AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Canda Khalistan : हा हरदीप सिंग निज्जर आहे तरी कोण? त्याच्या हत्येवरुन का तापले वातावरण

Canda Khalistan : खलिस्तानी चळवळीवरुन भारत-कॅनडामध्ये तेढ आहे. त्यात कॅनडामधील दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येवरुन वातावरण आणखी तापले आहे, काय आहे हे प्रकरण

Canda Khalistan : हा हरदीप सिंग निज्जर आहे तरी कोण? त्याच्या हत्येवरुन का तापले वातावरण
| Updated on: Sep 19, 2023 | 10:36 AM
Share

नवी दिल्ली | 19 सप्टेंबर 2023 : खलिस्तानी चळवळीसाठी (Khalistan Movement) कॅनडा स्वर्ग ठरला आहे. त्यावरुन भारताने यापूर्वी कॅनडाचे कान टोचले होते. खलिस्तान दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची हत्या नुकतीच झाली. त्याच्या हत्येवरुन दोन्ही देशांमध्ये वाद पेटला आहे. ही हत्या भारताने घडवून आणल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (PM Justin Trudeau) यांनी केला आहे. निज्जर अनेक दिवसांपासून कॅनेडात आश्रयाला होता. ब्रिटिश कोलंबियात त्याची हत्या झाली होती. सुरक्षा एजन्सीज या हत्येमागे एखाद्या बाहेरील शक्तीचा हात होता का, याची पुष्टी करत आहे, कॅनडाच्या धरतीवर असा हल्ला सहन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाने या वृत्ताचे खंडन केले आहे.

कोण आहे निज्जर

खलिस्तानी टायगर फोर्स-KTF या दहशतवादी संघटनेचा हरदीप सिंग निज्जर प्रमुख होता. तो मुळचा पंजाबमधील आहे. जालंधरजवळील भारसिंघपूर या गावचा तो रहिवाशी आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दोन वर्षांपूर्वी त्याच्यावर खलिस्तानी चळवळीला मदत करत असल्याबद्दल आणि फुटीरतावादी कार्यात सहभागाबद्दल त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्याने 2021 मध्ये एका हिंदू पुजाऱ्यावर हल्ला केला होता. त्याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षिस होते. बंदी घातलेल्या शिख्स फॉर जस्टिस या संघटनेतही तो सक्रिय होता. शिख तरुणांची माथी भडकवण्यासाठी तो काम करत होता. केंद्रीय गृहमंत्रालयाने 2019 मध्ये या संघटनेवर बंदी घातली आहे. कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया भागात राहत असल्याची पुष्टी झाली होती. जूनमध्ये त्याची हत्या करण्यात आली होती.

परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळले आरोप

दहशतवादी हरदीप निज्जर याच्या हत्येमागे भारत असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी केला. त्यावरुन दोन्ही देशात संबंध ताणल्या गेले आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने या आरोपांचे खंडण केले. कॅनडात खलिस्तानी दहशतवाद्यांचे स्तोम माजले आहे. त्यावरुन लक्ष विचलीत करण्यासाठी हा प्रयत्न होत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

काही भागात शिख समुदायाचे प्राबल्य

कॅनडामध्ये नोकरी, व्यवसायानिमित्त लाखो शिख स्थायिक झाले आहेत. 8,00,0000 लाख शिख या देशात गुण्यागोविंदाने राहतात. टोरंटो आणि आजूबाजूच्या परिसरात त्यांचे प्राबल्य आहे. पण त्यातील काहींनी खलिस्तान चळवळीचा झेंडा हाती घेतला आहे. कॅनडातून भारतीय भूमीवर दहशतवादी कारवायात त्यांचा सहभाग उघड झाला आहे. या चळवळीला तिथल्या सत्ताधाऱ्यांचे पण समर्थन असल्याचे समोर आल्यानंतर भारताने कॅनडावर तिखट प्रतिक्रिया दिली होती.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.