AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-America : भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप, फुकटचे सल्ले देणं अमेरिकेने थांबवलं, हे आहे ताजं उद्हारण

India-America : अमेरिकेकडून आधी भारताला सल्ले दिले जायचे. भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप केला जायचा. पण अमेरिकेने आता या गोष्टी थांबवल्याच दिसतय. नुकताच एका पत्रकार परिषदेत हा अनुभव आला. भारतात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे.

India-America : भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप, फुकटचे सल्ले देणं अमेरिकेने थांबवलं, हे आहे ताजं उद्हारण
Modi-Biden
| Updated on: Apr 18, 2024 | 10:55 AM
Share

पाकिस्तानात सध्या भारत विरोधी दहशतवाद्यांना वेचून-वेचून संपवलं जातय. त्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडेच वक्तव्य केलं होतं. त्यावर अमेरिकेने थेट प्रतिक्रिया देण टाळलं आहे. भारत-पाकिस्तानला आम्ही तणाव टाळण्यासाठी प्रोत्साहन देऊ तसेच चर्चेच्या माध्यमातून त्यांनी तोडगा काढवा एवढच अमेरिकेने म्हटलं आहे. याआधी अशा विषयात अमेरिकेकडून भारताला सल्ले दिले जायचे. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये एकप्रकारचा तो हस्तक्षेप ठरायचा. “आम्ही या मध्ये पडणार नाही. पण भारत-पाकिस्तानला तणाव टाळण्यासाठी प्रोत्साहन देऊ. त्यांनी चर्चेच्या माध्यमातून प्रश्न मिटवावा” एवढच अमेरिकेने म्हटलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर हे पत्रकार परिषदेत म्हणाले.

पाकिस्तानात सध्या ज्या दहशतवाद्यांना मारलं जातय, त्यात भारताचा हात आहे, असा आरोप पाकिस्तानकडून केला जातोय. पंतप्रधान मोदी आणि राजनाथ सिंह यांचं वक्तव्य म्हणजे कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या करण्यात आली, त्याची कबुली आहे का? या प्रश्नावर मिलर म्हणाले की, ‘अमेरिका यामध्ये पडणार नाही’. भारताविरोधात निर्बंधाचा तुम्ही का विचार करत नाही? यावर मिलर म्हणाले की, “तुम्ही निर्बंधांबद्दल मला विचारता, पण हा असा विषय आहे, ज्यावर मोकळेपणाने बोललं जाऊ शकत नाही”

‘आम्ही तिथे जाऊन त्याला संपवू’

11 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “भाजपा सरकारच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात दहशतवाद्यांना त्यांच्या घरात मारलं जातय” या महिन्याच्या सुरुवातीला राजनाथ सिंह सुद्धा म्हणाले होते की, “दहशतवाद्यांनी भारतातील शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला किंवा दहशतवादी कारवाया केल्या, तर त्यांना तसच प्रत्युत्तर दिलं जाईल. कोणी पाकिस्तानात पळून गेला, तर आम्ही तिथे जाऊन त्याला संपवू” भारतीय गुप्तचर यंत्रणा पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हत्या घडवत आहेत, असा दावा ‘द गार्डियन’ या ब्रिटिश वर्तमानपत्राने केला होता. त्यावर भाष्य करताना राजनाथ सिंह यांनी वरील वक्तव्य केलं होतं.

Follow Us
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.