर्याय निवडा, जेणेकरून तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकाल आणि गोड पदार्थांचा आनंदही घेऊ शकाल.

Sweet Craving Control: तुम्हाला सुद्धा जेवल्यानंतर गोड खाण्याची सवय आहे का? नियंत्रित ठेवण्यासाठी 'या' सोप्या टिप्स करा फॉलो....
| Edited By: | Updated on: Feb 28, 2025 | 9:41 PM
Share

जेवल्यानंतर अनेकांना काहीतरी गोड खावेसे वाटते. असं वाटणे योगायोग नाही तर तुमच्या शरीराच्या आणि मनाच्या एका विशिष्ट गरजेचा आणि सवयीचा एक भाग मानला जातो. पंरतु आजकालच्या जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये अनेकजण त्यांच्या आरोग्याला घेऊन जागरूक झाले आहेत आणि त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देऊ लागले आहेत. जर तुम्हाला पण जेवणानंतर गोड खाण्यास आवडते पंरतु या गोष्टीवर नियंत्रण कसं मिळवायचा असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही काभी विशेष गोष्टी करणे फायदेशीर ठरते.

जंक फूडच्या अतिसेवनामुळे तुम्हाला लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या समस्या उद्भवतात. आजकाल अगदी लहान वयामध्ये देखील शरीराला योग्य पोषण नाही मिळाल्यामुळे मधुमेहाच्या समस्या होऊ शकतात. दररोज जेवणानंतर गोड खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. जास्त प्रमाणात गोड खाल्ल्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि मधुमेहाचा धोका वाढतो. चला जाणून घेऊया गोड खाणं नियंत्रित ठेवण्यासाठी नेमंक काय करावे?

अनेकदा तुमच्या शरीराला त्वरित उर्जा हवी असते. त्याचे मुख्य कारण म्हणजे पचनक्रिया मजबूत असणे. तुमची पचनक्रिया मजबूत असेल तर तुमच्या शरीरातील साखर आणि अन्न पचण्यास मदत होते. जेवणामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वं असतात ज्याचा उपयोग आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी केला जातो. परंतु जास्त प्रमाणात गोड खाल्ल्यामुळे तुमचं शरीर पोषण शोषून घेत नाही ज्यामुळे तुमच्या शरीराला कमी प्रमाणात उर्जा मिळते. जेव्हा तुम्ही जेवणानंतर नियमित प्रमाणात गोड पदार्थांचे सेवन करता तेव्हा तुमच्या शरीराला योग्य प्रमाणामध्ये उर्जा मिळते. परंतु जास्त प्रमाणात गोड खाल्ल्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. जर तुम्हाला थोडेसे गोड पदार्थ खाल्ल्यानंतर ऊर्जावान आणि समाधानी वाटत असेल तर तुम्ही त्याबद्दल जास्त काळजी करू नये. तुम्हाला फक्त डार्क चॉकलेट, ब्लिस बॉल्स किंवा अक्रोड किंवा तिळाच्या चिक्कीसारख्या आरोग्यदायी मिठाईंचा वापर करायचा आहे.

जर तुम्हाला गोड पदार्थांची खूप इच्छा वाटत असेल आणि तुम्हाला हे का होत आहे हे जाणून घ्यायचे असेल, तर काही प्रश्न आहेत जे प्रत्येकाने स्वतःला विचारले पाहिजेत. बऱ्याच वेळा जेव्हा आपण तणावात असतो किंवा खूप थकलेला असतो तेव्हा आपला मेंदू गोड खाण्याची मागणी करतो. गोड पदार्थ खाल्ल्याने शरीरात सेरोटोनिन नावाचे रसायन वाढते, ज्यामुळे मूड सुधारतो आणि आपल्याला आराम मिळतो. जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा होणे पूर्णपणे नैसर्गिक आहे. तथापि, जर ही सवय खूप वाढली तर ती निरोगी पद्धतीने नियंत्रित करणे फायदेशीर ठरू शकते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला जेवणानंतर प्रत्येक वेळी गोड खाण्याची सवय लागली असेल आणि तुम्हाला ते नियंत्रित करायचे असेल, तर तुम्ही या पद्धती वापरून पाहू शकता.

आरोग्यदायी पर्याय निवडा

बऱ्याचदा शरीर डिहायड्रेटेड असते, पण आपल्याला काहीतरी गोड खाण्याची गरज वाटते. जर तुम्हाला अचानक साखरेची तलफ झाली तर प्रथम एक किंवा दोन ग्लास पाणी प्या. यामुळे भूक आणि गोड खाण्याची इच्छा दोन्ही कमी होऊ शकते. जर तुम्हाला खरोखर गोड खाण्याची इच्छा असेल तर साखरेऐवजी आरोग्यदायी पर्याय निवडा. ताजी फळे, खजूर, मनुका किंवा गूळ यासारखे नैसर्गिक पर्याय साखरेची इच्छा पूर्ण करू शकतात आणि तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवत नाहीत. बऱ्याचदा, आपल्याला गोड पदार्थांची इच्छा कंटाळवाणेपणा, ताणतणाव किंवा सवयीमुळे असते, प्रत्यक्ष भूकेमुळे नाही. जर तुम्हाला विनाकारण गोड खाण्याची इच्छा होत असेल तर स्वतःला काही कामात गुंतवून घ्या. फिरायला जा, पुस्तक वाचा, संगीत ऐका किंवा एखादा छंद जोपासा जो तुमचे लक्ष गोड पदार्थांपासून विचलित करेल.

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.