AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमच्या जागेत आम्ही काहीही करु; अरुणाचल प्रदेशात गाव वसवल्यानंतर चीनने दंड थोपटले

चीनच्या कुरघोड्या काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. भारताकडून कडक इशारे देऊनही त्याची भारतीय हद्दीत घुसखोरी सुरूच आहे.

आमच्या जागेत आम्ही काहीही करु; अरुणाचल प्रदेशात गाव वसवल्यानंतर चीनने दंड थोपटले
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jan 22, 2021 | 4:52 PM
Share

बीजिंग : चीनच्या कुरघोड्या काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. भारताकडून कडक इशारे देऊनही त्याची भारतीय हद्दीत घुसखोरी सुरूच आहे. भारताची इंच इंच जागा बळकावण्यासाठी चीननं चांगलीच कंबर कसली आहे. चीनने भारतातल्या अरुणाचल प्रदेशमध्ये एक गाव वसवलं आहे. एका अहवालानुसार, चीननं भारताच्या अरुणाचल प्रदेशमधील एका भागात सुमारे 101 घरे बांधली आहेत. चीनने वसवलेलं गाव अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) वास्तविक भारतीय सीमेपासून सुमारे साडेचार किमी अंतरावर आहे. ही बातमी वाचनात आल्यापासून भारतीय लोक प्रचंड रोष व्यक्त करत आहेत. तसेच भारतीयांनी आता ‘ड्रॅगन’च्या विरोधात आघाडीच उघडलीय. दरम्यान या गावाबाबत बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे की, गावाच्या उभारणीचं एक अत्यंत सामान्य काम सुरु आहे, कारण ते आमच्या जागेत होतंय. (China defends new Village in Arunachal Pradesh says construction on its own Territory is normal)

ज्या जागेवर गाव वसवलं आहे ती जमीन आमची आहे, असा दावा करत ड्रगनने दंड थोपटले आहेत. दरम्यान, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, चीन आणि भारताच्या सीमेलगत पूर्व भागाबाबत किंवा जँगनानबाबत (दक्षिणी तिब्बत) चीनची स्थिती स्पष्ट आहे. आम्ही कधीही चीनी क्षेत्रात अवैधपणे बनवलेल्या कथित अरुणालच प्रदेशला मान्यता दिलेली नाही. आम्ही आमच्या क्षेत्रात जी काही विकासकामं सुरु केली आहेत, ती आमची अंतर्गत बाब आहे. आम्ही आमच्या जमीनीवर कोणतीही विकासकामं केली किंवा संबंधित कामं सुरु केली तर ती आमच्यासाठी आणि सर्वांसाठीच खूपच सामान्य बाब आहे.

भारतीय मीडिया रिपोर्ट्समुळे परिस्थिती चिघळणार?

चीनच्या सरकारी माध्यमांनीही याबाबत अनेक लेख प्रसिद्ध केले आहेत. चीनच्या अधिकृत सरकारी माध्यमांनी सांगितले की, चीनने उभारलेल्या गावाबाबतच्या बातम्या भारतात अतिशयोक्तीपूर्णपणे (मीठ-मसाला लावून) मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्लोबल टाईम्सशी बोलताना चिनी तज्ज्ञ झांग योंगपन म्हणाले की, भारतीय मीडिया रिपोर्ट्स भारत-चीन सीमेवरील परिस्थिती अधिक गुंतागुंतीची करत आहेत. यामुळे परिस्थिती अधिक चिघळू शकते.

चीनने अरुणाचल प्रदेशात एक गाव वसवले

एका मीडिया हाऊसच्या म्हणण्यानुसार, चीनने अरुणाचल प्रदेशात एक गाव वसवले असल्याचे उपग्रह छायाचित्रात दिसून येतंय. अनेक तज्ज्ञांनीही याची खातरजमा केली आगे. 1 नोव्हेंबर 2020 चे रोजी हे छायाचित्र टिपण्यात आले आहे. असे म्हणतात की, हे गाव तसरी नदीकाठी वसलेले आहे. ज्या ठिकाणी हे गाव आहे, त्या भागावरून भारत आणि चीनमध्ये बराच काळ वाद सुरू आहे.

भारतीय नेटकऱ्यांची चीनला नुडल्स बॅनची धमकी

या संपूर्ण भागाबद्दल लोक पुन्हा एकदा चीनविरोधात रोष व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर काही लोक या प्रकरणावर सरकारकडे जाबही मागत आहेत. अनेक भारतीय नेटकऱ्यांनी चीनला नुडल्स बॅनची धमकीसुद्धा दिली आहे. सॅटेलाट फोटोत दिसत असलेल्या बांधकामानुसार चीनने अरुणाचल प्रदेशमधील भारताच्या हद्दीत घुसखोरी करून एक नवा गाव वसवल्याची माहिती मिळालीय.तसेच हे गाव भारताच्या प्रत्यक्ष सीमेपासून साडे चार किलोमीटर आत वसले असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही बाब भारताची चिंता वाढवणारी आहे.

संबंधित बातम्या

अरुणाचल प्रदेशात चीननं वसवलं गाव; भारतीय म्हणतात…

पुणे जिल्ह्यातील संभाजी राळे यांना अरुणाचल प्रदेशात वीरमरण

(China defends new Village in Arunachal Pradesh says construction on its own Territory is normal)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा