AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hot Water Bath Advantages : गरम पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे-तोटे काय?

Hot Water Bath Advantages : हिवाळा सुरु झालाय. गरम पाण्याने आंघोळ करण्याचे काही फायदे-तोटे असतात. हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळीचे काय फायदे-काय तोटे आहेत, समजून घ्या.

Hot Water Bath Advantages : गरम पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे-तोटे काय?
hot water bathImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 10, 2024 | 5:22 PM
Share

हिवाळा सुरू झाला की थंडी वाजायला सुरुवात होते. सकाळी सकाळी झोपेतून उठणंही कठीण होतं. त्यामुळे थंड पाण्याने अंघोळ करणं तर दूरच राहिलं. पहाटे पहाटे टाकीतील पाणीही थंड असते. त्यामुळे गरम पाण्याने अंघोळ करण्यावर प्रत्येकाचा ओढा असतो. हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करण्याचे अनेक फायदे आहेत. ते तुम्ही जाणून घेतले पाहिजे. गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्याचे जसे फायदे आहेत, तसे दुष्परिणामही आहेत. त्याचीच माहिती आपण जाणून घेणार आहोत.

गरम पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे

मानसिक शांती 

हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला आणि मनाला आराम मिळतो. मानसिक ताण कमी होतो आणि शांती मिळते. गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे शरीराला आराम मिळतो आणि मानसिक ताण कमी होतो.

शारीरिक दुखण्यामध्ये आराम 

पाठीच्या किंवा पायांच्या स्नायूंमध्ये वेदना किंवा सूज असल्यास, गरम पाण्याने अंघोळ करणे हा त्यावर उत्तम उपाय आहे. यामुळे स्नायू सैल होतात आणि सूज कमी होते. गरम पाण्यामुळे त्वचा साफ होते आणि त्वचेला आराम मिळतो.

त्वचेची मऊपणा 

गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेतील छिद्रे खुली होतात, ज्यामुळे त्वचेतील घाण आणि प्रदूषण बाहेर पडते. यामुळे त्वचा मऊ आणि ताजीतवानी दिसते.

गरम पाण्याने अंघोळ करण्याचे दुष्परिणाम:

त्वचेला इजा होणे 

जास्त कडक पाण्याने रोज अंघोळ केल्यामुळे त्वचेचा मऊपणा कमी होऊ शकतो आणि त्वचा कोरडी पडू शकते. त्यामुळे त्वचेला खरचटणे, चट्टा पडणे आणि इतर समस्या होऊ शकतात.

सोरायसीस आणि इतर समस्या 

कडक पाण्यने अंघोळ केल्याने संवेदनशील त्वचेला इरिटेशन होऊ शकते. जर त्वचा संवेदनशील असेल तर कडक पाण्यामुळे त्वचेवर लालसरपणा, चट्टे किंवा दाह होऊ शकतो. जर ही समस्या वाढली, तर सोरायसीस किंवा इझिमा सारख्या त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

पाण्याचे तापमान 

हिवाळ्यात कडक पाण्याने अंघोळ करताना पाणी खूप गरम न करता, साधारण तापमानावर ठेवणे आवश्यक आहे. गरम पाणी त्वचेला इरिटेशन देऊ शकते, तसेच जास्त कडक पाणी शरीरावर नकारात्मक परिणाम करू शकते.

गरम पाण्याने अंघोळ करायच्या टिप्स

पाण्याचे तापमान खूप गरम किंवा खूप थंड नसावे. पाणी हलके कोमट असावे जेणेकरून ते शरीरासाठी आरामदायक असेल.

अंघोळ केल्यानंतर त्वचेवर चांगला मॉइश्चरायझर लावावा, ज्यामुळे त्वचा मऊ आणि हायड्रेटेड राहील.

वॉटर हीटर वापरत असताना खूप काळजी घ्या, विशेषतः स्विच आणि प्लग यांचा वापर केल्यावर पाणी तपासून पाहा, कारण हे इलेक्ट्रीकल शॉक्सचा धोका निर्माण करू शकतात.

हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे आहेत, परंतु त्याची योग्य पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळे आपल्या त्वचेच्या आरोग्यास हानी होणार नाही.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.