भारताला मोठा दणका! थेट गुजरातकडे येणाऱ्या जहाजावर हल्ला, इंधन रूमलाच..
इराण आणि अमेरिका युद्ध पुन्हा पेटले आहे. अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर हल्ला केला. तणाव अधिक वाढला आहे. त्यामध्येच आता थेट एका भारतीय जहाजावर होर्मुज खाडीत मोठा हल्ला करण्यात आला. ज्याने मोठी खळबळ उडाली.

इराण आणि अमेरिका युद्ध पुन्हा एकदा भडकताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून शांत असलेली होर्मुज खाडी पुन्हा पेटली. इराणने केलेल्या जहाजांवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने पुन्हा इराणवर हल्ला चढवला. इराण आणि अमेरिका यांच्या वादात भारताला मोठा दणका बसला आहे. होर्मुज खाडीतून भारताच्या दिशेने येणाऱ्या जहाजावर हल्ला करण्यात आला. जहाजावर ड्रोन हल्ला करण्यात आला. ज्या जहाजावर हल्ला झाला, त्यात एलपीजी गॅस होता. एएनआयच्या रिपोर्टनुसार, एलएनजीसी अल रेकंय्यात नावाचे मोठे जहाज कतारच्या लफ्फान बंदराहून गुजरातच्या दिशेने निघाले होते. यादरम्यानच त्याच्यावर हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर जहाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मिसाईल हल्ल्यानंतर लगेचच जहाजाच्या इंधन रूमला आग लागली. ज्यानंतर त्याच्यातून धूर निघत होता.
ज्यावेळी या जहाजावर हल्ला करण्यात आला, त्यावेळी या जहाजात तब्बल 29 लोक होते. त्यापैकी 4 जण भारतीय नागरिक आहेत. या मिसाईल हल्ल्यानंतरही जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती मिळतंय. भारतासोबतच असूनही एका देशाच्या जहाजावर हल्ला झाल्याची माहिती मिळतंय. ब्रिटिश सुरक्षा एजन्सीच्या म्हणण्यांनुसार, हा हल्ला ओमानच्या समुद्रकिनाऱ्याचा जवळ झाला.
होर्मुज खाडी सोडून जहाज ओमानच्या खाडीत प्रवेश करत होते, त्यावेळीच हा हल्ला झाला. ज्यामुळे आता भारतासोबतच जगाची चिंता वाढली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध शांत झाल्यानंतर जगाने सुटकेचा निश्वास घेतला. मात्र, आता पुन्हा एकदा स्थिती गंभीर होत आहे. भारताकडे येणाऱ्या जहाजवर हल्ला झाल्यानंतर भारत अलर्ट मोडवर आहे. या हल्ल्याबद्दल केंद्र सरकार नक्की काय भूमिका घेते हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.
इराणच्या लष्करी तळावरही अमेरिकेने हल्ला केला. आता कुठे हे युद्ध शांत झाले होते, त्यानंतर आता पुन्हा पेटताना दिसत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी व्हावा, ही जगाची मागणी आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव वाढताच पुन्हा एकदा जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होताना दिसली.