AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युट्युबर म्हणाला दिवसाचे १६ चमचे तूप खातो, डायटीशियनने सांगितले फायदे आणि तोटे

डिजिटल क्रिएटर प्रशांत देसाई यांनी आपल्या इंस्टाग्रामवरील रिल्समध्ये आपण शुगर स्पाईक आणि मेटाबोलीकली फ्लेक्झीबल रहाण्यासाठी दिवसाचे सोळा चमचे तूप खात असल्याचे म्हटल्याने विविध चर्चा तोंड फूटले आहे. यावर आता डायटीशियनने उत्तर दिले आहे.

युट्युबर म्हणाला दिवसाचे १६ चमचे तूप खातो, डायटीशियनने सांगितले फायदे आणि तोटे
| Updated on: Jan 29, 2025 | 5:53 PM
Share

आपले आई- आजोबा तुपाने काही आजार वगैरे होत नाहीत असे सांगत असतात. त्यामुळे जुनी पिढी अजूनही वारेमाप तूपाचे सेवन करीत असते. पराठा, चपाती, गरम भातावर तुपाची धार टाकून आवडीने  तूपाचे सेवन केले जात असे. परंतू आता हेल्थ एक्सपर्टने अशा प्रकारे तुपाचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरविले आहे. एका डिजिटल क्रिएटरने आपली फॅट कमी होण्यासाठी आपण दररोज सोळा चमचे तूपाचे सेवन करीत असल्याचे इन्स्टाग्राम पोस्टवर म्हटले आहे. अशा प्रकारे तूपाचे सेवन करणे चांगले की वाईट? त्यांचे फायदे किती आणि तोटे कोणते ? याची माहिती डायटिशियनने दिली आहे.

या संदर्भात डिजिटल क्रिएटर आणि हेल्थ एक्सपोर्ट प्रशांत देसाई यांनी आपल्या इंस्टाग्राम वरील रिल्समध्येत चरबीचे ज्वलन होण्यासाठी आणि शुगरवर नियंत्रण मिळविण्यासाठी दररोज १६ चमचे तूप सेवन करीत असल्याचे म्हटले आहे. यावर न्युट्रीशन्स्टी Hetal Chheda यांनी सांगितले आहे की,” ते जर दररोज १६ चमचे तूप खात असतील तर जाणतेपणी किंवा अजाणतेपणी किटो रुटीन पाळत असतील. आणि या दिवसांत हे तूप इंधन म्हणून शरीरात काम करीत असेल.” दिवसांचे सोळा चमचे तूप सेवन करणे शरीरासाठी योग्य आहे की अयोग्य याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. त्याम्हणाल्या की घी आपल्या शरीरासाठी पोषक असले तरी १६ चमचे घी खाणे हे खूपच जास्त प्रमाण आहे. यातील कॅलरी आणि फॅटचा आपण घी किंवा तूप सेवन करताना नक्कीच विचार केला पाहीजे. तूपात सर्वाधिक चरबी असते. त्याचे सेवन जास्त करणे योग्य नाही.त्यामुळे हृदय विकाराला आमंत्रण मिळू शकते.

तरीही तूप केटो फ्रेंडली फूड आहेत. कारण यातील हाय फॅट कन्टेन्ट आणि लो कार्बोहायर्डेट कन्टेन्टमुळे ते केटो फ्रेंडली फूड आहे. तरी दिवसाचे १६ चमचे तूपाचे सेवन करणे धोकादायक आहे.या जादा प्रमाणामुळे कॅलरीज आणि सॅच्युरेटेड फॅटचे अतिप्रमाण शरीरात जाऊ शकते, ज्यामुळे केटोजेनिक आहाराचे फायदे कमी होऊ शकतात,” असेही त्यांनी म्हटले आहे.

पोषकत्वाचे भांडार

तूपाचा तुम्ही योग्य प्रमाणात रोजच्या आहारात वापर करू शकता. यात विटामिन्स ए, डी,ई आणि के या पोषकत्वाचे भरपूर असते. यातील फॅटी एसिडमुळे डोळ्यांच्या आरोग्यासह हाडांची मजबूती इतर फायदे होतात. यातील एण्टी इन्फ्लेमेंटरी प्रॉपर्टीमुळे ते दुर्धर हृदय विकार आणि संधीवाताचे आजाराचे प्रमाण कमी करू शकते. आयुर्वेदानुसार तूपाचा वापर आहार केल्याने तुमच्या शरीरातील पचन संस्था चांगली काम करते. तसेच पचनाचा मार्ग चांगला होऊन तुमच्या शरीरात पोषक तत्वे शोषली जातात.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.