AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतानं मुसक्या आवळताच पाकिस्तानचा थयथयाट; घेतला मोठा निर्णय

मोठी बातमी समोर येत आहे, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत, त्यानंतर आता पाकिस्ताननं देखील मोठा निर्णय घेतला आहे.

भारतानं मुसक्या आवळताच पाकिस्तानचा थयथयाट; घेतला मोठा निर्णय
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 24, 2025 | 4:56 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत, त्यानंतर आता पाकिस्ताननं देखील मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घातली आहे. तसेच पाकिस्तानच्या बाजुची वाघा बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे.

मंगळवारी जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये 26 लोकांना आपला जीव गमावावा लागाला. यामध्ये दोन विदेशी नागरिकांचा देखील समावेश होता. तर या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले. दरम्यान या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. बुधवारी परराष्ट्र मंत्रालयाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत, या निर्णयामुळे पाकिस्तानचा चांगलाच थयथयाट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

भारत सरकारनं पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसावर बंदी घातली आहे, तसेच पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांमध्ये भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच सिंधु पाणी वाटप कराराला देखील स्थगिती देण्यात आली आहे. अटारी बॉर्डर देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा मोठा फटका हा पाकिस्तानला बसणार आहे.

भारत सरकारच्या या निर्णयानंतर आता पाकिस्तानच्या सुरक्षा समितीची बैठक पार पडली आहे, या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे, पाकिस्तानकडून भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घालण्यात आली आहे, तसेच पाकिस्तानच्या बाजुची वाघा बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे.

मंगळवारी पहलगाममध्ये पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी नाव विचारून पर्यटकांवर गोळीबार केला, या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झाला आहे, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानने देखील भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घातली आहे. या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे, सुरक्षादलाकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू असून, या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधील दीड हजार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. घटनेचा निषेध करण्यासाठी काल जम्मू -काश्मीरमध्ये बंद पाळण्यात आला.

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.