AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेख हसीना यांना अटक करुन…; बांगलादेशमधून भारताकडे मोठी मागणी

बांगलादेशमध्ये हिंसक आदोलन सुरु झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडल्यानंतर ही लोकांचा राग कमी होताना दिसत नाहीये. बांगलादेशमध्ये अजूनही हिंसा सुरुच आहे, बांग्लादेश सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी भारताकडे मोठी मागणी केली आहे.

शेख हसीना यांना अटक करुन...; बांगलादेशमधून भारताकडे मोठी मागणी
shailesh musale
shailesh musale | Updated on: Aug 07, 2024 | 5:37 PM
Share

बांगलादेशमधील परिस्थितीने संपूर्ण जग चिंतेत आहे. हिंसक आंदोलनामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील हिंसक आंदोलन पाहता शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत घरातून पळ काढला. कारण आंदोलकांनी त्यांच्या घरावर देखील ताबा मिळवला होता. काही मिनिटात त्यांनी देश सोडला. त्या सध्या भारतात असून भारतीय वायु दलाच्या विमानतळावर सुरक्षित आहेत. शेख हसीना यांना आपल्या बहिणीसोबत लंडन जायचे होते. पण आपल्याकडे आश्रय देण्यासाठी कोणताही कायदा नसल्याचं सांगून यूकेने हात वर केले. दुसरीकडे अमेरिकेने त्यांचा व्हिसा रद्द केल्याने तिथे जाण्याचा मार्ग ही बंद झाला. त्यामुळे इतर देशातून परवानगी येत नाही. तोपर्यंत त्यांना भारतातच राहावे लागणार आहे.

दुसरीकडे बांगलादेश सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष एम मेहबूब उद्दीन यांनी भारताकडे माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांची बहीण शेख रेहाना यांना अटक करून ढाका येथे परत पाठवण्याची मागणी केली आहे. बांगलादेशमधील वृत्तपत्र ‘डेली स्टार’ने दिलेल्या वृत्तानुसार एएम मेहबूब उद्दी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्हाला भारतातील लोकांशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. कृपया देशातून पळून गेलेल्या शेख हसीना आणि शेख रेहाना यांना अटक करा आणि त्यांना बांगलादेशला परत पाठवा. शेख हसीना यांनी बांगलादेशात अनेकांची हत्या केली आहे. असा आरोप त्यांनी केला आहे.

बांगलादेशातील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, एअर इंडियाच्या विशेष विमानाने बुधवारी सकाळी ढाका येथून 6 लहान मुलांसह 205 लोकांना नवी दिल्लीत परत आणले आहे. मंगळवारी रात्री उशिरा विमानाने बांगलादेशच्या राजधानीसाठी उड्डाण केले. या विमानातून 205 जण भारतात परतले आहेत.

भारत-बांगलादेश सीमेवर सुरक्षा दलांनी अलर्ट जारी केला आहे. सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महासंचालक दलजीत सिंग चौधरी यांनी बुधवारी त्रिपुरा-बांगलादेश सीमेवरील ऑपरेशनल तयारीचा आढावा घेतला. बीएसएफचे महासंचालक दलजीत सिंग बांगलादेश सीमेवरील एकूण सुरक्षा परिस्थितीवर राज्याचे पोलीस महासंचालक अमिताभ रंजन आणि महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) सौमित्र धर यांच्यासोबत बैठक घेणार आहेत.

बांगलादेशच्या नेत्यांनी सांगितले की, नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या सदस्यांच्या नावांवर आज निर्णय घेतला जाईल अशी आशा आहे. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर लष्कराने सर्व सूत्र हाती घेतले आहेत. त्यानंतर देशात अंतरिम सरकार बनवणार असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे.

Follow Us
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......