AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाबहार बंदराबाबत भारताचा धक्कादायक निर्णय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ, थेट एकही…

अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात आहेत. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला करू शकते. मात्र, यादरम्यान भारताने अत्यंत मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे.

चाबहार बंदराबाबत भारताचा धक्कादायक निर्णय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ, थेट एकही...
Chabahar Port
| Updated on: Feb 04, 2026 | 11:27 AM
Share

भारत आणि अमेरिकेत कायमच चांगले संबंध राहिले. मात्र, अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावल्यानंतर संबंध तणावात आली. नुकताच अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींना प्रचंड वेग आला. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या झळा जगाला बसत असतानाच अमेरिका आणि इराणमधीलही तणाव वाढला. इराणवर अमेरिका कोणत्याही क्षणी हल्ला करू शकते असे सांगितले जात आहे. शिवाय इराणमध्ये मोठे वादळ आले असून सरकारविरोधात लोक रस्त्यावर उतरले. आंतरराष्ट्रीय पातळीवर इराणची वचक कमी झाली. भारत आणि इराणचे संबंध कायमच चांगले राहिले. भारतासाठी इराण अत्यंत महत्वाचे नक्कीच आहे. कारण भारतासाठी इराणचे चाबहार हे बंदर अत्यंत महत्वाचे आहे. भारताने गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात चाबदार बंदरामध्ये मोठी गुंतवणूकही केली होती.

400 कोटींची गुंतवणूक गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात भारताने करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यावेळी भारताने एकही रूपयांची गुंतवणूक या बंदरात न करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. भारतासाठी अत्यंत फायदेशीर असलेल्या चाबदार बंदरातून भारताने मागे हटण्याचा निर्णय घेतल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे. अमेरिकेचा दबाव आणि इराणची सध्याची परिस्थिती बघता भारताने मागे हटण्याचा निर्णय घेतल्याचे कळतंय.

हे बंदर मोठ्या जहाजांसाठी अत्यंत सुरक्षित मानले जाते. यासोबतच चाबहार बंदर पाकिस्तानच्या ग्लादर बंदरापासून फक्त 170 किलोमीटर अंतरावर आहे. चाबहार बंदर भारताला हवे असण्याचे प्रमुख आणि मोठे कारण म्हणजे इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ टान्सपोर्ट कॉरिडॉर आहे. मुळात म्हणजे या मार्गाने भारताला युरोपपर्यंत वाहतूक नक्कीच सोपी ठरते याचा इराणसोबतच थेट रशियालाही फायदा होतो.

नरेंद्र मोदी 2026 मध्ये इराण दाैऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी थेट 55 कोटी डॉलरची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले होते. भारतासाठी हे बंदर अत्यंत महत्वाचे ठरते. कारण भारत हा पाकिस्तानला बाजूला सारून थेट मध्य आशियाच्या बाजारपेठांपर्यंत आरामात पोहोचू शकतो. 2024 मध्येच भारताने इराणसोबत चाबहार बंदराबाबत मोठा करार केला होता. हे बंदर भारतासाठी किती जास्त महत्वाचे आहे हे माहिती असतानाही भारताने या बंदरातून माघार घेतली.

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....