AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतानं मुसक्या आवळताच पाकिस्तानचा थयथयाट; घेतला मोठा निर्णय

मोठी बातमी समोर येत आहे, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत, त्यानंतर आता पाकिस्ताननं देखील मोठा निर्णय घेतला आहे.

भारतानं मुसक्या आवळताच पाकिस्तानचा थयथयाट; घेतला मोठा निर्णय
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 24, 2025 | 4:56 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत, त्यानंतर आता पाकिस्ताननं देखील मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घातली आहे. तसेच पाकिस्तानच्या बाजुची वाघा बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे.

मंगळवारी जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये 26 लोकांना आपला जीव गमावावा लागाला. यामध्ये दोन विदेशी नागरिकांचा देखील समावेश होता. तर या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले. दरम्यान या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. बुधवारी परराष्ट्र मंत्रालयाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत, या निर्णयामुळे पाकिस्तानचा चांगलाच थयथयाट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

भारत सरकारनं पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसावर बंदी घातली आहे, तसेच पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांमध्ये भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच सिंधु पाणी वाटप कराराला देखील स्थगिती देण्यात आली आहे. अटारी बॉर्डर देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा मोठा फटका हा पाकिस्तानला बसणार आहे.

भारत सरकारच्या या निर्णयानंतर आता पाकिस्तानच्या सुरक्षा समितीची बैठक पार पडली आहे, या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे, पाकिस्तानकडून भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घालण्यात आली आहे, तसेच पाकिस्तानच्या बाजुची वाघा बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे.

मंगळवारी पहलगाममध्ये पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी नाव विचारून पर्यटकांवर गोळीबार केला, या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झाला आहे, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानने देखील भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घातली आहे. या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे, सुरक्षादलाकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू असून, या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधील दीड हजार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. घटनेचा निषेध करण्यासाठी काल जम्मू -काश्मीरमध्ये बंद पाळण्यात आला.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.